शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीत मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
2
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
5
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
6
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
9
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
10
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
11
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
12
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
13
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
14
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
15
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
16
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
17
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
18
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
19
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
20
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीमध्ये विज्ञान लेखकांची भूमिका मोठी

By admin | Updated: February 5, 2017 00:30 IST

जळगावमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या तिसऱ्या विज्ञान साहित्य संमेलनात लोकमतचे

- जळगावमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या तिसऱ्या विज्ञान साहित्य संमेलनात लोकमतचे कार्यकारी संपादक (डिजिटल) चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित भाग.माहितीच्या ढिगाचे रूपांतर ज्ञानात होण्याची प्रक्रि या गॅलिलिओच्या कर्तृत्वामुळे जगभरात सुरू झाली. माहितीचा व पूर्वानुभवाचा ढिगारा विज्ञानाचेच सख्खे भावंड असलेल्या गणिताच्या मुशीत घातल्यानंतर यंत्रशास्त्र विकसित झाले. ग्रहगणित सिद्ध झाले. निसर्गातील रहस्यांची उकल होऊ लागली. मॅक्सवेल आणि न्यूटन या दोन खांबांचा भक्कम आधार मिळाल्यावर आधुनिक विज्ञानाची वास्तू उभी राहिली. इंग्रजी भाषेत गेल्या शे-दोनशे वर्षांत झालेले विज्ञान लेखन हा त्याचाच परिपाक होता. इंग्रजी भाषेच्या तुलनेत मराठीतील विज्ञान लेखनाची सुरुवात अंमळ उशिराने झाली. विज्ञान लेखनाच्या बाबतीत एक सनातन प्रश्न उपस्थित केला जातो - या प्रांतात मूळ विचार, सिद्धांत अथवा निष्कर्षाला जास्त महत्त्व द्यावयाचे, की भाषेची शैली आणि समृद्धीला अधिक महत्त्व द्यावयाचे? माझ्या मते भाषा समृद्ध झाल्यामुळेच अमूर्त संकल्पनांना अचूक अर्थवाही कोंदण मिळू शकले. वैज्ञानिक वा संशोधक हे बिरूद लागू शकेल अशा मोजक्या प्रतिभासंपन्न व्यक्तींपुरते मर्यादित असलेले ज्ञान सामान्य विज्ञानाच्या रूपात जनसामान्यांपर्यंत नेण्याचे काम विज्ञान लेखकांच्या वाट्याला आले आहे. ही विज्ञानाची नव्हे, तर अज्ञानाविरुद्धची लढाई आहे. विज्ञानातील प्रयोग आणि जादूचे खेळवजा चमत्कृती यातील महद्अंतर समजण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीचा पिंड जोपासला जाणे ही पूर्वअट बनते. वैज्ञानिकांनी संशोधन करावे आणि वैज्ञानिक दृष्टीचा प्रचंड अभाव असलेल्या समाजाने आपला भावनिक-आध्यात्मिक पिंड जोपासत राहावे, अशा स्थितीतून विज्ञान आणि समाज यांच्यात निर्माण झालेली दरी कमी करण्याचा वसा घेतलेले दूत म्हणजे विज्ञान लेखक. विज्ञान भावनांवर चालत नाही. श्रद्धा, सहिष्णुता, भाबडेपणा हे ज्याला वर्ज्य आहे, विज्ञान मानवी संस्कृतीला कोठवर नेणार आहे याचा भविष्यवेधी आडाखा सामान्यांच्या पुढ्यात मांडण्याचे काम विज्ञान लेखकांनी मराठीत सुरू केलेही आहे. वास्तवाचे भान ही या लेखनाची पूर्वअट ठरते. वस्तुस्थिती प्रतिभेची मागणी करते तेव्हा त्यातून विज्ञान लेखनाची कलाकृती साकारते. असिमॉव्ह, आर्थर क्लार्कयांनी हेच तर सिद्ध केले. आधी विज्ञान, मग शब्द या क्रमाला विज्ञान लेखनात महत्त्व असायला हवे. कल्पनेच्या भराऱ्या मारायच्या तर ‘अ‍ॅलिस इन वंडरलॅण्ड’सारखे लेखन विपुल करू शकणारे लेखक कमी नाहीत. अर्थात कल्पनेची अफाट भरारी घेणारे रूपक आणि बावनकशी विज्ञान यांच्यात प्रीतीसंगमातून ज्युरासिक पार्कसारखी कलाकृती जन्माला येते.