शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांना ‘भारतरत्न’ मिळालेच पाहिजे: उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 24, 2017 03:30 IST

देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जगाला कळावे, यासाठी त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळालाच पाहिजे,

ठाणे : देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जगाला कळावे, यासाठी त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळालाच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रविवारी २९ व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केले. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये गेले तीन दिवस सुरू असलेल्या सावरकर साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी झाला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना उद्धव ठाकरे यांनी सावकरांची महती सांगितली. एवढे वाचन करूनही सावरकर मलाही पूर्णत: समजले नाहीत, अशी प्रांजळ कबुली देत, ही महान व्यक्ती महाराष्ट्रात जन्मली हे आपल्या सर्वांचेच भाग्य असल्याचे ठाकरे म्हणाले. देशावर जेव्हा-जेव्हा गंडांतर आले, तेव्हा-तेव्हा महाराष्ट्राच्या मातीत कोणते-ना-कोणते दैवत जन्माला आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा बाबासाहेब आंबेडकरांसारख्या थोर पुरुषांनी केवळ राज्याचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे नेतृत्व केले आहे. या थोर पुरुषांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, परंतु त्यापूर्वी हे थोर पुरुष स्वत: समजून घेणे आवश्यक आहे. शिवरायांनी वयाच्या १५ व्या वर्षी, तर सावरकरांनी वयाच्या १६ व्या वर्षी देशहितासाठी स्वत:ला झोकून दिले. इंग्रज अधिकाऱ्याचा वध करणारे चाफेकर बंधू हसत-हसत फासावर चढले. एकाच कुटुंबातील तीन मुले फासावर चढण्याचे उदाहरण जगात अन्यत्र कुठेही नसेल. पारतंत्र्याच्या बेड्या आवळत असताना, सावरकरांसारखा सूर्य महाराष्ट्रात जन्माला आला. त्यांनी देशासाठी काय-काय भोगले हे जाणून घेतल्याशिवाय तरुण पिढीला स्वातंत्र्याचे महत्त्व समजणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अखंड हिंदुस्तानाचे स्वप्न सावरकरांनी पाहिले होते. ते कधी पूर्ण होणार, असा प्रश्न करून, काश्मीरमधील पाकपुरस्कृत हल्ले आणि अरुणाचलमधील गावांची नावे बदलणाऱ्या चीनचा ठाकरे यांनी निषेध केला. जास्तीत जास्त हिंदुंनी सैन्यात भरती व्हावे. साहित्यिकांनीही लेखण्या मोडून बंदुका हाती घ्याव्या, या सावरकरांनी केलेल्या आवाहनाचे स्मरण ठाकरे यांनी करून दिले. सावरकरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करणे देशासाठी महत्त्वाचे आहे. सावरकर हे या देशाचे रत्न होते, हे जगाला कळावे, यासाठी ते आवश्यक आहे. सरकार आपलेच आहे. त्यामुळे यासाठी कुणाच्या परवानगीची आहे, असा प्रश्न करून, ही मागणी शासनदरबारी रेटण्यासाठी एकजुटीने समोर येण्याचे आवाहनही ठाकरे यांनी केले. सावरकर म्हणजे हजारो व्होल्टेज असलेले ऊर्जा केंद्र आहे. हे संमेलन सर्व कार्यकर्त्यांचे परिश्रम आहे, पण संमेलनानंतर आपण सावरकरांचे विचार किती आत्मसात करणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राजकारणाचे हिंदुत्वीकरण झाले पाहिजे आणि सामाजिक समरसता ही सावरकरांची दोन सूत्रे महत्त्वाची असून, ती व्यक्तिगत, सार्वजनिक आणि राजकीय जीवनात प्रत्यक्षात येणे आवश्यक आहे, असा आग्रह संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे यांनी धरला. सावरकरांचे विचार आपल्याला जगावे लागतील, तरच सामर्थ्य निर्माण होईल. कोणताही हिंदू अस्पृश्य असणार नाही. मी माझ्या जातीपुरता मर्यादित राहाणार नाही. आपण सावरकर जगलो, तरच या संमेलनाचे सार्थक होईल, असे ते म्हणाले. तत्पूर्वी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेही समयोचित भाषण झाले. सावरकरांना मरणोत्तर भारतरत्नने गौरवित करण्याच्या मागणीचा त्यांनी या वेळी पुनरुच्चार केला. सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी संमेलनाच्या तीन दिवसांचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)संमेलनाध्यक्षांकडून सारवासारवसाहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये सावरकर विचारविरोधी नेत्यांना स्थान दिल्याने टीकेचे धनी झालेल्या आयोजकांनी समारोप सोहोळ्यामध्ये परखड विचार मांडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे म्हणाले, झोपणं हा हिंदूंचा स्थायी भाव आहे. फ्रान्स आणि इंग्लंडसारख्या देशांचे पत्रकार भारताच्या सद्यस्थितीचे वर्णन करताना हिंदूंच्या अस्तित्वाचा हा शेवटचा लढा असल्याचे म्हणतात. त्यामुळे आतातरी हिंदूंनी जागले पाहिजे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर अप्रत्यक्ष टीका करताना ते म्हणाले, इटालियन महिला देशावर राज्य करण्याचे स्वप्न पाहते. देशात धर्मांतराचा धुमाकूळ सुरु असताना हिंदू जण अस्पृश्यतेच्या भिंतींमध्ये अडकले असतील तर ते लज्जास्पद आहे. एखाद्या जातीवर अन्याय होत असेल, तर तो अन्याय समस्त हिंदूंवर आहे, हे समजून पुढे यावे. ही भावना लोकांमध्ये दृढ झाली तरच संमेलनाचे सार्थक होईल, असे पतंगे म्हणाले.शालेय अभ्यासक्रमात सावरकरांचा समावेश - तावडेस्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहसी जीवन, त्यांचे साहित्य तरुण पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यवीर, साहित्यिक, साहसी आणि एक संवेदनशील व्यक्ती म्हणून सावरकरांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले. विद्यार्थ्यांना इतिहास शिकविण्याच्या पद्धतीवरही तावडे यांनी नापसंती व्यक्त केली. सावरकरांनी समुद्रात कधी उडी मारली, शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला याच्या तारख्या उत्तरपत्रिकेत लिहिल्या की विद्यार्थ्यांना गुण मिळतात. वास्तविक केवळ तारखांपेक्षा या थोर पुरूषांचा इतिहास समजावण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे तावडे म्हणाले.