शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
5
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
6
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
7
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
8
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
9
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
10
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
11
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
12
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
13
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
14
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
15
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
16
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
17
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
18
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
19
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
20
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

राजकीय घराणेशाही

By admin | Updated: February 7, 2017 23:40 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद या वेळेला खुले झाल्याने प्रत्येक नेत्याला आपल्या वारसाला तिथे संधी देण्याची घाई झाली आहे.

विश्वास पाटील, कोल्हापूरकोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद या वेळेला खुले झाल्याने प्रत्येक नेत्याला आपल्या वारसाला तिथे संधी देण्याची घाई झाली आहे. त्यामुळे घराणेशाहीला ऊत आला आहे. या जिल्ह्यात तब्बल सतरा वारसदार आपले भविष्य आजमावत आहेत. त्यामध्ये विद्यमान आमदार व खासदारांचे तिघे जवळचे नातलग आहेत.निवडणूक कोणतीही असो त्यातील घराणेशाही ही आता मतदारांच्यासुद्धा अंगवळणी पडू लागली आहे. किंबहुना मतदारांकडूनच ती जोपासली जात आहे. कोल्हापुरात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील हे आपला मुलगा राहुल याला उमेदवारी द्यायला तयार नव्हते; परंतु त्या मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल आठ तास त्यांना रोखून धरले. राहुल पाटील याला उमेदवारी दिल्याशिवाय अन्य मतदारसंघांतील काँग्रेसच्या उमेदवारांनी ए बी फॉर्म स्वीकारले नाहीत. शेवटी लोकांच्या दबावापुढे नमते घेऊन मुलास रिंगणात उतरविण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला.लोकसभा व विधानसभेला प्रस्थापित कुटुंबातील उमेदवारांना संधी मिळते. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीला तरी किमान पक्षासाठी व नेत्यांसाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जावी, अशी अपेक्षा असते; परंतु तसे घडताना दिसत नाही. कारण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ता यादेखील नवे आर्थिक व राजकीय सत्ताकेंद्र ठरल्या आहेत. तिथे जाऊन जशी विकासकामे करता येतात तशी अनेकांची कोंडी करता येते. ग्रामीण राजकारणावर वर्चस्व मिळविता येते. त्यासाठी मग हे पद आपल्याच गोतावळ्यात राहावे, असे नेत्यांना वाटत आहे.कोल्हापुरात भाजपाचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका रिंगणात आहेत. दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा नातू वीरेंद्र शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत आमदार गोविंदराव कलिकते यांची सून गेल्या निवडणुकीत रिंगणात होती, आता त्यांचा मुलगाच संजय मैदानात आहे म्हणजे घराणेशाही जोपासण्यात सगळेच डावे-उजवे पक्ष हिरिरीने पुढे आहेत; शिवाय ही घराणेशाही कोल्हापूरपासून चेन्नई ते उत्तर प्रदेशपर्यंत सगळीकडेच आहे.यासंदर्भात राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘राजकीय नेतृत्वाच्या वारसदारांना संधी दिली जावी, अशी मानसिकता आता मतदारांची आणि राजकीय पक्षांचीही होत आहे. त्यांच्याकडे आर्थिक सामर्थ्य, राजकीय वर्चस्व आणि यंत्रणा राबविण्याची ताकद असते. हे सगळे वारसाला अलगदपणे मिळते. ही घराणेशाही सर्व पक्षांत दिसते म्हणून तर जयललितांशी कोणताही संबंध नसताना लोकशाही संकेत पायदळी तुडवून आता तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी शशिकला यांची निवड होत आहे. नेत्यांच्या वारसदारांना त्यांच्याकडे क्षमता असेल तर का संधी मिळू नये, अशीही विचारणा केली जाते; परंतु समान संधीच्या तत्त्वाचा विचार केल्यास हे वारसदार शर्यत सुरू होण्यापूर्वीच पुढे असतात. पद्मश्री विखे-पाटील कुटुंबापासून ते अनेक ठिकाणी असे अनुभवण्यास येते की तिथे मागच्या पिढीच्या तुलनेत पुढील पिढीतील नेतृत्व तितकेसे प्रभावशाली नाही परंतु तरीही त्यांना वारसा म्हणून ही संधी मिळाली आहे.