शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकांनी केले पदपथ गिळंकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 01:52 IST

काळेवाडी-पिंपरी येथील व्यावसायिकांनी थेट बांधकाम करून अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे.

काळेवाडी : लाखो रुपये खर्च करून पादचाऱ्यांसाठी उभारलेल्या फुटपाथवर काळेवाडी-पिंपरी येथील व्यावसायिकांनी थेट बांधकाम करून अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. काही व्यावसायिकांनी फुटपाथवर बांधकाम करून ते गिळंकृत करूनदेखील महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील सर्व रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र फुटपाथ तयार केले आहेत. त्यानुसार काळेवाडी फाटा ते पिंपरी या रस्त्यालगतदेखील दोन्ही बाजंूना पादचाऱ्यांसाठी फुटपाथ तयार करण्यात आला आहे. मात्र, त्याचा वापर पादचाऱ्यांना होत नसून, व्यावसायिकच करीत आहेत. रस्त्यालगतच सिमेंटचे ब्लॉक टाकून तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर तेथील व्यावसायिकांनी दुकानातील विक्रीचे साहित्य ठेवून अतिक्रमण केले आहे. काळेवाडी फाट्याकडून पिंपरीकडे येताना रहाटणी फाट्यासमोरील बहुतांश व्यावसायिकांनी फुटपाथवर विक्रीचे साहित्य ठेवल्यामुळे फुटपाथच दिसेनासा झाला आहे. काळेवाडीत एका व्यावसायिकाने तर ओटाच बांधून त्यावर दुकानातील विक्रीचे अवजड साहित्य ठेवले आहे. एका हॉटेल व्यावसायिकाने लाकडे ठेवली आहेत. पिंपरीकडून काळेवाडी फाट्याकडे येताना याहून गंभीर परिस्थिती असून, काळेवाडीतील बहुतांश व्यावसायिकांनी फुटपाथवर विक्रीचे साहित्य ठेवले असून, दुचाकीदेखील पार्क केल्या आहेत. तर काही ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी हातगाड्या उभ्या केल्या आहेत. एका व्यावसायिकाने, तर बांधकाम करून बसण्यासाठी ओटादेखील तयार केलेला दिसून आला. या परिसरात दोन शाळा-महाविद्यालये असून, सकाळपासूनच विद्यार्थ्यांची वर्दळ असते. काही विद्यार्थी अतिक्रमण नसलेल्या फुटपाथवरून ये-जा करताना दिसतात. मात्र, व्यावसायिकांचे अतिक्रमण नसल्यास विद्यार्थी व पादचारी या फुटपाथचाच वापर करणार असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजंूना असलेल्या फुटपाथवर सर्वच ठिकाणी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे पादचाऱ्यांच्या अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मागील आठवड्यातच एका व्यक्तीचा पाण्याच्या टॅँकरच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना घडली. अतिक्रमण विभागाचे वाहन या रस्त्यावर फक्त फिरताना दिसते. मात्र, कोणत्याही प्रकारची कारवाई अधिकारी करीत नाहीत. अधिकारीच अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना अभय देत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. (वार्ताहर)