शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

अडखळत वाटचाल

By admin | Updated: June 18, 2016 01:08 IST

शिवसेनेच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा धांडोळा घेता उत्तर महाराष्ट्र आणि त्यातही नाशिकमध्ये या संघटनेने प्रथमपासूनच जी घट्टपणे पाळेमुळे रुजविली त्याचे निर्विवाद श्रेय छगन भुजबळ

- किरण अग्रवाल (उत्तर महाराष्ट्र)शिवसेनेच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा धांडोळा घेता उत्तर महाराष्ट्र आणि त्यातही नाशिकमध्ये या संघटनेने प्रथमपासूनच जी घट्टपणे पाळेमुळे रुजविली त्याचे निर्विवाद श्रेय छगन भुजबळ यांनाच जाते. उत्तर महाराष्ट्रातील अन्य चार जिल्ह्यात मात्र शिवसेनेला फारसा जम बसवता आलेला नाही. मुंबई बाहेरची पहिली शाखा उघडण्यापासून या संघटनेचा नाशिकशी संबंध जोडला गेलेला आहे. त्याचबरोबर मूळ नाशिककर असलेले छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या तिकिटावर मुंबईचे महापौर व पक्षाचे तत्कालीन एकमेव आमदार असा राजकीय प्रवास केल्याने त्यांच्या संपर्कातून नाशकातील संघटनेला बळ लाभले, जे भुजबळ पक्ष सोडून गेल्यानंतरही शिवसेनेने टिकवून ठेवले. १९९४ मध्ये या पक्षाचे चौथे अधिवेशन नाशकात झाले ज्याने ९५च्या विधानसभा निवडणुकीत विजयाचे व राज्यातील ‘युती’ सरकारच्या सत्तेचे दार उघडून दिल्याचे म्हणता येईल. त्यामुळे नाशकात हा पक्ष बऱ्यापैकी वाढला, पण खान्देशात व नगर जिल्ह्यात तो फारसा वाढू शकला नाही. ‘युती’च्या काळात उत्तर महाराष्ट्रातील नाशिकला बबनराव घोलप व सहयोगी सदस्य म्हणून तुकाराम दिघोळे असे दोन मंत्री लाभले होते. अहमदनगरमध्ये विखे-पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे बाळासाहेब विखे यांना केंद्रात तर राधाकृष्ण विखे व नगरचे अनिल राठोड यांना राज्यात ‘लाल दिवा’ लाभला होता. याखेरीज खान्देशात एकमात्र सुरेशदादा जैन यांना मंत्रिपद देण्यात आले होते. यातील विखे-पाटील सत्ता संपताच पक्ष सोडून गेल्याने तर सुरेशदादा कोर्ट-कचेऱ्यांत अडकल्याने नगर व जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला विकलांगता आली. राज्यातील सध्याच्या सरकारमध्येही केवळ दादा भुसे यांच्या रूपाने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात एकमेव नाशिक जिल्ह्याला राज्यमंत्रिपद लाभले आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात तर या पक्षाला मातब्बर नेतृत्वच कधी लाभले नाही. त्यामुळे तेथे अपवादानेच सत्तेची संधी मिळाली व परिणामी पक्षाचा विकास होऊ शकला नाही.मुंबईशी असलेल्या सलगतेमुळे व खुद्द शिवसेनाप्रमुखांनीही लक्ष पुरविल्यामुळे नाशकात पक्षबळ बऱ्यापैकी आकारास आले. नेत्यांबरोबर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात घडले. त्यामुळे त्या बळावर राजाभाऊ गोडसे, अ‍ॅड. उत्तमराव ढिकले व विद्यमान अवस्थेत हेमंत गोडसे असे तीन खासदार या पक्षाला लाभले. नगर जिल्ह्यातही बाळासाहेब विखेंव्यतिरिक्त शिर्डी राखीव मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून बाळासाहेब वाकचौरे व त्यानंतरचे सदाशिव लोखंडे असे मिळून तीन खासदार निवडून आले. अर्थात या निवडींमागे संघटनात्मक बळाखेरीजची व्यक्तिगत कारणेच राहिली आहेत हा भाग वेगळा. परंतु जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आजवर एकदाही या पक्षाला खासदारकी मिळवता आलेली नाही. आमदारकीच्या बळाचा विचार करायचा तर वर्तमान अवस्थेत उत्तर महाराष्ट्रात एकूण ४७ पैकी अवघ्या ८ जागा शिवसेनेकडे असून, त्यातीलही सर्वाधिक ४ नाशिक व ३ जळगाव जिल्ह्यातून निवडून आल्या आहेत. नगर जिल्ह्यातून एकच जागा असून, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात खाते उघडता आलेले नाही. मातब्बर नेतृत्वाचा अभाव हेच यामागील कारण राहिले आहे. धुळ्यातून प्रा. शरद पाटील वजा केले तर काही उरत नाही. जळगावात सुरेशदादा व गुलाबराव पाटील वगळता प्रभावी नेतृत्व नाही. नेत्यांची सोय, पण...शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीत उत्तर महाराष्ट्रातून छगन भुजबळ, सुरेशदादा जैन, विखे पिता-पुत्र, प्रशांत हिरे आदि नेत्यांनी शिवसेनेच्या वळचणीला जाऊन पाहिले. कालांतराने यातील भुजबळ, विखे-पाटील, हिरे पक्ष सोडून गेले, पण भुजबळांचा अपवाद वगळता पक्ष म्हणून शिवसेनेच्या वाढीत त्यांचा काहीही हातभार लागला नाही. कारण मूलत: हे लोक त्यांची राजकीय सोय म्हणून काही काळाकरिता पक्षात आले होते.