शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

गोमुत्रापासून तयार केले कीटकनाशक

By admin | Updated: July 19, 2016 16:28 IST

एका कृषी सहायकाने गोमुत्रापासून किटकनाशक तयार केले आहे.

शेतक-यांना मोफत पुरवठा : कृषी सहायकाचा उपक्रम
 
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १९ -   शेतकरी पारंपारिक शेती विसरत चालला असून विविध कंपन्यांच्या प्रलोभनाला बळी पडत असल्याचे सध्या द्या चित्र आहे. असे असतांना एका कृषी सहायकाने गोमुत्रापासून किटकनाशक तयार केले आहे. हे किटकनाशक शेतक-यांना प्रयोगाखातर मोफत वाटप करीत आहेत. याचा रिझल्ट पाहता मराठवाडा, बारामतीसह इतर जिल्हयातील शेतकरी मोठया प्रमाणात याचा वापर करीत आहेत.
वाशिम तालुक्यातील गोंडेगाव येथील सुनिल गुलाबराव एकाडे यांचे बीएसस्सी अ‍ॅग्रीकल्चर शिक्षण अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापिठ येथे झाले आहे. ते वाशिम येथीलच तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषीसहायक पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी ते एका किटकनाशक कंपनीत कार्यरत असतांना त्यांच्या लक्षात आले जवळपास शेतकरी बांधव विविध कंपन्यांवर विसंबुन आहेत. जुने जाणते शेतक-यांना पीकांवर कधी कीड येणार याची कल्पना असते. तेव्हा जुने शेतकरी मी जो प्रयोग केला तोच करायचे पण साध्या पध्दतीने. हा प्रयोग शेतकरी विसरत चालल्याने याला आधुनिक रुप देण्याचा प्रयत्न केला. एकाडे यांनी गोमुत्र, शेण व निंबोळीपावडर यापासून ‘अमृत कवच’ नावाचे कीटकनाशक बनविले ज्याचा वापर केल्यास हमखास पीकांना फायदा होत असल्याचे खुद्द शेतकरी सांगताहेत. त्यांनी गांडुळखतासाठी ज्या बेडचा वापर करतात त्याच बेडचा वापर या प्रयोगासाठी केला आहे. बेडमध्ये तीनही घटक एकत्र करुन ३० ते ३५ डिग्रीसेल्सियस तापमानात हे घटक २० दिवस ठेवले. तीनही घटक एकत्र केल्यानंतर गोमुत्रामधील अमोनिया द्रव्यरुपात तयार होतो. त्यातून नत्र (नायट्रोजन) तयार होतात. यामधून येत असलेल्या उग्रवासामुळे पीकांवर किटक येत नाहीत. कडूवास यावा म्हणून यामध्ये निंबोळी पावडरचा वापर त्यासाठीच करण्यात आला आहे. कीटकनाशक पिकांवर बसू नये यासाठी लागणारे घटक या तिनही घटकात आहेत. गोमुत्रामध्ये नत्र, स्फूरद, हयुमिक अ‍ॅसिड तर निंबोळी पावडरमध्ये कडू सुगंध व कडू चव आहे. तर शेणाचा वापर यामध्ये हे घटक त्वरित सडविण्यसासाठी केला जातो. गोमुत्र आणि निंबोळी पावडरला शेण सडविण्याची प्रक्रीया जलदगतीने करतो.  हे सर्व मिश्रणावर २० दिवस सडवून ठेवण्याची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर याला गाळून बरणीत भरुन ठेवल्या जाते. या कीटकनाशकाचा वापर केल्यास उत्पन्नात २० टक्के फरक जाणवतो. एका लिटरमध्ये तीन एकर शेतीची फवारणी होते. ज्यासाठी कोणत्याही कंपनीचे स्वस्तात स्वस्त किटकनाशक घेतले तरी १६०० ते २००० रुपये खर्च येतो व शेतीच्या पोतातही फरक पडतो. परंतु गोमुत्र, निंबोळीपावडर व शेणापासून तयार करण्यात येत असलेल्या कीटकनाशकामुळे शेतीच्या पोतही चांगला राहतो व हा प्रयोग शेतकºयांना घरच्या घरी सुध्दा करता येतो. सर्व शेतकºयांनी याचा वापर केल्यास कोणत्याही किटकनाशकाची आवश्यकता पडणार नाही. याबाबत आपण शेतकºयांना प्रशिक्षणही देत असल्याचे  एकाडे यांनी यावेळी सांगितले.