शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
3
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
4
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
5
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
6
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
7
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
8
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
9
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
10
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
11
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
12
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
13
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
14
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
15
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
16
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
17
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
18
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
19
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
20
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?

एकहाती सत्ता की सत्तेसाठी गळा

By admin | Updated: January 30, 2017 01:57 IST

ठाण्याची महापालिका अस्तित्वात आल्यानंतरची ही सातवी निवडणूक. २५ वर्षे महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना-भाजपाची यंदा आमनेसामने झुंज आहे

अजित मांडके, ठाणेठाण्याची महापालिका अस्तित्वात आल्यानंतरची ही सातवी निवडणूक. २५ वर्षे महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना-भाजपाची यंदा आमनेसामने झुंज आहे. लढतही निकराची आहे. त्यामुळे आजवर कधीही बहुमताचा आकडा गाठता न येण्याची सत्तापरंपरा यंदाही कायम राहणार की, व्यूहरचनेप्रमाणे शिवसेना एकहाती सत्ता मिळवत नवा इतिहास घडवणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. भाजपाने आयारामांसाठी दारे खुली केली असली, तरी त्यांच्या भरवशावर तो पक्ष किती फुगणार, याचे गणित सोडवण्याचे काम सध्या सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सुरुवातीला आव्हान देण्याचा आव आणला होता, पण अजूनही त्या पक्षांची गळती थांबत नसल्याने एकत्र येऊनही ते कितपत आव्हान देऊ शकतील, हा प्रश्नच आहे.२५ वर्षांचा सत्तेचा वनवास संपवण्याचा विडा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उचलला असला, तरी त्यांचे हाल कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसारखे होणार हे नेत्यांनाही ठाऊक आहे. ठाणे महापालिकेची मुहूर्तमेढ १९८२ मध्ये रोवली गेली. त्यानंतर, १९८६ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत ६५ जागांपैकी ३० जागा जिंकून शिवसेनेने बाजी मारली. कॉंग्रेसनेही दुसऱ्या क्रमांकावर येत २५ जागा आपल्या खिशात टाकल्या. भाजपाला मात्र केवळ पाच जागाच मिळाल्या. शरद पवारांच्या समाजवादी कॉंग्रेसला एक जागा मिळाली होती. मात्र, सेनेला फार काळ आपली सत्ता टिकवता आली नाही. १९८७ मध्ये वसंत डावखरे यांनी राजकारणाच्या सारीपाटात असा काही डाव टाकला की, त्यामुळे भाजपाचे सदस्य फुटले आणि सेनेच्या हातून कॉंग्रेसकडे सत्ता गेली. १९९२ च्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. कॉंग्रेसने या निवडणुकीत सर्वाधिक ३५ जागा मिळवल्या. शिवसेनेला २५ जागांवर समाधान मानावे लागले. १९८६ पेक्षा शिवसेनेच्या पाच जागा कमी झाल्या. या वेळी भाजपाच्या पारड्यात १० जागा पडल्या. सत्तेची चावी १२ अपक्षांच्या हाती आली. १९९२ मध्ये १२ पैकी ९ अपक्षांनी कॉंग्रेसच्या पारड्यात मते टाकली. लगेचच १९९३ मध्ये १२ पैकी ११ अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे कॉंग्रेसला केवळ एक वर्षांचा कार्यकाळ उपभोगण्यास मिळाला. तेव्हापासून शिवसेनेने सत्ता आपल्याच ताब्यात ठेवल्याचे दिसून आले. १९९७ च्या तिसऱ्या निवडणुकीत मतदारांचा कौल स्पष्ट बहुमत देणारा नव्हता. तरीही, सर्वात मोठा पक्ष म्हणून ठाणेकरांनी पुन्हा सेनेच्याच पारड्यात मते टाकल्याचे दिसून आले. या निवडणुकीत शिवसेनेचे ३९ सदस्य निवडून आले. भाजपाच्या पारड्यात आणखी एक जागा वाढून त्यांचे संख्याबळ ११ वर गेले. कॉंग्रेसचे संख्याबळ मात्र ९ ने घटले. त्यांच्या पारड्यात २६ जागा आल्या. त्यानंतर, २००२ मध्ये पुन्हा शिवसेनेचा वरचष्मा दिसून आला. या निवडणुकीत शिवसैनिकांनी खऱ्या अर्थाने आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहिली. शिवसेनेचे संख्याबळ ४९ वर गेले. भाजपानेही संख्याबळ १४ वर नेले. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे घड्याळ प्रथमच खणखणले आणि त्यांना तब्बल २५ जागा मिळाल्या. मात्र, कॉंग्रेसचे बळ १३ वर आले. २००७ मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तरीही, महापालिकेवर पुन्हा भगवाच फडकला. शिवसेनेला या निवडणुकीत ४८ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसला २५ आणि कॉंग्रेसला १६ जागा मिळाल्या. मात्र, भाजपाचे संख्याबळ १४ वरून पाचवर आले. राष्ट्रवादी वाढल्याचा धक्का शिवसेनेला बसला. या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने तीन जागा पटकावल्या.२०१२ मध्ये काँग्रेसने मतभेद विसरून आघाडी केली होती. परंतु, सेनेच्या जागा ५४ वर गेल्या. राष्ट्रवादीच्या जागा २५ वरून ३४ वर गेल्या. कॉंग्रेसच्या जागा १७ झाल्या. भाजपाच्या वाट्याला आठ जागा आल्या. मनसेनेही तीनवरून सातपर्यंत मजल मारली. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला चांगलीच कसरत करावी लागली.