शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

समीरविरुद्ध भक्कम परिस्थितीजन्य पुरावे

By admin | Updated: January 24, 2016 00:10 IST

कॉ. गोविंद पानसरे खूनप्रकरणी अटक केलेल्या समीर गायकवाडविरूद्ध थेट पुरावे नसले तरी परिस्थितीजन्य भक्कम पुरावे आहेत. त्याआधारे खटला चालविला जाऊ शकतो.

पुणे : कॉ. गोविंद पानसरे खूनप्रकरणी अटक केलेल्या समीर गायकवाडविरूद्ध थेट पुरावे नसले तरी परिस्थितीजन्य भक्कम पुरावे आहेत. त्याआधारे खटला चालविला जाऊ शकतो. समीरला जामीन न मिळण्यासाठी सोमवारी विशेष प्रयत्न केले जातील, असे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी स्पष्ट केले. पानसरे खूनप्रकरणाच्या तपासावर स्वत: मुख्यमंत्री विशेष लक्ष देत असल्याचेही त्यांनी सांगितले.कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांनी पुण्यातील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. निंबाळकर यांची या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली होती. दोन महिन्यांपासून त्याबाबत चर्चा सुरू होती. बुधवारी अ‍ॅड. निंबाळकर यांनी राज्य शासनाला या खटल्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असल्याचे कळविले. त्यानुसार शुक्रवारी त्यांची नियुक्ती करण्यात आली. समीरने कोल्हापुरातील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयाला अ‍ॅड. निंबाळकर यांच्या नियुक्तीची माहिती दिली. सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निंबाळकर यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. निंंबाळकर यांची सहाव्यांदा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. आधीच्या तीन प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली आहे. तर दोन खटल्यांची सुनावणी अद्याप सुरू आहे.निंबाळकर म्हणाले, विशेष तपास पथकाने समीरला अटक केली असून आणखी दोघांचा शोध सुरू आहे. खटल्यात ७७ साक्षीदार आहेत. जोशी-अभ्यंकर खून खटला, नयना पुजारी खटला यांसारख्या मोठ्या खुन खटल्यातही परिस्थितीजन्य पुरावेच महत्त्वाचे ठरले. हे खटले निकाली निघाले. समीरच्या घर झडतीत १० ते १२ मोबाईल, सनातन संस्थेशी संबंधित दस्तावेज जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे दूरध्वनी व एसएमएसवरील संभाषणाची माहिती हे सर्व परिस्थितीजन्य पुरावे आहेत. त्याप्रमाणे एक साक्षीदारही महत्त्वाचा आहे. त्याआधारे सोमवारी न्यायालयात समीरचा जामीन नामंजूर होण्यासाठी प्रयत्न केले जातील. (प्रतिनिधी)खटला कोल्हापुरातच चालणार?कोल्हापूर सोडून इतरत्र खटला चालविण्याबाबत सनातन संस्थेने उच्च न्यायालयात याचिका केली असली तरी राज्य सरकारकडून हा खटला तेथेच चालविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खटला दुसरीकडे चालविण्यासाठी काही ठोस कारण दिसत नाही. त्याबाबत महाधिवक्त्यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडावी, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली आहे, असे निंबाळकर यांनी सांगितले.डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे व एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येत साम्य आहे. त्यांच्या हत्येनंतर सापडलेल्या पुंगळ््यांवरून एकाच हत्यारातून गोळ््या झाडण्यात आल्याचे तसेच एकाच संघटनेने हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. अद्याप कर्नाटक सीआयडीकडून कलबुर्गी हत्येबाबतची माहिती मिळालेली नाही, असेही निंबाळकर म्हणाले.