शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

दुर्गदुर्गेश्वर रायगडचा पायरी मार्ग खडतर

By admin | Updated: April 4, 2017 03:41 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३७ व्या पुण्यतिथीनिमित्त शेकडो शिवभक्त रायगडावर जाऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आहेत

नामदेव मोरे,नवी मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३७ व्या पुण्यतिथीनिमित्त शेकडो शिवभक्त रायगडावर जाऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेचा सोपा मार्ग असला तरी इतिहासप्रेमी नागरिक पायी जाण्यास अधिक पसंती देत आहेत, परंतु किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांची झालेली दुरवस्था, मार्गामध्ये बैठक व्यवस्थेचा अभाव असल्याने गड चढणाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. विशेषत: महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना खूपच त्रास होत असून, या मार्गाची डागडुजी करण्याची मागणी केली जात आहे. रायगड हा शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार. मराठा साम्राज्याची राजधानी. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार, वास्तुकलेचे उत्तम उदाहरण. महाराजांची समाधी व समुद्रसपाटीपासून जवळपास २९०० फूट उंची यामुळे शिवप्रेमींना रायगड नेहमीच खुणावत असतो. तब्बल १४३५ पायऱ्या व त्याव्यतिरिक्त तेवढ्याच अंतराच्या पायवाटेने पायपीट करून गडावर जाणे अनेकांना शक्य होत नसल्याने रोपवे सुरू केला आहे. दहा मिनिटांत गडावर जाणे शक्य झाले असले तरी गडाचे महत्त्व समजून घेण्यासाठी पायीच जाणे आवश्यक आहे. रविवार व इतर सुटीच्या दिवशी ५०० ते १ हजार नागरिक पायवाटेचा अवलंब करत आहेत. पण गडावर जाणाऱ्या या शिवप्रेमींची वाट व्यवस्थित नसल्याने प्रचंड गैरसोय होत आहे. पायथ्याला पायऱ्या सुरू झाल्यानंतर सरळ चढण चढावे लागत आहे. पायऱ्यांची उंचीही खूप आहे. प्रत्येक पायरीची उंची व आकार समान नसल्याने चालण्यास अडचणी निर्माण होत आहेत. अनेक जण २०० ते ४०० पायऱ्या चढून गेल्यानंतर भीतीनेच खाली उतरू लागले आहेत. एका दमात गड चढणे जवळपास अशक्य आहे. यामुळे वाटेने ठिकठिकाणी क्षणभर विश्रांती घेवून पर्यटक पुढील वाट चालू लागतात. वास्तविक मार्गावर प्रत्येक ५० ते १०० मीटर अंतरावर बसण्यासाठी आसनव्यवस्था किंवा कट्टा बांधण्याची आवश्यकता आहे. उन्हाळ्यात उन्हाच्या त्रासापासून वाचण्यासाठी व पावसाळ्यात पावसापासून बचाव व्हावा यासाठी निवारा शेड उभारणे आवश्यक आहे. पण सद्यस्थितीमध्ये अत्यंत कमी ठिकाणी एखादा बसण्यासाठी सिमेंटचा कट्टा तयार केला असून, त्यामधील अर्धे तुटले आहेत. गडाच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावरील पायऱ्या पूर्णपणे तुटलेल्या आहेत. सर्व दगड निखळून गेले आहेत. यामुळे चालण्यास त्रास होत आहे. पायवाट काही ठिकाणी अत्यंत चिंचोळी आहे. गडावरील राज्याभिषेक सोहळा, महाराजांची जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी गडावर हजारो शिवभक्त हजेरी लावतात. अशावेळी चिंचोळ्या वाटेतून मार्ग काढताना त्रास होत आहे.पायऱ्यांची उंची जास्त व दोन पायऱ्यांमध्ये अंतर कमी असल्याने वरची पायरी चढताना उतरताना त्रास होत आहे. गडावर पायी जाणाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी या मार्गाची डागडुजी करणे आवश्यक असल्याचे मत शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे. पायऱ्यांचे दगड निखळलेरायगडावर जाणाऱ्या पायऱ्यांचे दगड अनेक ठिकाणी निखळले आहेत. पायऱ्या फक्त नावालाच शिल्लक आहेत. यामुळे पायी जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होत आहे. पायऱ्यांची डागडुजी करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ँरायगडावर जाण्यासाठी १४३५ पाऱ्या असून या दुरवस्थेमुळे पर्यटकांना त्रास होत असून प्रचंड गैरसोय होत आहे.पायऱ्यांचा आकार गडावर जाणाऱ्या मार्गावरील पायऱ्यांची उंची व आकार यामध्ये खूप फरक आहे. काही ठिकाणी पायऱ्या खूपच उंच आहेत. चढताना प्रचंड दम लागत आहे. उतरतानाही शरीराचा तोल सांभाळावा लागत आहे. यामुळे पूर्ण पायरी मार्गाची एकाचवेळी दुरुस्ती करून पायऱ्यांची उंची, लांबी व आकार यामधील फरक दूर करून चालण्यायोग्य पायऱ्या बनविण्याची मागणी केली जात आहे. रोपवेने दहा मिनिटांत गडावर जाणे शक्य झाले असले तरी गडाचे महत्त्व समजून घेण्यासाठी पायीच जाणे आवश्यक आहे.पायऱ्यांची उंचीही खूप आहे. प्रत्येक पायरीची उंची व आकार समान नसल्याने चालण्यास अडचणी निर्माण होत आहेत. अनेक जण २०० ते ४०० पायऱ्या चढून गेल्यानंतर भीतीनेच खाली उतरू लागले आहेत.