शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

‘पाणी अडवा पाणी जिरवा’

By admin | Updated: May 16, 2016 03:12 IST

‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे आपण लहानपणापासून विज्ञानाच्या पुस्तकात वाचत आलेलो असतो

‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे आपण लहानपणापासून विज्ञानाच्या पुस्तकात वाचत आलेलो असतो, पण त्याचा वैयक्तिक पातळीवर किती विचार करतो, ही बाब खरोखरच विचार करण्याजोगी आहे. परंतु आता त्याचाच विचार न केल्यामुळे महाराष्ट्राला सामोरे जावे लागणारा दुष्काळ हे त्याचेच फलरूप असल्याचे जाणवते. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही, असा विचार करून त्या दृष्टीने प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो.पाणी वाचवण्यासाठी मी स्वत: माझ्या गावी आमच्या वाड्याभोवती औदुंबर, वड, पिंपळ इत्यादी वृक्षांची लागवड केली आहे. कारण अशा वृक्षांमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. आता तर तेथे अगदी ३० फुटांवर पाणी लागले असून, तेथे बोअरवेलची सुविधा लवकरच होणार आहे. वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धनावरही भर देणे आवश्यक आहे. मी स्वत: या वर्षी पाण्याने होळी खेळण्यास नकार दिला. तसेच माझ्या घरातही पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करतो. घरात पाण्याचा गळका नळसुद्धा पाण्याच्या अपव्ययास कारण ठरतो. त्यामुळे मी अशा गोष्टींची दुरुस्ती करण्यास तत्परता दाखवतो. गाडीची सफाईसुद्धा बरेचदा एसीच्या पाण्यातून केली जाते, तर कधी कोरड्या फडक्याने पुसून केली जाते. गाडी धुण्याऐवजी ती पुसून काढल्याने पाण्याची मोठी बचत होते आणि स्वच्छताही साधली जाते. पाणी वाचवण्याचा मूलमंत्र हा कोणी दुसऱ्याने सांगण्यापेक्षा आपल्या दैनंदिन कृतीतूनच शोधायचा असतो. पिण्यासाठी पाणी घेताना आवश्यक तेवढेच घ्यावे, नाहक पाणी वाया घालवू नये. त्यातूनच पाण्याचा संवर्धनात्मक विकास साधणे आपल्याला शक्य आहे आणि दुष्काळावर मात करणेही!च्शब्दांकन : तेजल गोलीपकर