शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

‘सेतू’मुळे विनाअडथळा प्रवास

By admin | Updated: August 2, 2016 01:43 IST

पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यांचे जाळे पसरत आहे.

मंगेश पांडे,

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यांचे जाळे पसरत आहे. त्यामुळे उपनगरांतील कोणत्याही भागापर्यंत विनाअडथळा, विनावाहतूककोंडी जाणे सहजशक्य बनले आहे. शहर आणि उपनगरांना जोडणारा रस्त्यांचा हा सेतू शहरवासीयांसाठी समाधानकारक ठरत आहे. औद्योगिकनगरी अशी ओळख असलेल्या शहराला ‘बेस्ट सिटी’चा पुरस्कार मिळाला आहे. विविध उद्योग-व्यवसायांमुळे नोकरीनिमित्त शहरात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्या तुलनेत शहराचा विस्तारही वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे सध्याचे क्षेत्रफळ १७७ चौरस किलोमीटर इतके आहे, तर लोकसंख्या २० लाखांवर पोहोचली आहे. नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविताना यामध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक समजला जाणारा रस्ता याकडे प्राधान्याने लक्ष दिले गेले आहे. याचाच भाग म्हणून शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहेत. याचा नागरिकांना फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. आगामी काळातही मोठे व प्रशस्त रस्ते बनविण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे शहराच्या कोणत्याही उपनगरातील ठिकाणी पोहोचणे, तसेच एका उपनगरातून दुसऱ्या उपनगरात जाणे सोयीचे झाले आहे. वेळेची बचत होत असून, त्रासही कमी होत आहे. >ग्रेड सेपरेटरचाही फायदामुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना निगडी ते दापोडी हा साडेबारा किलोमीटर लांबीचा ग्रेड सेपरेटरसह असलेला मार्ग फायदेशीर ठरत आहे. या रस्त्याची एकूण रुंदी तब्बल ६१ मीटर आहे. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांतच हा मार्ग पार करता येतो. हा मार्ग शहराच्या मध्यवर्ती भागातून जात असतानाही कोठेही वाहतूककोंडी होत नाही, की कसली अडचणही भासत नाही. यासह आकुर्डी, पिंपरी, चिंचवड, नाशिक फाटा, कासारवाडी या ठिकाणीही जाता नाही. याचप्रकारे किवळे-सांगवी हा साडेचौदा किलोमीटर लांबीचा बीआरटीएस असलेला मार्गदेखील उपयुक्त ठरत आहे. या रस्त्याची रुंदी ४५ मीटर आहे. मार्गामुळे शहरात काही कारणांनी ‘ट्रॅफिक डायव्हर्जन’ करायचे असल्यास किवळे-सांगवी या मार्गाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. शहराच्या पूर्व-पश्चिम दिशेसाठी हे मार्ग एकप्रकारे सेतू झाले आहेत. शहरातून उत्तरेकडून दक्षिणेला जाण्यासाठी देहू-आळंदी रोड ते काळेवाडी फाटा या दरम्यान साडेदहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता चिखली, जाधववाडी, टेल्को चौक, चिंचवड स्टेशन येथील जुना मुंबई-पुणे महामार्ग, रेल्वे लाईन, काळेवाडी असा जातो. केएसबी चौक ते हिंजवडी हा रस्तादेखील साडेतेरा किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्यामुळेदेखील वाहतूक सोपी झाली आहे. टेल्को रोडदेखील १२ किलोमीटर लांबीचा बनविण्यात आलाआहे. प्रशस्त रस्त्यामुळे निगडीहून भोसरीहून नाशिक रस्त्यालाजाणे सोपे झाले आहे. एकूणच बाहेरून शहरात येणाऱ्या, यासह शहरातील नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने प्रशस्त रस्ते उपयुक्त ठरत आहेत. हे सर्व रस्ते शहरासाठी एकप्रकारे सेतू बनले आहेत. कोणत्याही दिशेने शहरात येऊन विनाअडथळा इच्छितस्थळी जाणे सोयीचे ठरत आहे. अशा रस्त्यांमुळे शहराला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. यासह वाहतूककोंडी सुटण्यासही मदत होत आहे. काही रस्त्यांची कामे सुरू असून, अशी कामे पूर्णत्वास गेल्यास अधिक सोयीचे होणार आहे.