शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

एकहाती सत्ता की सत्तेसाठी गळा

By admin | Updated: January 30, 2017 01:57 IST

ठाण्याची महापालिका अस्तित्वात आल्यानंतरची ही सातवी निवडणूक. २५ वर्षे महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना-भाजपाची यंदा आमनेसामने झुंज आहे

अजित मांडके, ठाणेठाण्याची महापालिका अस्तित्वात आल्यानंतरची ही सातवी निवडणूक. २५ वर्षे महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना-भाजपाची यंदा आमनेसामने झुंज आहे. लढतही निकराची आहे. त्यामुळे आजवर कधीही बहुमताचा आकडा गाठता न येण्याची सत्तापरंपरा यंदाही कायम राहणार की, व्यूहरचनेप्रमाणे शिवसेना एकहाती सत्ता मिळवत नवा इतिहास घडवणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. भाजपाने आयारामांसाठी दारे खुली केली असली, तरी त्यांच्या भरवशावर तो पक्ष किती फुगणार, याचे गणित सोडवण्याचे काम सध्या सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सुरुवातीला आव्हान देण्याचा आव आणला होता, पण अजूनही त्या पक्षांची गळती थांबत नसल्याने एकत्र येऊनही ते कितपत आव्हान देऊ शकतील, हा प्रश्नच आहे.२५ वर्षांचा सत्तेचा वनवास संपवण्याचा विडा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उचलला असला, तरी त्यांचे हाल कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसारखे होणार हे नेत्यांनाही ठाऊक आहे. ठाणे महापालिकेची मुहूर्तमेढ १९८२ मध्ये रोवली गेली. त्यानंतर, १९८६ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत ६५ जागांपैकी ३० जागा जिंकून शिवसेनेने बाजी मारली. कॉंग्रेसनेही दुसऱ्या क्रमांकावर येत २५ जागा आपल्या खिशात टाकल्या. भाजपाला मात्र केवळ पाच जागाच मिळाल्या. शरद पवारांच्या समाजवादी कॉंग्रेसला एक जागा मिळाली होती. मात्र, सेनेला फार काळ आपली सत्ता टिकवता आली नाही. १९८७ मध्ये वसंत डावखरे यांनी राजकारणाच्या सारीपाटात असा काही डाव टाकला की, त्यामुळे भाजपाचे सदस्य फुटले आणि सेनेच्या हातून कॉंग्रेसकडे सत्ता गेली. १९९२ च्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. कॉंग्रेसने या निवडणुकीत सर्वाधिक ३५ जागा मिळवल्या. शिवसेनेला २५ जागांवर समाधान मानावे लागले. १९८६ पेक्षा शिवसेनेच्या पाच जागा कमी झाल्या. या वेळी भाजपाच्या पारड्यात १० जागा पडल्या. सत्तेची चावी १२ अपक्षांच्या हाती आली. १९९२ मध्ये १२ पैकी ९ अपक्षांनी कॉंग्रेसच्या पारड्यात मते टाकली. लगेचच १९९३ मध्ये १२ पैकी ११ अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे कॉंग्रेसला केवळ एक वर्षांचा कार्यकाळ उपभोगण्यास मिळाला. तेव्हापासून शिवसेनेने सत्ता आपल्याच ताब्यात ठेवल्याचे दिसून आले. १९९७ च्या तिसऱ्या निवडणुकीत मतदारांचा कौल स्पष्ट बहुमत देणारा नव्हता. तरीही, सर्वात मोठा पक्ष म्हणून ठाणेकरांनी पुन्हा सेनेच्याच पारड्यात मते टाकल्याचे दिसून आले. या निवडणुकीत शिवसेनेचे ३९ सदस्य निवडून आले. भाजपाच्या पारड्यात आणखी एक जागा वाढून त्यांचे संख्याबळ ११ वर गेले. कॉंग्रेसचे संख्याबळ मात्र ९ ने घटले. त्यांच्या पारड्यात २६ जागा आल्या. त्यानंतर, २००२ मध्ये पुन्हा शिवसेनेचा वरचष्मा दिसून आला. या निवडणुकीत शिवसैनिकांनी खऱ्या अर्थाने आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहिली. शिवसेनेचे संख्याबळ ४९ वर गेले. भाजपानेही संख्याबळ १४ वर नेले. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे घड्याळ प्रथमच खणखणले आणि त्यांना तब्बल २५ जागा मिळाल्या. मात्र, कॉंग्रेसचे बळ १३ वर आले. २००७ मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तरीही, महापालिकेवर पुन्हा भगवाच फडकला. शिवसेनेला या निवडणुकीत ४८ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसला २५ आणि कॉंग्रेसला १६ जागा मिळाल्या. मात्र, भाजपाचे संख्याबळ १४ वरून पाचवर आले. राष्ट्रवादी वाढल्याचा धक्का शिवसेनेला बसला. या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने तीन जागा पटकावल्या.२०१२ मध्ये काँग्रेसने मतभेद विसरून आघाडी केली होती. परंतु, सेनेच्या जागा ५४ वर गेल्या. राष्ट्रवादीच्या जागा २५ वरून ३४ वर गेल्या. कॉंग्रेसच्या जागा १७ झाल्या. भाजपाच्या वाट्याला आठ जागा आल्या. मनसेनेही तीनवरून सातपर्यंत मजल मारली. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला चांगलीच कसरत करावी लागली.