शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

पंजाबने आश्वासने पाळली; मात्र महाराष्ट्राकडून निव्वळ घोषणा

By admin | Updated: January 16, 2016 01:25 IST

घुमान प्रशासनाच्या पुढाकाराने संत नामदेवांबाबतची विविध कामे मार्गी लावण्यात येत असली तरी दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने मात्र आपल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही.

- सुधीर लंके,  पुणेघुमान प्रशासनाच्या पुढाकाराने संत नामदेवांबाबतची विविध कामे मार्गी लावण्यात येत असली तरी दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने मात्र आपल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात साहित्य महामंडळाने एकूण १५ ठराव केले होते. त्यातील बहुतांश ठराव घुमानचा विकास व संत नामदेव यांच्या संदर्भात होते. संत नामदेवांचे घुमान येथे दीर्घकाळ वास्तव्य राहिले असल्याने घुमानचे नामकरण करण्याचा प्रमुख ठराव त्यामध्ये होता. या ठरावाला प्रतिसाद देऊन स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे.पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी अमृतसर येथील गुरुनानक विद्यापीठात ‘संत नामदेव अध्यासन’ सुरू करण्याची घोषणाही त्या वेळी केली होती. मात्र, तज्ज्ञ व्यक्ती सरकारला अद्याप मिळालेली नसल्याने अध्यासन सुरू झालेले नाही, असे घुमान संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व संमेलनाचे आयोजक ‘सरहद’ संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बादल यांनी घुमानमध्ये संत नामदेवांच्या नावाने पदवी महाविद्यालय सुरू करण्याचेदेखील जाहीर केले होते. या महाविद्यालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या जूनपासून ते सुरू होईल, असे मोरे यांनी सांगितले. ‘पंढरपूर-घुमान’ ही दोन भक्तिपीठे जोडण्यासाठी या दोन स्थळांदरम्यान थेट रेल्वे सेवा असावी, असाही ठराव करण्यात आला होता. या मागणीच्या पूर्ततेसाठी घुमानजवळील ‘काद्यान ते बियास’ या दोन गावांदरम्यान रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पंजाबच्या आदरातिथ्याने महाराष्ट्राचे सारस्वत तसेच सरकारही भारावून गेले होते. या संमेलनाच्या समारोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-पंजाब हा धागा घट्ट करण्यासाठी नांदेड येथे शीख समाजाचे धर्मगुरू गुरूगोविंदसिंग यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्याची घोषणा केली होती. नांदेडच्या विद्यापीठाकडून तसा प्रस्ताव सरकारला पाठविण्यातही आला. मात्र त्यावर अद्याप शासनाने निर्णय घेतलेला नाही. महाराष्ट्र सरकारने नामदेवांच्या नावाने परराज्यातील व्यक्तीसाठी पुरस्कार सुरू करण्याची अपेक्षा संमेलनाध्यक्ष मोरे यांनी केली होती; मात्र त्याबाबतही कार्यवाही झालेली नाही.