शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

ठाणे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: April 2, 2015 04:52 IST

जिल्हा परिषदेने ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. आजघडीला पालघर जिल्ह्यात पाणीटंचाई

पंकज रोडेकर, ठाणे जिल्हा परिषदेने ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. आजघडीला पालघर जिल्ह्यात पाणीटंचाईला सुरुवात झाल्याने तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. ठाणे जिल्ह्यातपाणीटंचाई भासत नसली तरी तेथील काही तालुक्यांमधून टँकरची मागणी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या आराखड्यात एप्रिल आणि जून या महिन्यांत ठाणे जिल्ह्यातील १४८ गावे, २६८ पाडे तसेच पालघरमधील ७५ गावे आणि ३६२ पाडे पाणीटंचाईग्रस्त म्हणून प्रस्तावित करण्यात आली आहेत. ही टंचाई दूर व्हावी म्हणून ठाण्यासाठी १८१.३० लाख तर पालघरसाठी २०७.५० लाख अपेक्षित खर्च प्रशासनाने डोळ्यांसमोर ठेवल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर प्रथमच दोन्ही जिल्ह्यांसाठी वेगवेगळे संभाव्य पाणीटंचाईचे कृती आराखडे तयार करण्यात आले. त्यानुसार, आॅक्टोबर २०१४ ते जून २०१५ दरम्यान १७८ गावे तर ३९५ पाडे ठाणे जिल्ह्यात संभाव्य टंचाईग्रस्त असून त्यांच्यासाठी ४११.९५ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर २०१४ दरम्यान अपेक्षित खर्च शून्य मांडला होता. जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान ३० गावे आणि १२७ पाड्यांमध्ये टंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तवित त्यासाठी २३०.६५ खर्च अपेक्षित धरला आहे. मात्र, मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात पाणीटंचाई उद्भवली नसली तरी एप्रिल ते जूनदरम्यान १४८ गावांत, २६८ पाड्यांत पाणीटंचाईची शक्यता वर्तवित त्यासाठी १८१.३० लाख रुपये अपेक्षित धरण्यात आले आहेत. त्याचबरोबर उपाययोजना म्हणून टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.पालघर जिल्ह्यात आॅक्टोबर २०१४ ते जून २०१५ दरम्यान १०२ गावे तर ४५० पाडे संभाव्य टंचाईग्रस्त असून त्यासाठी २९०.९० लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. त्यामधील आॅक्टोबर ते डिसेंबर २०१४ दरम्यान अपेक्षित खर्च म्हणून ठेवलेल्या २६.२५ लाख रकमेला जिल्हाधिकाऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात मंजुरी दिली आहे. जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान ८३.४० खर्च अपेक्षित धरला होता. या वेळी २७ गावे आणि ८८ पाड्यांमध्ये टंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार, मोखाडा आणि जव्हारमध्ये पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मोखाड्यात दोन तर जव्हारात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल ते जून २०१५ दरम्यान ७५ गावे आणि ३६२ पाड्यांत संभाव्य टंचाई डोळ्यांसमोर ठेवून २०७.५० लाख खर्च अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.