शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
2
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
3
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
4
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
5
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
6
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
7
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
8
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
9
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
10
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
11
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
12
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
13
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
14
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
15
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
16
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
17
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
18
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
19
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
20
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

सेवाभावी डॉक्टरांची वारी

By admin | Updated: July 4, 2016 03:34 IST

पंढरीची वाट चालणाऱ्या वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी ठाण्यातील औषधवारी गुरुवारी प्रस्थान करीत आहे.

प्रज्ञा म्हात्रे,

ठाणे- पंढरीची वाट चालणाऱ्या वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी ठाण्यातील औषधवारी गुरुवारी प्रस्थान करीत आहे. श्री ज्ञानदेव सेवा मंडळातर्फे ठाण्यातील सेवाभावी डॉक्टर ओमप्रकाश शुक्ल यांच्या नेतृत्वाखाली २५ कार्यकर्त्यांच्या फौजफाट्यासह ही औषधवारी निघत आहे. वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा, या भावनेनेच हे सेवेकरी यात दरवर्षी सहभागी होतात. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या अनेक वारकऱ्यांना सांधेदुखी, पायाला सूज येणे, रक्तदाब वाढणे, जुलाब, खोकला, त्वचेचे विकार यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. वारीदरम्यान त्यांना औषधपाण्याची सोय नसल्याने वारकऱ्यांची मोठी पंचाईत होते. त्यांची ही अवस्था पाहून ३४ वर्षांपूर्वी मंडळाने वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना डॉ. शुक्ल यांच्या सहकार्याने मोफत वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. ४० टक्के अध्यात्म व ६० टक्के समाजसेवा हे मंडळाचे उद्दिष्ट असल्याने हा सामाजिक उपक्रम मंडळाने हाती घेतला. पहिल्या वर्षी चार ते पाच कार्यकर्त्यांना घेऊन ही औषधवारी निघाली होती. आता पाचचे २५ कार्यकर्ते झाले आहेत. छोट्या जीपपासून सुरू केलेला प्रवास आता मोठ्या बसने केला जातो. तब्बल सात दिवस डॉ. शुक्ल आणि त्यांची टीम वारकऱ्यांना अहोरात्र मोफत वैद्यकीय सेवा देते. या २५ जणांमध्ये १३ डॉक्टर्स आणि १२ संस्थेच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. देणगीदारांचा वर्षानुवर्षे प्रतिसाद वाढत असून यंदा आठ ते दहा लाखांची औषधे जमा झाली आहेत. यात ५० हजारांची औषधे मंडळ खरेदी करते व उर्वरित औषधे ही देणगीच्या स्वरूपात जमा केली जातात. अनेक महिन्यांपासून औषधांची जमवाजमव, वर्गीकरणाची तयारी सुरू होते. दररविवारी मंडळाच्या सभागृहात हे काम चालते. रविवारी वर्गीकरणाचा शेवटचा दिवस होता. विशेष म्हणजे डॉ. शुक्ल यांच्यासह येणारे डॉक्टर्स दवाखाना सातही दिवस बंद ठेवून सेवाभावी उद्देशाने औषधवारीत सहभागी होतात. या सात दिवसांत तब्बल आठ हजारांहून अधिक वारकऱ्यांना सेवा दिली जाते. आता प्रत्येक थांब्यावर आमची झाडे ठरली असून तेथेच कॅम्प लावला जातो.समाजऋण फेडण्याची भावना मनात ठेवून डॉ. शुक्ल यांनी ३४ वर्षांपूर्वी या कार्याला सुरुवात केली. आज वयाच्या ६७ व्या वर्षी ते अखंडपणे हे कार्य करीत आहेत. प्रत्येक वारकरी हा मला विठोबाच्या रूपाने भेटतो. आज या वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे ही सेवा अखंडपणे सुरू आहे. आदल्या वर्षी ज्या वारकऱ्याला औषधोपचार दिले, तो वारकरी पुढच्या वर्षी नक्की आम्हाला भेटून जातो आणि कौतुकाची थाप पाठीवर मारतो. ही थाप म्हणजे ईश्वराची थाप आहे आणि ती वारंवार मिळावी, म्हणूनच दरवर्षी ही औषधवारी घेऊन जात असतो, असे डॉ. शुक्ल सांगतात.वैद्यकीय सेवा देणारे डॉ. शुक्ल आणि त्यांची टीम यांना जेवण बनवून देण्यासाठी विभावरी जोशी ऊर्फ जोशीकाकू या गेल्या १६ वर्षांपासून त्यांच्यासोबत जात आहेत. वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या या सेवेकरींना स्वादिष्ट जेवण देणे, हेच जोशीकाकूंचे मुख्य उद्दिष्ट असल्याने वयाच्या ७६ व्या वर्षीही त्या ही जबाबदारी हसतमुखपणे सांभाळत आहेत. दरवर्षी या वारीतून वेगळ्या अनुभवाची शिदोरी आम्ही घेऊन येतो. मी सकाळी ६ वाजता उठून नाश्त्याच्या तयारीला लागते. थोडेसे जेवण जास्तच बनवते, कारण ज्या वारकऱ्याला जेवण मिळत नाही, त्यांनाही आम्ही जेवण देतो, असे जोशीकाकू आवर्जून सांगतात.