शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ

By admin | Updated: August 2, 2016 01:40 IST

पावसाने पाठ फिरविल्यााने बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पाणीटंचाई तीव्र बनली आहे.

काऱ्हाटी : पावसाने पाठ फिरविल्यााने बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पाणीटंचाई तीव्र बनली आहे. पाण्याअभावी आता जिवापाड सांभाळ केलेल्या जनावरांना विकण्याची वेळ आली आहे. आता तरी ‘जनाई शिरसाई’ व ‘पुरंदर उपसा’ योजनेतून पाझर तलाव भरण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. पावसाळ्यातील दोन महिने उलटले आहेत. हा पाऊस सर्वत्र पडत आहे. मात्र, बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पावसाने दडी मारल्याने येथील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित चुकले आहे. पाऊस नसल्याने जनावरांची चारापिके करता आली नाहीत. विहिरींना पाणी नाही, त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. जिवापाड संभाळलेल्या जनावरांना विकण्याची वेळ आली आहे. मात्र, बाजारात मातीमोल किमतीने जनावरांना किंमत येत आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा चिंतातूर बनला आहे. तालुक्यातील देऊळगाव रसाळ, जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, माळवाडी, फोंडवाडा, काऱ्हाटी आदी भागात मोठा पाऊसच झाला नाही. सलग चार वर्षांपासून हा परिसर दुष्काळाने होरपळला आहे. यंदादेखील पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे, असे येथील ललित वाबळे यांनी सांगितले. (वार्ताहर)>दखल घेतली जात नाही...पावसाळ्यातच पाझर तलाव भरण्याची गरज आहे. त्यातून कमी पडणाऱ्या पावसाच्या जोरावर शेतकरी शेतात पिके घेऊन विहिरींच्या वाढलेल्या पाण्याच्या जोरावर पिके वाचवू शकेल. मात्र, शासन दरबारी मागणी करूनदेखील दखल घेतली जात नाही. त्यामुळे पाण्यासाठी कोणाकडे जायचे, अशी खंत विजय वाबळे व्यक्त केली.