शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पावसाने बळीराजा सुखावला!

By admin | Updated: June 13, 2017 01:06 IST

कोकण किनारपट्टीवरून घाटमाथ्यावर आलेल्या मान्सूनची दोन दिवसांत दमदार वाटचाल झाली असून मऱ्हाटी मुलुखात सर्वदूर पाऊस बरसू लागला आहे. सोमवारी

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई/पुणे : कोकण किनारपट्टीवरून घाटमाथ्यावर आलेल्या मान्सूनची दोन दिवसांत दमदार वाटचाल झाली असून मऱ्हाटी मुलुखात सर्वदूर पाऊस बरसू लागला आहे. सोमवारी कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला असून पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. सोलापूर शहर तर जलमय झाले आहे. मराठवाड्यात वीज पडून सात महिलांचा तर विदर्भात तिघांचा मृत्यू झाला.मान्सूनने सोमवारी मध्य अरबी समुद्र, कोकणचा आणखी काही भाग, उत्तर अरबी समुद्र, वलसाडसह गुजरातचा काही भागात, अंतर्गत कर्नाटक, रायलसीमेचा उर्वरित भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा आणखी काही भाग, उत्तर बंगालच्या उपसागराचा बहुतांश भागात प्रवेश केला़ मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील काही भाग वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा, तुळजापूर, उमरगा, कळंब, भूम, उस्मानाबाद तालुक्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली़ रविवारी तुळजापूर, लोहाऱ्यासह भूम परिसरातही चांगला पाऊस झाला. नांदेड शहर व परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास दमदार पाऊस झाला. नायगाव, लोहा शहरातही पावसाने हजेरी लावली़ लातूर जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस अहमदपूर, चाकूर व देवणी तालुक्यात झाला आहे़ शिरूर अनंतपाळ, औसा, चाकूर तालुक्यात अनेक ठिकाणी पेरण्या सुरू आहेत़परभणी शहर व परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला़ पाथरी, सेलू, मानवत, पूर्णा आदी ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली़ हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. औंढा तालुक्यातील टाकळगव्हाण येथे शेतात काम करीत असताना वीज पडून तीन महिला जखमी झाल्या आहेत. बीड जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. पाटोदा, माजलगाव, केज, आष्टी, अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. हर्सूल, कर्जत, मोहोळ ७०, माढा, सोलापूर, त्र्यंबकेश्वर ६०, अक्कलकोट, शेवगाव, सिन्नर ५०, गगनबावडा, महाबळेश्वर, ओझर (नाशिक) ४०, चंदगड, ओझरखेडा, पेठ, राहुरी ३०, इंदापूर, जामखेड , राहाता, सांगोला २०, अहमदनगर, दहिवडी, दिंडोरी, इगतपुरी, खंडाळा बावडा, वडज, माळशिरस, पारनेर, राधानगरी, श्रीगोंदा येथे १० मिमी पाऊस पडला़मराठवाड्यात सात महिला मृत्युमुखीमराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात कारला (ता. उमरी) येथे शेतात काम असलेल्या पाच महिलांचा वीज कोसळून मृत्यू झाला. शोभाबाई देवीदास जाधव (वय ४८), मोहनाबाई गंगाधर सोनवणे (४८), शोभाबाई संभाजी भूताळे (४५, शेतमालक), रेखाबाई मारोती पवळे (३६) आणि शेषाबाई माधव गंगावणे (४९) अशी मृतांची नावे आहेत. दुसरी दुर्घटना जालना जिल्ह्यात खडकावाडी (ता. घनसावंगी) येथे घडली. शेतात काम करीत असताना अंगावर वीज कोसळून सबीना बी शेख इकबाल शेख नूर (४०), आणि सीमा शेख इकबाल शेख नूर (१९) या मायलेकी मृत्युमुखी पडल्या. विदर्भात वीज पडून तिघांचा मृत्यू विदर्भात चंद्रपूर, यवतमाळ वर्धा येथे दमदार सरी कोसळल्या चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात वीज कोसळल्याने शेतात काम करीत अससेल्या तिघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. लटारी रामा वाटगुरे (वय ६५), वर्षा रवींद्र गावतुरे (३२, दोघेही रा. पद्मापूर जि. चंद्रपूर ) आणि प्रकाश गुलाबराव नेवारे(४०) अशी मृतांची नावे आहेत. यवतमाळ जिल्ह्यात नाल्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेल्याने एक बालिका बेपत्ता झाली आहे.