शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

माणसं गिळतोय समुद्र

By admin | Updated: October 1, 2015 00:28 IST

गुहागर तालुका : मज्जा करायला आले, जीव देऊन गेले

संकेत गोयथळे- गुहागर तालुक्याला ३५ किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. पुणे, मुंबई व इतर भागातून आलेल्या पर्यटकांना समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा मोह टाळता येत नाही. सुट्टीत मज्जा करण्याच्या मुडमध्ये समुद्रात डुंबत असतात. यातून सन २००४पासून तब्बल २५हून अधिक पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. समुद्रामध्ये बुडताना एखाद्याला वाचवणे हे कठीण काम असले तरी वेळीच सुरक्षा समन्वयक किंवा तातडीने कोणी वाचवण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात अनेक जीव वाचू शकतात. यासाठी स्थानिक प्रशासन असलेल्या नगरपंचायतीसह पोलीस व ग्रामस्थांचीही तेवढीच जबाबदारी आहे.सलग लांबीच्या बाबतीत केरळमधील मद्रासच्या मरीना बीचला १२ किलोमीटर लांबीची किनारपट्टी आहे. यानंतर गोवा व गुहागर, असगोली गावाला ७ कि. मी. ची सलग किनारपट्टी आहे. येथील धार्मिक कौटंुबिक पर्यटनाबरोबरच गोव्याच्या धर्तीवर समुद्रात पोहण्याची मजा घेण्यासाठी अनेक युवा पर्यटक येतात. पुणे, मुंबईसाठी गोव्याला पर्याय म्हणून गुहागरला पर्यटक पसंती देत आहेत. राई भातगाव पूल व धोपावे फेरीबोट सेवेनंतर आता गुहागरात पर्यटकांची रेलचेल वाढू लागली आहे.सन २००४मध्ये पहिल्यांदाच पुणे येथील तारदाळकर कुटुंबातील एकाचवेळी पाचजण बुडाले होते. गुहागरच्या समुद्रात पर्यटक बुडण्याची ही पहिलीच वेळ होती व त्यामध्ये पूर्ण कुटुंबच गेल्याने या मोठ्या घटनेचा सर्वांनीच धसका घेतला.अलीकडचा विचार करता मागील दोन घटनेत पंधरा जणांना जीव गमवावा लागला आहे. यामधील बहुतांशी मृत्यू हे नव्याने झालेल्या जेटी शेजारील पाण्यात डुंबताना झाले आहेत. २० मार्च २०१४रोजी पाचजण बुडाले होते. सन २०१५मध्ये शेख व चांदा कुटुंबीयांमधील सातजण असे एकूण १० जणांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या दहा वर्षात जेवढे मृत्यू झाले नाहीत एवढे बुडून गेल्या दोन वर्षात झाले आहे. याचे प्रमुख कारण नव्याने झालेली जेटी आहे असे ग्रामस्थ मानतात ही बाब खरी असली तरीही समुद्रकिनारी कुठल्याही प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था ठेवलेली नाही. नगरपंचायतीतर्फे येथे कोणीही सुरक्षा समन्वयक नाही. महसूल विभागातर्फे असणारा आपत्कालीन विभाग फक्त कागदावरच असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.पर्यटक गुहागरला भेट देतात. पर्यटन वाढवायचे असेल तर या पर्यटकांना पाण्यामध्येच उतरु नका असे सांगणे चुकीचे आहे. यासाठी गोवा व गणपतीपुळे येथील उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन नियोजन केले पाहिजे. गोव्याच्या किनाऱ्यावर लाखो पर्यटक येतात. मात्र, त्याप्रमाणात होणारे अपघात नाममात्र आहेत. कारण येथे वेगळी सुरक्षा यंत्रणा आहे. पाण्याची खोली व पर्यटकांचा अतिउत्साह लक्षात घेऊन वेळोवेळी सक्त सुचना देऊन बाहेर काढले जाते. गणपतीपुळेमध्येही यापूर्वी भाविक व पर्यटकांचे बुडण्याचे प्रमाण मोठे होते. आता येथेही सुरक्षा समन्वयक ठेवल्याने सहसा अपघात होत नाहीत. अनेकजणांना बुडताना बाहेर काढण्यात आले आहे, याचा धडा प्रशासनाने घेतला पाहिजे.तसेच बुडण्याचा धोका टळावा यासाठी जेटीचा पुढील भाग हा बंदीस्त करुन जेटीच्या दोन्ही बाजूंनी रेलींग करणे आवश्यक आहे. ही प्लोटींग जेटी असल्याने समुद्राच्या मुखात काही मीटर आतमध्ये आहे. येथे पाणी खोली वाढते तसेच लाटांचा मारा पूर्ण होत नसल्याने येथील पाणी दिशा बदलत असते.बुडणाऱ्यांची यादी मोठीसन २००५मध्ये अजित चंद्रकांत निमकर (२५, चिपळूण), मनोहर लक्ष्मण शिंदे (३५, तुंबाड, ता. खेड) यांना प्राण गमवावे लागले. यानंतर प्रशांत कणभरे (३०), गौरव कुडाळे (१९), अविनाश जाधव (२४), अमोल माळवे (२१), रुपेश पवार (२२) हे मित्र एकमेकांना वाचविण्यामध्ये समुद्रात ओढले गेले. २०१० मध्ये नागपूर येथील शेखर महाजन, २०१४ मध्ये प्रितेश पांडुरंग बोबले (२२, तांबी, चिपळूण) याचा बळी गेला. यानंतर महाविद्यालयीन सहलीमधील तरुण बुडाले होते. मुंबई आयटीमधील तरुण तसेच चिपळूण शहरातील एका दुकानदाराचा मुलगाही बुडाला होता.गुहागर अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस्तर्फे दोन वर्षे स्पीड बोट गेम सुविधा सुरु करण्यात आली. व्यवस्थापक मयुरेश साखरकर व स्पीड बोट चालक प्रदेश तांडेल यांच्या सहाय्याने काही पर्यटकांना बुडताना वाचवण्यात आले. ही बाब लक्षात घेता तातडीची मदत मिळाल्यास अनेक जीव वाचू शकतात. यासाठी नियोजन व्हायला हवे. वर्षभरातील दहाजणांचा मृत्यू होताना ही स्पीड बोट बंद होती, हेही गंभीर आहे.