शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघाताचा दुसरा बळी, धुळ्यातील महिलेचा मृत्यू

By admin | Updated: March 30, 2017 11:34 IST

राज्यात उष्माघाताचा दुसरा बळी गेला आहे. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात उष्माघातामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 30 -  राज्यात उष्माघाताचा दुसरा बळी गेला आहे. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात उष्माघातामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मालती निकुंभे (49 वर्षे)असं मृत महिलेचं नाव असून त्या बाभुळदे गावातील माजी सरपंच होत्या. 
बुधवारी राज्यातील उष्माघाताचा पहिला बीडमध्ये गेला होता. बीडमध्ये रुपाबाई पिसळे (67)यांचा उष्माघातामुळे बळी गेला. रुपाबाई पिसळे या नांदुरघाटातील रहिवासी होत्या.
 
गेल्या दोन दिवसांत राज्यातील तापमानाने चाळीशी गाठली आहे. याचा नागरिकांना वाईट परिणाम होत आहे. 
उन्हाच्या तडाख्यामुळे लोकांना घराबाहेर पडणं कठिण झालं आहे.  वाढत्या तापमानामुळे व बदलामुळे पुढील 72 तास नागरिकांना सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 
 
दरम्यान, मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट कायम असून पुढील 24 तासांत अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबईतही तापमानात वाढ झाल्यानं नागरिक हैराण झाले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाच्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील/ विभागीय स्तरावरील/ महानगरपालिका अंतर्गत आरोग्य यंत्रणांशी समन्वय साधून उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. 
(बीडमध्ये उष्माघाताचा पहिला बळी)
काय करावे 
1.तहान नसेल तरीही जास्तीत जास्त पाणी प्यावे
2.हलके, पातळ व सच्छिद्र सूती कापड घालावे
3.बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलांचा वापर करावा
4.प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत घ्यावी
5.उन्हात काम करताना डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसंच ओल्या कापडाने डोकं, मान व चेहरा झाकावा
6.शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक इत्यादींचं सेवन करावं
7.अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हं ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
8.आपलं घरं थंड ठेवा, पडदे लावा, सनशेड बसवा आणि शक्य असल्यास रात्री खिडक्या उघड्या ठेवा
9.पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामं उरकावीत
10.जनावरांनाही सावलीत ठेवा आणि पुरेसे पाणी द्या.
11.थंड पाण्याची आंघोळ करा  
 
हे करू नका
1. दुपारी 12 ते 3 उन्हात फिरू नका.
2. मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ ड्रिंक्स पिणं टाळा, त्यामुळे डिहायड्रेशन होतं.
3. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळं अन्न खाऊ नका. 
4. पार्किंग केलेल्या वाहनात मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका. 
 
यंदा सरासरी ९५ टक्के पाऊस : जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट संस्थेने व्यक्त केला आहे़ त्यात ५ टक्के कमी-अधिक फरक पडू शकतो़ देशभरात ८८७ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ एलनिनोचा प्रत्यक्ष प्रभाव जुलैनंतर जाणवण्याची शक्यता आहे. जूनमध्ये १०२, जुलैमध्ये ९४, आॅगस्टमध्ये ९३ तर सप्टेंबरमध्ये ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.