शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

राज्य बँकेला केवळ कागदावरच नफा

By admin | Updated: March 4, 2016 03:37 IST

तोट्यात असणारी बँक फायद्यात आली असे राज्य सहकारी बँक सांगत असली तरी हा फायदा कागदोपत्री आहे; कारण बँकेने ज्यांच्याकडून येणे होते असे सहकारी कारखाने खासगी लोकांना विकून

अतुल कुलकर्णी, मुंबईतोट्यात असणारी बँक फायद्यात आली असे राज्य सहकारी बँक सांगत असली तरी हा फायदा कागदोपत्री आहे; कारण बँकेने ज्यांच्याकडून येणे होते असे सहकारी कारखाने खासगी लोकांना विकून स्वत:चे पैसे वसूल केले आहेत. शिवाय, काही कर्जे कायमची राईटआॅफ केली आहेत. त्यामुळे सकृतदर्शनी बँक फायद्यात दिसत असली तरीही हा फायदा केवळ कागदोपत्री असल्याचे वास्तव समोर आले आहे. सहकारक्षेत्रातील अनेकांनी सहकारी कारखाने आधी डबघाईला आणले. नंतर तेच कारखाने शेकडो एकर जमिनीसह खासगीरीत्या विकत घेतले. परिणामी, राज्यात सहकार चळवळीलाही घरघर लागली आणि बँकेचेही कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यातून राज्य बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाले. प्रशासक मंडळाने बँक फायद्यात आणल्याचा दावा केला असला तरी त्यांनी दिलेली आकडेवारी वेगळेच चित्र दाखवते.राज्यातल्या १०० सहकारी साखर कारखान्यांपैकी ६६ कारखाने एनपीए झाले आहेत. तर ३४ कारखाने चालू असून, राज्य बँकेने त्यांना कर्जपुरवठा केला आहे. सहकारी चळवळ वाढवण्याच्या हेतूने राज्य सहकारी बँकेची स्थापना झाली, मात्र गेल्या पाच वर्षांत ज्या सहकारी कारखान्यांकडून बँकेचे येणे होते त्यातले अनेक कारखाने खाजगी लोकांना विकून बँकेने आपले येणे वसूल केले. त्यामुळे सहकारी कारखाने कायमचे बंद पडले. आज बँक जरी ११२५ कोटी रुपये निव्वळ नफा मिळाल्याचे सांगत असली तरी १३३८ कोटी रुपये त्यांचे जुनेच येणे होते. ते फक्त वसूल झाले. तेही सहकारी कारखाने कायमचे बंद करून! शिवाय ३९६ कोटी रुपये जे हक्काचे येणार होते ते बँकेने राईटआॅफ करून टाकल्यामुळे तेवढ्या रकमेवरही त्यांना पाणी सोडावे लागले. याची बेरीज वजाबाकी केली तर बँक फायद्यात कशी काय येते, हा प्रश्न उरतो.जेवढे कारखाने विकले गेले त्यांच्याकडील येणी वसूल करून जादा रकमेला ते कारखाने विकले गेले आणि त्यातून बँकेचा फायदा झाला, असे बँकेला म्हणायचे आहे का, हा प्रश्नही यातून पुढे आला आहे. बँकिंग करून पाच वर्षांत मिळालेल्या १०१६ कोटींमध्ये राईटआॅफ केलेली रक्कमही येते का, हेही बँकेने स्पष्ट केले नाही.> बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे आणि व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांना विचारले असता ते म्हणाले, गुंतवणूक घसारा निधी, बुडीत व संशयित कर्जासाठीच्या निधीकरिता तरतुदी केल्या गेल्या. त्यामुळे तसे म्हणता येणार नाही. आम्हाला सरकारची २३०० कोटींची हमी येणे आहे. त्यापैकी फक्त १७५ कोटीच आजवर मिळाले असून, आणखी २२०० कोटीदेखील येणे आहे, असेही ते म्हणाले.बुडीत कारखान्यांच्या किंवा राज्य बँकेच्या संचालकांवर जरब बसेल अशी कोणती कारवाई बँकेने केली, त्यांच्याकडून किती रुपये वसूल केले व राज्यात आदर्श निर्माण करून दिला, असा सवाल केला असता डॉ. सुखदेवे म्हणाले, आम्ही वसुलीच्या प्रक्रियेचा भाग म्हणूनच अशा संचालकांवर राज्यभर गुन्हे दाखल केले आहेत. व्यक्तिगत आणि एकत्रित जबाबदारीचा भाग म्हणून हे गुन्हे सहकार न्यायालयात दाखल आहेत. मात्र अद्याप कोणाचीही वसुली झालेली नाही.