शहरं
Join us  
Trending Stories
1
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांसोबत उघडपणे दहशतवादी दिसले; हा घ्या पुरावा
2
India Pakistan War : पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजू लागला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
3
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
4
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
5
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
6
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
7
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
8
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
9
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
10
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
11
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
12
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
13
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
14
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
15
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
16
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
17
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
18
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
19
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
20
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम

एकहाती सत्ता की सत्तेसाठी गळा

By admin | Updated: January 30, 2017 01:57 IST

ठाण्याची महापालिका अस्तित्वात आल्यानंतरची ही सातवी निवडणूक. २५ वर्षे महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना-भाजपाची यंदा आमनेसामने झुंज आहे

अजित मांडके, ठाणेठाण्याची महापालिका अस्तित्वात आल्यानंतरची ही सातवी निवडणूक. २५ वर्षे महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना-भाजपाची यंदा आमनेसामने झुंज आहे. लढतही निकराची आहे. त्यामुळे आजवर कधीही बहुमताचा आकडा गाठता न येण्याची सत्तापरंपरा यंदाही कायम राहणार की, व्यूहरचनेप्रमाणे शिवसेना एकहाती सत्ता मिळवत नवा इतिहास घडवणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. भाजपाने आयारामांसाठी दारे खुली केली असली, तरी त्यांच्या भरवशावर तो पक्ष किती फुगणार, याचे गणित सोडवण्याचे काम सध्या सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सुरुवातीला आव्हान देण्याचा आव आणला होता, पण अजूनही त्या पक्षांची गळती थांबत नसल्याने एकत्र येऊनही ते कितपत आव्हान देऊ शकतील, हा प्रश्नच आहे.२५ वर्षांचा सत्तेचा वनवास संपवण्याचा विडा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उचलला असला, तरी त्यांचे हाल कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसारखे होणार हे नेत्यांनाही ठाऊक आहे. ठाणे महापालिकेची मुहूर्तमेढ १९८२ मध्ये रोवली गेली. त्यानंतर, १९८६ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत ६५ जागांपैकी ३० जागा जिंकून शिवसेनेने बाजी मारली. कॉंग्रेसनेही दुसऱ्या क्रमांकावर येत २५ जागा आपल्या खिशात टाकल्या. भाजपाला मात्र केवळ पाच जागाच मिळाल्या. शरद पवारांच्या समाजवादी कॉंग्रेसला एक जागा मिळाली होती. मात्र, सेनेला फार काळ आपली सत्ता टिकवता आली नाही. १९८७ मध्ये वसंत डावखरे यांनी राजकारणाच्या सारीपाटात असा काही डाव टाकला की, त्यामुळे भाजपाचे सदस्य फुटले आणि सेनेच्या हातून कॉंग्रेसकडे सत्ता गेली. १९९२ च्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. कॉंग्रेसने या निवडणुकीत सर्वाधिक ३५ जागा मिळवल्या. शिवसेनेला २५ जागांवर समाधान मानावे लागले. १९८६ पेक्षा शिवसेनेच्या पाच जागा कमी झाल्या. या वेळी भाजपाच्या पारड्यात १० जागा पडल्या. सत्तेची चावी १२ अपक्षांच्या हाती आली. १९९२ मध्ये १२ पैकी ९ अपक्षांनी कॉंग्रेसच्या पारड्यात मते टाकली. लगेचच १९९३ मध्ये १२ पैकी ११ अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे कॉंग्रेसला केवळ एक वर्षांचा कार्यकाळ उपभोगण्यास मिळाला. तेव्हापासून शिवसेनेने सत्ता आपल्याच ताब्यात ठेवल्याचे दिसून आले. १९९७ च्या तिसऱ्या निवडणुकीत मतदारांचा कौल स्पष्ट बहुमत देणारा नव्हता. तरीही, सर्वात मोठा पक्ष म्हणून ठाणेकरांनी पुन्हा सेनेच्याच पारड्यात मते टाकल्याचे दिसून आले. या निवडणुकीत शिवसेनेचे ३९ सदस्य निवडून आले. भाजपाच्या पारड्यात आणखी एक जागा वाढून त्यांचे संख्याबळ ११ वर गेले. कॉंग्रेसचे संख्याबळ मात्र ९ ने घटले. त्यांच्या पारड्यात २६ जागा आल्या. त्यानंतर, २००२ मध्ये पुन्हा शिवसेनेचा वरचष्मा दिसून आला. या निवडणुकीत शिवसैनिकांनी खऱ्या अर्थाने आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहिली. शिवसेनेचे संख्याबळ ४९ वर गेले. भाजपानेही संख्याबळ १४ वर नेले. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे घड्याळ प्रथमच खणखणले आणि त्यांना तब्बल २५ जागा मिळाल्या. मात्र, कॉंग्रेसचे बळ १३ वर आले. २००७ मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तरीही, महापालिकेवर पुन्हा भगवाच फडकला. शिवसेनेला या निवडणुकीत ४८ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसला २५ आणि कॉंग्रेसला १६ जागा मिळाल्या. मात्र, भाजपाचे संख्याबळ १४ वरून पाचवर आले. राष्ट्रवादी वाढल्याचा धक्का शिवसेनेला बसला. या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने तीन जागा पटकावल्या.२०१२ मध्ये काँग्रेसने मतभेद विसरून आघाडी केली होती. परंतु, सेनेच्या जागा ५४ वर गेल्या. राष्ट्रवादीच्या जागा २५ वरून ३४ वर गेल्या. कॉंग्रेसच्या जागा १७ झाल्या. भाजपाच्या वाट्याला आठ जागा आल्या. मनसेनेही तीनवरून सातपर्यंत मजल मारली. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला चांगलीच कसरत करावी लागली.