शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

अडखळत वाटचाल

By admin | Updated: June 18, 2016 01:08 IST

शिवसेनेच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा धांडोळा घेता उत्तर महाराष्ट्र आणि त्यातही नाशिकमध्ये या संघटनेने प्रथमपासूनच जी घट्टपणे पाळेमुळे रुजविली त्याचे निर्विवाद श्रेय छगन भुजबळ

- किरण अग्रवाल (उत्तर महाराष्ट्र)शिवसेनेच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा धांडोळा घेता उत्तर महाराष्ट्र आणि त्यातही नाशिकमध्ये या संघटनेने प्रथमपासूनच जी घट्टपणे पाळेमुळे रुजविली त्याचे निर्विवाद श्रेय छगन भुजबळ यांनाच जाते. उत्तर महाराष्ट्रातील अन्य चार जिल्ह्यात मात्र शिवसेनेला फारसा जम बसवता आलेला नाही. मुंबई बाहेरची पहिली शाखा उघडण्यापासून या संघटनेचा नाशिकशी संबंध जोडला गेलेला आहे. त्याचबरोबर मूळ नाशिककर असलेले छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या तिकिटावर मुंबईचे महापौर व पक्षाचे तत्कालीन एकमेव आमदार असा राजकीय प्रवास केल्याने त्यांच्या संपर्कातून नाशकातील संघटनेला बळ लाभले, जे भुजबळ पक्ष सोडून गेल्यानंतरही शिवसेनेने टिकवून ठेवले. १९९४ मध्ये या पक्षाचे चौथे अधिवेशन नाशकात झाले ज्याने ९५च्या विधानसभा निवडणुकीत विजयाचे व राज्यातील ‘युती’ सरकारच्या सत्तेचे दार उघडून दिल्याचे म्हणता येईल. त्यामुळे नाशकात हा पक्ष बऱ्यापैकी वाढला, पण खान्देशात व नगर जिल्ह्यात तो फारसा वाढू शकला नाही. ‘युती’च्या काळात उत्तर महाराष्ट्रातील नाशिकला बबनराव घोलप व सहयोगी सदस्य म्हणून तुकाराम दिघोळे असे दोन मंत्री लाभले होते. अहमदनगरमध्ये विखे-पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे बाळासाहेब विखे यांना केंद्रात तर राधाकृष्ण विखे व नगरचे अनिल राठोड यांना राज्यात ‘लाल दिवा’ लाभला होता. याखेरीज खान्देशात एकमात्र सुरेशदादा जैन यांना मंत्रिपद देण्यात आले होते. यातील विखे-पाटील सत्ता संपताच पक्ष सोडून गेल्याने तर सुरेशदादा कोर्ट-कचेऱ्यांत अडकल्याने नगर व जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला विकलांगता आली. राज्यातील सध्याच्या सरकारमध्येही केवळ दादा भुसे यांच्या रूपाने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात एकमेव नाशिक जिल्ह्याला राज्यमंत्रिपद लाभले आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात तर या पक्षाला मातब्बर नेतृत्वच कधी लाभले नाही. त्यामुळे तेथे अपवादानेच सत्तेची संधी मिळाली व परिणामी पक्षाचा विकास होऊ शकला नाही.मुंबईशी असलेल्या सलगतेमुळे व खुद्द शिवसेनाप्रमुखांनीही लक्ष पुरविल्यामुळे नाशकात पक्षबळ बऱ्यापैकी आकारास आले. नेत्यांबरोबर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात घडले. त्यामुळे त्या बळावर राजाभाऊ गोडसे, अ‍ॅड. उत्तमराव ढिकले व विद्यमान अवस्थेत हेमंत गोडसे असे तीन खासदार या पक्षाला लाभले. नगर जिल्ह्यातही बाळासाहेब विखेंव्यतिरिक्त शिर्डी राखीव मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून बाळासाहेब वाकचौरे व त्यानंतरचे सदाशिव लोखंडे असे मिळून तीन खासदार निवडून आले. अर्थात या निवडींमागे संघटनात्मक बळाखेरीजची व्यक्तिगत कारणेच राहिली आहेत हा भाग वेगळा. परंतु जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आजवर एकदाही या पक्षाला खासदारकी मिळवता आलेली नाही. आमदारकीच्या बळाचा विचार करायचा तर वर्तमान अवस्थेत उत्तर महाराष्ट्रात एकूण ४७ पैकी अवघ्या ८ जागा शिवसेनेकडे असून, त्यातीलही सर्वाधिक ४ नाशिक व ३ जळगाव जिल्ह्यातून निवडून आल्या आहेत. नगर जिल्ह्यातून एकच जागा असून, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात खाते उघडता आलेले नाही. मातब्बर नेतृत्वाचा अभाव हेच यामागील कारण राहिले आहे. धुळ्यातून प्रा. शरद पाटील वजा केले तर काही उरत नाही. जळगावात सुरेशदादा व गुलाबराव पाटील वगळता प्रभावी नेतृत्व नाही. नेत्यांची सोय, पण...शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीत उत्तर महाराष्ट्रातून छगन भुजबळ, सुरेशदादा जैन, विखे पिता-पुत्र, प्रशांत हिरे आदि नेत्यांनी शिवसेनेच्या वळचणीला जाऊन पाहिले. कालांतराने यातील भुजबळ, विखे-पाटील, हिरे पक्ष सोडून गेले, पण भुजबळांचा अपवाद वगळता पक्ष म्हणून शिवसेनेच्या वाढीत त्यांचा काहीही हातभार लागला नाही. कारण मूलत: हे लोक त्यांची राजकीय सोय म्हणून काही काळाकरिता पक्षात आले होते.