शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ

By admin | Updated: August 2, 2016 01:40 IST

पावसाने पाठ फिरविल्यााने बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पाणीटंचाई तीव्र बनली आहे.

काऱ्हाटी : पावसाने पाठ फिरविल्यााने बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पाणीटंचाई तीव्र बनली आहे. पाण्याअभावी आता जिवापाड सांभाळ केलेल्या जनावरांना विकण्याची वेळ आली आहे. आता तरी ‘जनाई शिरसाई’ व ‘पुरंदर उपसा’ योजनेतून पाझर तलाव भरण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. पावसाळ्यातील दोन महिने उलटले आहेत. हा पाऊस सर्वत्र पडत आहे. मात्र, बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पावसाने दडी मारल्याने येथील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित चुकले आहे. पाऊस नसल्याने जनावरांची चारापिके करता आली नाहीत. विहिरींना पाणी नाही, त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. जिवापाड संभाळलेल्या जनावरांना विकण्याची वेळ आली आहे. मात्र, बाजारात मातीमोल किमतीने जनावरांना किंमत येत आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा चिंतातूर बनला आहे. तालुक्यातील देऊळगाव रसाळ, जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, माळवाडी, फोंडवाडा, काऱ्हाटी आदी भागात मोठा पाऊसच झाला नाही. सलग चार वर्षांपासून हा परिसर दुष्काळाने होरपळला आहे. यंदादेखील पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे, असे येथील ललित वाबळे यांनी सांगितले. (वार्ताहर)>दखल घेतली जात नाही...पावसाळ्यातच पाझर तलाव भरण्याची गरज आहे. त्यातून कमी पडणाऱ्या पावसाच्या जोरावर शेतकरी शेतात पिके घेऊन विहिरींच्या वाढलेल्या पाण्याच्या जोरावर पिके वाचवू शकेल. मात्र, शासन दरबारी मागणी करूनदेखील दखल घेतली जात नाही. त्यामुळे पाण्यासाठी कोणाकडे जायचे, अशी खंत विजय वाबळे व्यक्त केली.