शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

ंपोटॅशचा अत्यल्प पुरवठा

By admin | Updated: May 11, 2014 00:31 IST

शेतकर्‍यांसाठी अति महत्त्वाचे मानले जाणारे डीएपी (डाय अमोनिअम फॉस्फेट) चा शून्य टक्के पुरवठा झाला आहे.

 जळगाव : जिल्हाभरातील शेतकर्‍यांसाठी कृषक वापरासाठी या खरीप हंगामाच्या अखेरपर्यंत दोन लाख ३५ हजार ९०० मे.टन विविध खते देण्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. परंतु यात शेतकर्‍यांसाठी अति महत्त्वाचे मानले जाणारे डीएपी (डाय अमोनिअम फॉस्फेट) चा शून्य टक्के पुरवठा झाला आहे. पोटॅश व १०-२६-२६ चा पुरवठादेखील अत्यल्प आहे. कृषी विभागाने तीन लाख मे.टन खत जिल्हाभरासाठी मिळावे, अशी मागणी कृषी आयुक्तालयाकडे केली होती. परंतु ती मान्य झाली नाही. हंगामाच्या अखेरपर्यंत दोन लाख ३५ हजार ९०० मे.टन खतपुरवठा होईल. त्यात १ लाख १९ हजार ३०० मे.टन युरीया, ४३ हजार मे.टन फॉस्फेट, २४ हजार ९०० मे.टन पोटॅश, ४२०० मे.टन डीएपी, ४२ मे.टन अमोनिअम सल्फेट, ५४ मे.टन २०-२०-०, ९०० मे.टन १९-१९-१९, ४१०० मे.टन २४-२४-०, १४०० मे.टन १४-३५-१४, ६७०० मे.टन १५-१५-१५, ३३०० मे.टन १२-३२-१६, १६६०० मे.टन १०-२६-२६, १३०० मे.टन १६-१६-१६ व इतर खते मिळतील, असे म्हटले आहे. दावा मोठा केलेला असला तरी अद्याप फक्त १०५ मे.टन पोटॅशचा पुरवठा झाला आहे. तर डीएपी या खताचा पुरवठाच झालेला नाही. याचा अर्थ या खतांचा तुटवडा निर्माण करण्याचे प्रयत्न आतापासून सुरू झाले आहेत. खतपुरवठ्याच्या टक्केवारीत पोटॅशचा १६ टक्केच पुरवठा झाला आहे. तर १०-२६-२६ या खताचा फक्त एक टक्के म्हणजेच २३ मे.टन पुरवठा झाला आहे. परंतु मागील हंगामाचा म्हणजे रब्बी हंगामात जिल्ह्यास प्राप्त झालेल्या खतांमधून मिश्र व सरळ खतांचा साठा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. यामुळे तुटवडा वगैरे नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. लिकींगचे फंडे युरीयाचा पुरवठा मुबलक प्रमाणात झालेला असला तरी विक्रेते पाचपेक्षा अधिक युरीयाच्या गोण्या शेतकर्‍यांना देण्यास नकार देतात. मोठ्या शेतकर्‍यांसाठी युरीया राखून ठेवला जातो. छोट्या शेतकर्‍यांना युरीयाची गरजही कमी असते, पण त्यांच्यासाठी अडचणी निर्माण केल्या जात आहेत. कृत्रीम तुटवडा, लिकींग आणि साठेबाजीचे लोण जिल्हाभरात पसरू लागल्याची माहिती आहे.