शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

ठाणे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: April 2, 2015 04:52 IST

जिल्हा परिषदेने ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. आजघडीला पालघर जिल्ह्यात पाणीटंचाई

पंकज रोडेकर, ठाणे जिल्हा परिषदेने ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. आजघडीला पालघर जिल्ह्यात पाणीटंचाईला सुरुवात झाल्याने तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. ठाणे जिल्ह्यातपाणीटंचाई भासत नसली तरी तेथील काही तालुक्यांमधून टँकरची मागणी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या आराखड्यात एप्रिल आणि जून या महिन्यांत ठाणे जिल्ह्यातील १४८ गावे, २६८ पाडे तसेच पालघरमधील ७५ गावे आणि ३६२ पाडे पाणीटंचाईग्रस्त म्हणून प्रस्तावित करण्यात आली आहेत. ही टंचाई दूर व्हावी म्हणून ठाण्यासाठी १८१.३० लाख तर पालघरसाठी २०७.५० लाख अपेक्षित खर्च प्रशासनाने डोळ्यांसमोर ठेवल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर प्रथमच दोन्ही जिल्ह्यांसाठी वेगवेगळे संभाव्य पाणीटंचाईचे कृती आराखडे तयार करण्यात आले. त्यानुसार, आॅक्टोबर २०१४ ते जून २०१५ दरम्यान १७८ गावे तर ३९५ पाडे ठाणे जिल्ह्यात संभाव्य टंचाईग्रस्त असून त्यांच्यासाठी ४११.९५ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर २०१४ दरम्यान अपेक्षित खर्च शून्य मांडला होता. जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान ३० गावे आणि १२७ पाड्यांमध्ये टंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तवित त्यासाठी २३०.६५ खर्च अपेक्षित धरला आहे. मात्र, मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात पाणीटंचाई उद्भवली नसली तरी एप्रिल ते जूनदरम्यान १४८ गावांत, २६८ पाड्यांत पाणीटंचाईची शक्यता वर्तवित त्यासाठी १८१.३० लाख रुपये अपेक्षित धरण्यात आले आहेत. त्याचबरोबर उपाययोजना म्हणून टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.पालघर जिल्ह्यात आॅक्टोबर २०१४ ते जून २०१५ दरम्यान १०२ गावे तर ४५० पाडे संभाव्य टंचाईग्रस्त असून त्यासाठी २९०.९० लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. त्यामधील आॅक्टोबर ते डिसेंबर २०१४ दरम्यान अपेक्षित खर्च म्हणून ठेवलेल्या २६.२५ लाख रकमेला जिल्हाधिकाऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात मंजुरी दिली आहे. जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान ८३.४० खर्च अपेक्षित धरला होता. या वेळी २७ गावे आणि ८८ पाड्यांमध्ये टंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार, मोखाडा आणि जव्हारमध्ये पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मोखाड्यात दोन तर जव्हारात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल ते जून २०१५ दरम्यान ७५ गावे आणि ३६२ पाड्यांत संभाव्य टंचाई डोळ्यांसमोर ठेवून २०७.५० लाख खर्च अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.