शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत विकासाचे मॉडेलच उपयुक्त

By admin | Updated: November 7, 2016 01:35 IST

जागतिक स्तरावरील बलाढ्य देशांमध्येदेखील शाश्वत अर्थव्यवस्था आणि सर्वांगीण विकास साधणारी अर्थव्यवस्था याबाबत गोंधळाचे वातावरण दिसते

पुणे : जागतिक स्तरावरील बलाढ्य देशांमध्येदेखील शाश्वत अर्थव्यवस्था आणि सर्वांगीण विकास साधणारी अर्थव्यवस्था याबाबत गोंधळाचे वातावरण दिसते. सर्वांच्या नीती टोकाच्या अवस्थेला येऊन ठेपल्या आहेत. अशा वेळी शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशींनी मांडलेले शाश्वत विकासाचे मॉडेलच उपयोगी पडेल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केले.‘शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा’ या वसुंधरा काशीकर-भागवत लिखित पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि पालकमंत्री गिरीश बापट, साहित्यिक राजीव साने, वसुंधरा काशीकर-भागवत, राजहंस प्रकाशनाच्या संपादक विनया खडपेकर आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेच्या माजी अध्यक्ष व महिला आघाडीच्या माजी आमदार सरोज काशीकर होत्या.गडकरी म्हणाले, ‘‘शेतीमधील गुंतवणूक कमी करून उत्पादन कसे वाढेल, या दृष्टीने संशोधन होणे गरजेचे आहे. शरद जोशींपासून ते अनेक विचारवंतांनी खुली अर्थव्यवस्था शेतीला तारकच ठरेल, अशी ठाम भूमिका घेतली म्हणून शेतकरी, कष्टकरी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे स्पर्धा निर्माण झाली आणि त्याचा थेट फायदा ग्राहकांना झाला. मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारताना भारताने सर्वसामान्य, गरीब माणूस केंद्रस्थानी ठेवला. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे योगदान २० टक्के एवढे अल्प असले, तरी ग्रामीण आणि कृषी अर्थनीतीच्या सक्षमीकरणाशिवाय सर्वांगीण प्रगती होणे शक्य नाही. शरद जोशी अर्थक्रांतीचा जो विचार मांडत होते, त्या विचारांची आज नितांत आवश्यकता आहे. सिंचनासारख्या आवश्यक घटकांच्या बाबतीतदेखील महाराष्ट्र पिछाडीवर आहे. सिंचन कसे वाढेल, संशोधन कसे वाढेल, जे प्रकल्प निधीअभावी बंद आहेत आणि जे पाण्याशी, शेतीशी संबंधित आहेत ते पूर्णत्वाला कसे नेता येतील, याबाबत केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. महाराष्ट्राला त्यातून ३९ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.सरोज काशीकर म्हणाल्या की, समस्यांचे राजकारण करीत आपली पोळी भाजून घेणारे राजकारणी आम्ही आजवर पाहिले, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खऱ्या अर्थान पोटतिडकीने काम करणारा शरद जोशींसारखा नेता आम्हाला लाभला हे आमचे भाग्य होते. सरकार स्वत: समस्यांच्या जंजाळात अडकलेले आहे, ते काय आपले प्रश्न सोडवणार आपल्यालाच आपले प्रश्न सोडवावे लागतील, अशा विचारांचे कार्यकर्ते शरद जोशी यांनी घडविले. वसुंधरा काशीकर-भागवत यांनी शरद जोशी यांच्याशी झालेल्या संवादातून या पुस्तकाचा कसा जन्म झाला, याबाबत सविस्तर विवेचन केले. प्रसन्न जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार भक्ती हुबळीकर यांनी मानले.