शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

प्रलंबित तपासांमुळे आरोपी मोकाट

By admin | Updated: October 15, 2016 03:21 IST

सोलापूरमधील एका युवकाच्या हत्येप्रकरणाचा तपास गेले चार वर्षे प्रलंबित असल्याने उच्च न्यायालयाने राज्याच्या कायदा व सुव्यस्थेच्या स्थितीवरून राज्य सरकारला

मुंबई: सोलापूरमधील एका युवकाच्या हत्येप्रकरणाचा तपास गेले चार वर्षे प्रलंबित असल्याने उच्च न्यायालयाने राज्याच्या कायदा व सुव्यस्थेच्या स्थितीवरून राज्य सरकारला शुक्रवारी फैलावर घेतले. तपास करण्यास विलंब होत असल्याने राज्यातील शिक्षेच्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी आरोपी मोकाट सुटले आहेत. ही स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना आखा, असे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले.सोलापूरचे रहिवासी भिवा हजारे यांच्या मुलाची हत्या करून आरोपी मोकाट फिरत आहेत. मात्र पोलीस काहीच हालचाल करत नसल्याने हजारे यांनी उच्च न्यायालयात याप्रकरणाचा तपास वर्ग करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती.गेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने एका वर्षापेक्षा अधिक काळ तपास न केलेल्या गंभीर गुन्ह्यांची यादी सादर करण्याचे निर्देश सोलापूर पोलिसांना दिले होते. त्यावर सोलापूरच्या वकिलांनी गंभीर गुन्ह्यांच्या ५८ प्रकरणांचा तपास न केल्याचे मान्य केले.‘एकट्या सोलापूरची ही स्थिती तर उर्वरित राज्याची कल्पनाच केलेली बरी. पोलीस तपास करत नसल्याने पीडित उच्च न्यायालयात याचिका दाखल करतात. वेळेत तपास न झाल्याने आम्हाला आरोपींची निर्दोष मुक्तता करावी लागते. त्यामुळे आरोपींना असे वाटते, की त्यांनी गुन्हा केला तरी त्यांना काहीच होणार नाही. त्यामुळे सामान्यांचा पोलिसांवरील विश्वास उडाला आहे,’ असे खंडपीठाने म्हटले.गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) के. पी. बक्षी यांना उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत बक्षी शुक्रवारी न्यायालयात उपस्थित राहिले. राज्य सरकारने या स्थितीला हाताळण्यासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत, याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)