शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जीवनावश्यक वस्तूंच्या दरनियंत्रणासाठी कक्ष

By admin | Updated: March 5, 2016 03:38 IST

जीवनावश्यक २२ वस्तूंचे दर राज्यात नियंत्रणात राहावेत यासाठी राज्यस्तरीय किंमत देखरेख कक्ष स्थापन करावा. त्यात संबंधित मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी असावेत

यदु जोशी,  मुंबईजीवनावश्यक २२ वस्तूंचे दर राज्यात नियंत्रणात राहावेत यासाठी राज्यस्तरीय किंमत देखरेख कक्ष स्थापन करावा. त्यात संबंधित मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी असावेत, या वस्तूंच्या दरात अचानक वाढ झाली तर किंमत स्थिरीकरण निधी स्थापन करून ग्राहकांना रास्त दरात वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, अशी शिफारस राज्य ग्राहक धोरण समितीने केली आहे. राज्यात प्रभावी ग्राहक धोरण आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. समितीने आपला अहवाल राज्य शासनाला अलीकडेच सादर केला. किमतींमधील लक्षणीय चढउतार रोखण्यासाठी प्रभावी शासकीय हस्तक्षेप असावा, असे समितीने म्हटले आहे. राज्य, विभागीय, जिल्हा आणि तालुका स्तरावर ग्राहक कल्याण सल्लागार समिती स्थापन करावी, जिल्हा आणि तालुकास्तरावर ग्राहक संरक्षण यंत्रणा असावी, ग्राहक संरक्षणाचे विविध उपक्रम राबविण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी. याशिवाय, केंद्रीय ग्राहक कल्याण निधी, ग्राहक न्यायालयातील दंड व फी, विक्रीकरण व मूल्यवर्धित कर परतावा आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमार्फत (सीएसआर) निधी उभारावा, असे समितीने सुचविले आहे. विद्यापीठ स्तरावर ग्राहक हक्क व कर्तव्य याबाबत अभ्यासक्रम असावा. उच्च माध्यमिक शाळेत नागरिक शास्त्राच्या पुस्तकात ग्राहक संरक्षणाबाबत जागृती करणारा पाठ समाविष्ट करावा, असे समितीने म्हटले आहे.निरनिराळ्या जाहिराती चंगळवादाला खतपाणी तर घालतातच; पण अनेक वेळा दिशाभूलही करतात. जाहिरातींचे नियमन केले जावे यासाठी जाहिरात देखरेख व नियमन समिती असावी. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हे राज्य समितीचे अध्यक्ष असतील, असे समितीने म्हटले आहे. १५ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन असून त्या वेळी शासनाने हे ग्राहक धोरण जाहीर करावे, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे. बाजारपेठेचे सतत सर्वेक्षण करणारी यंत्रणा उभारावी. ग्राहक जागृतीचे कार्य करणाऱ्या संस्थांना आर्थिक पाठबळ द्यावे. ग्राहकांच्या हितसंरक्षणासाठी राज्य व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदांची स्थापना करावी. ग्राहक न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा येत्या तीन वर्षांत करावा. ग्राहक हिताची माहिती प्रसारित करण्यासाठी पूर्णत: समर्पित वाहिनी असावी.शासकीय प्रयोगशाळांमध्ये ग्राहक संघटनांना वस्तूंची तपासणी करून घेण्याची सुविधा माफत दरात पुरवावी. ग्राहक हिताचे काम करणाऱ्या संघटना, व्यक्तींना ग्राहक मित्र पुरस्कार द्यावेत. उचित व्यापार करणाऱ्यांनाही सन्मानित करावे. प्रत्येक बाबीसाठी ग्राहकाला ग्राहक न्यायालयात धाव घ्यावी लागू नये यासाठी तक्रार निवारण केंद्रांचे जाळे व्यापक करावे. कृषीमालाच्या थेट खरेदी-विक्रीसाठी शेतकरी व ग्राहक यांच्यासाठी ठिकठिकाणी केंद्रे उभारावीत.