शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला दूधकोंडी

By admin | Updated: June 3, 2017 03:04 IST

शेतकरी संपामुळे पिशवीबंद दूध पुरवठा निम्म्याने घटल्याने शहरात शुक्रवारी दूधकोंडीची स्थिती निर्माण झाली. शनिवारपासून

शेतकरी संपामुळे पिशवीबंद दूध पुरवठा निम्म्याने घटल्याने शहरात शुक्रवारी दूधकोंडीची स्थिती निर्माण झाली. शनिवारपासून दूध टंचाईची तीव्रता आणखी वाढेल, असा अंदाज शहरातील प्रमुख दूध वितरकांनी व्यक्त केला. भाजीपाल्याची आवकही मंदावली असून शनिवारी घाऊक बाजार बंद असल्याने शहरात मोठी टंचाई जाणवण्याची भीती आहे. लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शेतकऱ्यांच्या ठिकठिकाणच्या आंदोलनामुळे दूध संकलनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. या शिवाय काही महत्त्वाच्या पिशवीबंद दूध कंपन्यांकडून देखील दुधाचा पुरवठा शुक्रवारी कमी झाला. परिणामी ४० ते ५० टक्के दूधपुरवठा घटला. शहरात साधारण दररोज १५ लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. नगर, शिरूर, जुन्नर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि शहर हद्दीलगतच्या गावांमधून संकलित केलेले दूध येथे प्रामुख्याने येते. त्यात जवळपास दहा लाख लिटर दूध पिशवीबंद येते. तर, सुमारे ५ लाख लिटर दुधाचा पुरवठा हा गवळ्यांमार्फत होतो. गवळी या संपात सहभागी नसल्याने काहीसा दूध पुरवठा सुरळीत आहे. पिशवीबंद दुधाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाला आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज) व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षीरसागर म्हणाले, कात्रज डेअरीत दररोज २ लाख २५ हजार लिटर दुधाची आवक होते. शुक्रवारी केवळ १ लाख ३५ हजार लिटर दूध आले. डेअरीमध्ये जवळपास २ लाख लिटर दुधाचा साठा असतो. त्यामुळे शुक्रवारी फारसा परिणाम जाणवला नाही. शनिवारपासून त्याची तीव्रता वाढेल. त्यामुळे संपकाळात दुधाचे इतर उपपदार्थ न करता केवळ दूध वितरण करण्यात येईल. या शिवाय कात्रज डेअरीतील एक वितरण केंद्र २४ तास सुरू ठेवण्यात येईल. शहरात दररोज १५ लाख लिटर दुधाची आवक होते. त्यातील दहा लाख लिटर दूध विविध कंपन्यांमार्फत वितरीत होते. गवळ्यांमार्फत वितरीत होणाऱ्या दुधावर फारसा परिणाम झाला नसल्याचे क्षीरसागर म्हणाले. गणेशपेठ दूध-खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दामोदर हिंगमिरे म्हणाले, मावळ, मुळशी आणि वेल्हा भागातून दूध आले नाही. शहर हद्दीलगतच्या १५-२० किलोमीटर हद्दीतील दूध शुक्रवारी आले. त्यामुळे दररोजचे दूध संकलन ८ हजार लिटरवरून ३ हजार लिटरपर्यंत खाली घसरले होते. परिणामी दुधाच्या दरात प्रतिलिटर ६० वरून ७० रुपयांपर्यंत वाढ झाली. शेतकरी संपाचा फटका शहराला बसू लागला असून शुक्रवारी संपाच्या दुसऱ्या दिवशी मोठा तुटवडा जाणवू लागल्याने सर्वच भाज्यांचे भाव कडाडले. त्यातच शनिवारी बाजार बंद असल्याने पुणेकरांवर भाज्यांसाठी वणवण फिरणे भाग पडणार आहे. तसेच भाजी मिळाल्यास त्यासाठी खिसा रिकामा करण्याची तयारीही ठेवावी लागणार आहे.गुलटेकडी येथील मार्केट यार्डातून शहराची भाज्यांची भूक भागविली जाते. शहरालगतही बाजार असून उपनगरांमध्ये तिथून किरकोळ विक्रेत्यांमार्फत भाजीखरेदी केली जाते. मात्र, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संपामुळे सर्वच बाजार ओस पडू लागले आहेत. शेतकऱ्यांकडून बाजारात भाजीपालाच आणला जात नसल्याने बहुतेक भाज्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. गुलटेकडी मार्केट यार्डात शुक्रवारी केवळ १३ टक्के शेतमालाची आवक झाली. सर्वसाधारपणे दररोज बाजारात ४० हजार ५१० क्विंटल फळे व भाजीपाल्याची आवक होत असते. शुक्रवारी हे प्रमाण केवळ ५ हजार ३६१ क्विंटल होते. भुसार बाजारातील आवकही ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. तर फुलबाजारात केवळ २३ टक्के फुलांची आवक झाली. यासह पिंपरी बाजार, मोशी बाजार, उत्तमनगर, खडकी आणि मांजरी उपबाजार या सर्व घाऊक बाजारांमध्ये शुक्रवारी केवळ २२ टक्के शेतमालाची आवक झाल्याचे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आले.घाऊक बाजारात आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात सर्वच भाज्यांचे भाव कडाडले आहेत. शुक्रवारी मागणीच्या तुलनेत आवक खूपच कमी झाल्याने किरकोळ विक्रेत्यांनाही चढ्या भावाने खरेदी करावी लागली. तसेच सर्व विक्रत्यांनाही भाजी मिळू शकली नाही. त्यातच शनिवारी मार्केट यार्ड साप्ताहिक सुटीमुळे बंद राहणार असल्याने काही प्रमाणात होणारी आवकही पूर्णपणे थांबणार आहे. परिणामी शनिवारपासूनच शहरात भाज्यांसाठी वणवण फिरण्याची वेळ पुणेकरांवर येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांकडून थेट विक्रीशेतकरी संपामुळे घाऊक बाजारात थेट माल विक्रीसाठी आणता येत नसल्याने काही शेतकऱ्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना थेट विक्री केली जात असल्याचे दिसून आले. शुक्रवारी मार्केट यार्डातील बाजार बंद असल्याने शेतकरी किरकोळ विक्रेत्यांशी संपर्क साधून विचारणा करीत आहेत. विके्रत्यांना थेट शेतातून माल घेऊन जाण्याची विनंती करीत आहेत. मात्र, नुकसानीच्या भीतीने विक्रेत्यांकडून त्याला नकार दिला जात आहे. तर काही शेतकरी वाहनामध्ये माल पूर्णपणे झाकून विक्रीसाठी आणत आहेत. फळ, फुलबाजारालाही फटकाभाजीपाल्याप्रमाणेच संपाचा फटका फळे व फुलांनाही बसला आहे. मार्केट यार्डातील फळबाजार व फुलबाजारात या मालाची आवक केवळ २० ते २५ टक्के एवढीच झाली. त्यामुळे फळे व फुलांचे भावही वाढले आहेत. फुलबाजारात फुलांची आवक केवळ २३ टक्के एवढीच झाली. तर फळबाजारात हे प्रमाणात १० ते १५ टक्क्यांच्या जवळपास होते. हापूस आंब्याचा हंगाम संपत आल्याने त्यावर फारसा परिणाम झालेला नाही. तर लिंबाची आवक नियमित आवकपेक्षा निम्म्याहून कमी झाल्याने भाव दुपटीने वाढले. इतर फळांची आवकही रोडावली आहे.दर शुक्रवारी साधारण १०० ते १२० गाड्या शेतमालाची आवक होत असते. पण संपामुळे ही आवक १० टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे भाज्यांच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे. काही किरकोळ विक्रेत्यांनाही भाज्या मिळाल्या नाही. त्यामुळे काहींनी विक्री बंद ठेवली आहे. शनिवारी सुट्टी असल्याने मोठा तुटवडा जाणवेल.- विलास भुजबळ, ज्येष्ठ व्यापारी, मार्केट यार्डफळभाज्यांचे घाऊक बाजारातील दहा किलोचे भाव : भाजीदि. २८ मेदि. २ जूनकांदा :५०-७०९०-११०बटाटा : ६०-१००८०-१३०भेंडी :२००-३०० ३००-५००गवार : २००-३००५००-७००टोमॅटो : १००-१२० ३००दोडका : ३००-४०० ५००हिरवी मिरची : ४००-५०० ५००फ्लॉवर : ८०-१२० ३००कोबी : १००-१५० ४००वांगी : १५०-२५० ३००-६००ढोबळी मिरची : २६०-३०० ७००-१०००घेवडा : ८००-१००० १५००सर्व पालेभाज्या५००-१५००२०००-२५००किरकोळ बाजारातील भावभाज्यामहात्मा फुले मंडईकांदा२० फ्लॉवर४० भेंडी८० वांगी७० दुधी भोपळा४० टोमॅटो ४० कोबी ५० काकडी ३० ढोबळी मिरची ८० घेवडा १६० गवार ७० शेवगा ६० मेथी (जुडी) २० पालक १५ कोथिंबीर ३०