शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

ंपोटॅशचा अत्यल्प पुरवठा

By admin | Updated: May 11, 2014 00:31 IST

शेतकर्‍यांसाठी अति महत्त्वाचे मानले जाणारे डीएपी (डाय अमोनिअम फॉस्फेट) चा शून्य टक्के पुरवठा झाला आहे.

 जळगाव : जिल्हाभरातील शेतकर्‍यांसाठी कृषक वापरासाठी या खरीप हंगामाच्या अखेरपर्यंत दोन लाख ३५ हजार ९०० मे.टन विविध खते देण्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. परंतु यात शेतकर्‍यांसाठी अति महत्त्वाचे मानले जाणारे डीएपी (डाय अमोनिअम फॉस्फेट) चा शून्य टक्के पुरवठा झाला आहे. पोटॅश व १०-२६-२६ चा पुरवठादेखील अत्यल्प आहे. कृषी विभागाने तीन लाख मे.टन खत जिल्हाभरासाठी मिळावे, अशी मागणी कृषी आयुक्तालयाकडे केली होती. परंतु ती मान्य झाली नाही. हंगामाच्या अखेरपर्यंत दोन लाख ३५ हजार ९०० मे.टन खतपुरवठा होईल. त्यात १ लाख १९ हजार ३०० मे.टन युरीया, ४३ हजार मे.टन फॉस्फेट, २४ हजार ९०० मे.टन पोटॅश, ४२०० मे.टन डीएपी, ४२ मे.टन अमोनिअम सल्फेट, ५४ मे.टन २०-२०-०, ९०० मे.टन १९-१९-१९, ४१०० मे.टन २४-२४-०, १४०० मे.टन १४-३५-१४, ६७०० मे.टन १५-१५-१५, ३३०० मे.टन १२-३२-१६, १६६०० मे.टन १०-२६-२६, १३०० मे.टन १६-१६-१६ व इतर खते मिळतील, असे म्हटले आहे. दावा मोठा केलेला असला तरी अद्याप फक्त १०५ मे.टन पोटॅशचा पुरवठा झाला आहे. तर डीएपी या खताचा पुरवठाच झालेला नाही. याचा अर्थ या खतांचा तुटवडा निर्माण करण्याचे प्रयत्न आतापासून सुरू झाले आहेत. खतपुरवठ्याच्या टक्केवारीत पोटॅशचा १६ टक्केच पुरवठा झाला आहे. तर १०-२६-२६ या खताचा फक्त एक टक्के म्हणजेच २३ मे.टन पुरवठा झाला आहे. परंतु मागील हंगामाचा म्हणजे रब्बी हंगामात जिल्ह्यास प्राप्त झालेल्या खतांमधून मिश्र व सरळ खतांचा साठा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. यामुळे तुटवडा वगैरे नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. लिकींगचे फंडे युरीयाचा पुरवठा मुबलक प्रमाणात झालेला असला तरी विक्रेते पाचपेक्षा अधिक युरीयाच्या गोण्या शेतकर्‍यांना देण्यास नकार देतात. मोठ्या शेतकर्‍यांसाठी युरीया राखून ठेवला जातो. छोट्या शेतकर्‍यांना युरीयाची गरजही कमी असते, पण त्यांच्यासाठी अडचणी निर्माण केल्या जात आहेत. कृत्रीम तुटवडा, लिकींग आणि साठेबाजीचे लोण जिल्हाभरात पसरू लागल्याची माहिती आहे.