शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

उष्माघाताचा दुसरा बळी, धुळ्यातील महिलेचा मृत्यू

By admin | Updated: March 30, 2017 11:34 IST

राज्यात उष्माघाताचा दुसरा बळी गेला आहे. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात उष्माघातामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 30 -  राज्यात उष्माघाताचा दुसरा बळी गेला आहे. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात उष्माघातामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मालती निकुंभे (49 वर्षे)असं मृत महिलेचं नाव असून त्या बाभुळदे गावातील माजी सरपंच होत्या. 
बुधवारी राज्यातील उष्माघाताचा पहिला बीडमध्ये गेला होता. बीडमध्ये रुपाबाई पिसळे (67)यांचा उष्माघातामुळे बळी गेला. रुपाबाई पिसळे या नांदुरघाटातील रहिवासी होत्या.
 
गेल्या दोन दिवसांत राज्यातील तापमानाने चाळीशी गाठली आहे. याचा नागरिकांना वाईट परिणाम होत आहे. 
उन्हाच्या तडाख्यामुळे लोकांना घराबाहेर पडणं कठिण झालं आहे.  वाढत्या तापमानामुळे व बदलामुळे पुढील 72 तास नागरिकांना सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 
 
दरम्यान, मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट कायम असून पुढील 24 तासांत अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबईतही तापमानात वाढ झाल्यानं नागरिक हैराण झाले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील/ विभागीय स्तरावरील/ महानगरपालिका अंतर्गत आरोग्य यंत्रणांशी समन्वय साधून उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. 
(बीडमध्ये उष्माघाताचा पहिला बळी)
काय करावे 
1.तहान नसेल तरीही जास्तीत जास्त पाणी प्यावे
2.हलके, पातळ व सच्छिद्र सूती कापड घालावे
3.बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलांचा वापर करावा
4.प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत घ्यावी
5.उन्हात काम करताना डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसंच ओल्या कापडाने डोकं, मान व चेहरा झाकावा
6.शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक इत्यादींचं सेवन करावं
7.अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हं ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
8.आपलं घरं थंड ठेवा, पडदे लावा, सनशेड बसवा आणि शक्य असल्यास रात्री खिडक्या उघड्या ठेवा
9.पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामं उरकावीत
10.जनावरांनाही सावलीत ठेवा आणि पुरेसे पाणी द्या.
11.थंड पाण्याची आंघोळ करा  
 
हे करू नका
1. दुपारी 12 ते 3 उन्हात फिरू नका.
2. मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ ड्रिंक्स पिणं टाळा, त्यामुळे डिहायड्रेशन होतं.
3. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळं अन्न खाऊ नका. 
4. पार्किंग केलेल्या वाहनात मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका. 
 
यंदा सरासरी ९५ टक्के पाऊस : जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट संस्थेने व्यक्त केला आहे़ त्यात ५ टक्के कमी-अधिक फरक पडू शकतो़ देशभरात ८८७ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ एलनिनोचा प्रत्यक्ष प्रभाव जुलैनंतर जाणवण्याची शक्यता आहे. जूनमध्ये १०२, जुलैमध्ये ९४, आॅगस्टमध्ये ९३ तर सप्टेंबरमध्ये ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.