शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

सेवाभावी डॉक्टरांची वारी

By admin | Updated: July 4, 2016 03:34 IST

पंढरीची वाट चालणाऱ्या वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी ठाण्यातील औषधवारी गुरुवारी प्रस्थान करीत आहे.

प्रज्ञा म्हात्रे,

ठाणे- पंढरीची वाट चालणाऱ्या वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी ठाण्यातील औषधवारी गुरुवारी प्रस्थान करीत आहे. श्री ज्ञानदेव सेवा मंडळातर्फे ठाण्यातील सेवाभावी डॉक्टर ओमप्रकाश शुक्ल यांच्या नेतृत्वाखाली २५ कार्यकर्त्यांच्या फौजफाट्यासह ही औषधवारी निघत आहे. वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा, या भावनेनेच हे सेवेकरी यात दरवर्षी सहभागी होतात. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या अनेक वारकऱ्यांना सांधेदुखी, पायाला सूज येणे, रक्तदाब वाढणे, जुलाब, खोकला, त्वचेचे विकार यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. वारीदरम्यान त्यांना औषधपाण्याची सोय नसल्याने वारकऱ्यांची मोठी पंचाईत होते. त्यांची ही अवस्था पाहून ३४ वर्षांपूर्वी मंडळाने वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना डॉ. शुक्ल यांच्या सहकार्याने मोफत वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. ४० टक्के अध्यात्म व ६० टक्के समाजसेवा हे मंडळाचे उद्दिष्ट असल्याने हा सामाजिक उपक्रम मंडळाने हाती घेतला. पहिल्या वर्षी चार ते पाच कार्यकर्त्यांना घेऊन ही औषधवारी निघाली होती. आता पाचचे २५ कार्यकर्ते झाले आहेत. छोट्या जीपपासून सुरू केलेला प्रवास आता मोठ्या बसने केला जातो. तब्बल सात दिवस डॉ. शुक्ल आणि त्यांची टीम वारकऱ्यांना अहोरात्र मोफत वैद्यकीय सेवा देते. या २५ जणांमध्ये १३ डॉक्टर्स आणि १२ संस्थेच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. देणगीदारांचा वर्षानुवर्षे प्रतिसाद वाढत असून यंदा आठ ते दहा लाखांची औषधे जमा झाली आहेत. यात ५० हजारांची औषधे मंडळ खरेदी करते व उर्वरित औषधे ही देणगीच्या स्वरूपात जमा केली जातात. अनेक महिन्यांपासून औषधांची जमवाजमव, वर्गीकरणाची तयारी सुरू होते. दररविवारी मंडळाच्या सभागृहात हे काम चालते. रविवारी वर्गीकरणाचा शेवटचा दिवस होता. विशेष म्हणजे डॉ. शुक्ल यांच्यासह येणारे डॉक्टर्स दवाखाना सातही दिवस बंद ठेवून सेवाभावी उद्देशाने औषधवारीत सहभागी होतात. या सात दिवसांत तब्बल आठ हजारांहून अधिक वारकऱ्यांना सेवा दिली जाते. आता प्रत्येक थांब्यावर आमची झाडे ठरली असून तेथेच कॅम्प लावला जातो.समाजऋण फेडण्याची भावना मनात ठेवून डॉ. शुक्ल यांनी ३४ वर्षांपूर्वी या कार्याला सुरुवात केली. आज वयाच्या ६७ व्या वर्षी ते अखंडपणे हे कार्य करीत आहेत. प्रत्येक वारकरी हा मला विठोबाच्या रूपाने भेटतो. आज या वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे ही सेवा अखंडपणे सुरू आहे. आदल्या वर्षी ज्या वारकऱ्याला औषधोपचार दिले, तो वारकरी पुढच्या वर्षी नक्की आम्हाला भेटून जातो आणि कौतुकाची थाप पाठीवर मारतो. ही थाप म्हणजे ईश्वराची थाप आहे आणि ती वारंवार मिळावी, म्हणूनच दरवर्षी ही औषधवारी घेऊन जात असतो, असे डॉ. शुक्ल सांगतात.वैद्यकीय सेवा देणारे डॉ. शुक्ल आणि त्यांची टीम यांना जेवण बनवून देण्यासाठी विभावरी जोशी ऊर्फ जोशीकाकू या गेल्या १६ वर्षांपासून त्यांच्यासोबत जात आहेत. वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या या सेवेकरींना स्वादिष्ट जेवण देणे, हेच जोशीकाकूंचे मुख्य उद्दिष्ट असल्याने वयाच्या ७६ व्या वर्षीही त्या ही जबाबदारी हसतमुखपणे सांभाळत आहेत. दरवर्षी या वारीतून वेगळ्या अनुभवाची शिदोरी आम्ही घेऊन येतो. मी सकाळी ६ वाजता उठून नाश्त्याच्या तयारीला लागते. थोडेसे जेवण जास्तच बनवते, कारण ज्या वारकऱ्याला जेवण मिळत नाही, त्यांनाही आम्ही जेवण देतो, असे जोशीकाकू आवर्जून सांगतात.