शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्यावसायिकांनी केले पदपथ गिळंकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 01:52 IST

काळेवाडी-पिंपरी येथील व्यावसायिकांनी थेट बांधकाम करून अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे.

काळेवाडी : लाखो रुपये खर्च करून पादचाऱ्यांसाठी उभारलेल्या फुटपाथवर काळेवाडी-पिंपरी येथील व्यावसायिकांनी थेट बांधकाम करून अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. काही व्यावसायिकांनी फुटपाथवर बांधकाम करून ते गिळंकृत करूनदेखील महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील सर्व रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र फुटपाथ तयार केले आहेत. त्यानुसार काळेवाडी फाटा ते पिंपरी या रस्त्यालगतदेखील दोन्ही बाजंूना पादचाऱ्यांसाठी फुटपाथ तयार करण्यात आला आहे. मात्र, त्याचा वापर पादचाऱ्यांना होत नसून, व्यावसायिकच करीत आहेत. रस्त्यालगतच सिमेंटचे ब्लॉक टाकून तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर तेथील व्यावसायिकांनी दुकानातील विक्रीचे साहित्य ठेवून अतिक्रमण केले आहे. काळेवाडी फाट्याकडून पिंपरीकडे येताना रहाटणी फाट्यासमोरील बहुतांश व्यावसायिकांनी फुटपाथवर विक्रीचे साहित्य ठेवल्यामुळे फुटपाथच दिसेनासा झाला आहे. काळेवाडीत एका व्यावसायिकाने तर ओटाच बांधून त्यावर दुकानातील विक्रीचे अवजड साहित्य ठेवले आहे. एका हॉटेल व्यावसायिकाने लाकडे ठेवली आहेत. पिंपरीकडून काळेवाडी फाट्याकडे येताना याहून गंभीर परिस्थिती असून, काळेवाडीतील बहुतांश व्यावसायिकांनी फुटपाथवर विक्रीचे साहित्य ठेवले असून, दुचाकीदेखील पार्क केल्या आहेत. तर काही ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी हातगाड्या उभ्या केल्या आहेत. एका व्यावसायिकाने, तर बांधकाम करून बसण्यासाठी ओटादेखील तयार केलेला दिसून आला. या परिसरात दोन शाळा-महाविद्यालये असून, सकाळपासूनच विद्यार्थ्यांची वर्दळ असते. काही विद्यार्थी अतिक्रमण नसलेल्या फुटपाथवरून ये-जा करताना दिसतात. मात्र, व्यावसायिकांचे अतिक्रमण नसल्यास विद्यार्थी व पादचारी या फुटपाथचाच वापर करणार असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजंूना असलेल्या फुटपाथवर सर्वच ठिकाणी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे पादचाऱ्यांच्या अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मागील आठवड्यातच एका व्यक्तीचा पाण्याच्या टॅँकरच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना घडली. अतिक्रमण विभागाचे वाहन या रस्त्यावर फक्त फिरताना दिसते. मात्र, कोणत्याही प्रकारची कारवाई अधिकारी करीत नाहीत. अधिकारीच अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना अभय देत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. (वार्ताहर)