शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

व्यावसायिकांनी केले पदपथ गिळंकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 01:52 IST

काळेवाडी-पिंपरी येथील व्यावसायिकांनी थेट बांधकाम करून अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे.

काळेवाडी : लाखो रुपये खर्च करून पादचाऱ्यांसाठी उभारलेल्या फुटपाथवर काळेवाडी-पिंपरी येथील व्यावसायिकांनी थेट बांधकाम करून अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. काही व्यावसायिकांनी फुटपाथवर बांधकाम करून ते गिळंकृत करूनदेखील महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील सर्व रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र फुटपाथ तयार केले आहेत. त्यानुसार काळेवाडी फाटा ते पिंपरी या रस्त्यालगतदेखील दोन्ही बाजंूना पादचाऱ्यांसाठी फुटपाथ तयार करण्यात आला आहे. मात्र, त्याचा वापर पादचाऱ्यांना होत नसून, व्यावसायिकच करीत आहेत. रस्त्यालगतच सिमेंटचे ब्लॉक टाकून तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर तेथील व्यावसायिकांनी दुकानातील विक्रीचे साहित्य ठेवून अतिक्रमण केले आहे. काळेवाडी फाट्याकडून पिंपरीकडे येताना रहाटणी फाट्यासमोरील बहुतांश व्यावसायिकांनी फुटपाथवर विक्रीचे साहित्य ठेवल्यामुळे फुटपाथच दिसेनासा झाला आहे. काळेवाडीत एका व्यावसायिकाने तर ओटाच बांधून त्यावर दुकानातील विक्रीचे अवजड साहित्य ठेवले आहे. एका हॉटेल व्यावसायिकाने लाकडे ठेवली आहेत. पिंपरीकडून काळेवाडी फाट्याकडे येताना याहून गंभीर परिस्थिती असून, काळेवाडीतील बहुतांश व्यावसायिकांनी फुटपाथवर विक्रीचे साहित्य ठेवले असून, दुचाकीदेखील पार्क केल्या आहेत. तर काही ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी हातगाड्या उभ्या केल्या आहेत. एका व्यावसायिकाने, तर बांधकाम करून बसण्यासाठी ओटादेखील तयार केलेला दिसून आला. या परिसरात दोन शाळा-महाविद्यालये असून, सकाळपासूनच विद्यार्थ्यांची वर्दळ असते. काही विद्यार्थी अतिक्रमण नसलेल्या फुटपाथवरून ये-जा करताना दिसतात. मात्र, व्यावसायिकांचे अतिक्रमण नसल्यास विद्यार्थी व पादचारी या फुटपाथचाच वापर करणार असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजंूना असलेल्या फुटपाथवर सर्वच ठिकाणी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे पादचाऱ्यांच्या अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मागील आठवड्यातच एका व्यक्तीचा पाण्याच्या टॅँकरच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना घडली. अतिक्रमण विभागाचे वाहन या रस्त्यावर फक्त फिरताना दिसते. मात्र, कोणत्याही प्रकारची कारवाई अधिकारी करीत नाहीत. अधिकारीच अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना अभय देत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. (वार्ताहर)