शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

‘पाणी अडवा पाणी जिरवा’

By admin | Updated: May 16, 2016 03:12 IST

‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे आपण लहानपणापासून विज्ञानाच्या पुस्तकात वाचत आलेलो असतो

‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे आपण लहानपणापासून विज्ञानाच्या पुस्तकात वाचत आलेलो असतो, पण त्याचा वैयक्तिक पातळीवर किती विचार करतो, ही बाब खरोखरच विचार करण्याजोगी आहे. परंतु आता त्याचाच विचार न केल्यामुळे महाराष्ट्राला सामोरे जावे लागणारा दुष्काळ हे त्याचेच फलरूप असल्याचे जाणवते. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही, असा विचार करून त्या दृष्टीने प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो.पाणी वाचवण्यासाठी मी स्वत: माझ्या गावी आमच्या वाड्याभोवती औदुंबर, वड, पिंपळ इत्यादी वृक्षांची लागवड केली आहे. कारण अशा वृक्षांमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. आता तर तेथे अगदी ३० फुटांवर पाणी लागले असून, तेथे बोअरवेलची सुविधा लवकरच होणार आहे. वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धनावरही भर देणे आवश्यक आहे. मी स्वत: या वर्षी पाण्याने होळी खेळण्यास नकार दिला. तसेच माझ्या घरातही पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करतो. घरात पाण्याचा गळका नळसुद्धा पाण्याच्या अपव्ययास कारण ठरतो. त्यामुळे मी अशा गोष्टींची दुरुस्ती करण्यास तत्परता दाखवतो. गाडीची सफाईसुद्धा बरेचदा एसीच्या पाण्यातून केली जाते, तर कधी कोरड्या फडक्याने पुसून केली जाते. गाडी धुण्याऐवजी ती पुसून काढल्याने पाण्याची मोठी बचत होते आणि स्वच्छताही साधली जाते. पाणी वाचवण्याचा मूलमंत्र हा कोणी दुसऱ्याने सांगण्यापेक्षा आपल्या दैनंदिन कृतीतूनच शोधायचा असतो. पिण्यासाठी पाणी घेताना आवश्यक तेवढेच घ्यावे, नाहक पाणी वाया घालवू नये. त्यातूनच पाण्याचा संवर्धनात्मक विकास साधणे आपल्याला शक्य आहे आणि दुष्काळावर मात करणेही!च्शब्दांकन : तेजल गोलीपकर