शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गदुर्गेश्वर रायगडचा पायरी मार्ग खडतर

By admin | Updated: April 4, 2017 03:41 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३७ व्या पुण्यतिथीनिमित्त शेकडो शिवभक्त रायगडावर जाऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आहेत

नामदेव मोरे,नवी मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३७ व्या पुण्यतिथीनिमित्त शेकडो शिवभक्त रायगडावर जाऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेचा सोपा मार्ग असला तरी इतिहासप्रेमी नागरिक पायी जाण्यास अधिक पसंती देत आहेत, परंतु किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांची झालेली दुरवस्था, मार्गामध्ये बैठक व्यवस्थेचा अभाव असल्याने गड चढणाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. विशेषत: महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना खूपच त्रास होत असून, या मार्गाची डागडुजी करण्याची मागणी केली जात आहे. रायगड हा शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार. मराठा साम्राज्याची राजधानी. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार, वास्तुकलेचे उत्तम उदाहरण. महाराजांची समाधी व समुद्रसपाटीपासून जवळपास २९०० फूट उंची यामुळे शिवप्रेमींना रायगड नेहमीच खुणावत असतो. तब्बल १४३५ पायऱ्या व त्याव्यतिरिक्त तेवढ्याच अंतराच्या पायवाटेने पायपीट करून गडावर जाणे अनेकांना शक्य होत नसल्याने रोपवे सुरू केला आहे. दहा मिनिटांत गडावर जाणे शक्य झाले असले तरी गडाचे महत्त्व समजून घेण्यासाठी पायीच जाणे आवश्यक आहे. रविवार व इतर सुटीच्या दिवशी ५०० ते १ हजार नागरिक पायवाटेचा अवलंब करत आहेत. पण गडावर जाणाऱ्या या शिवप्रेमींची वाट व्यवस्थित नसल्याने प्रचंड गैरसोय होत आहे. पायथ्याला पायऱ्या सुरू झाल्यानंतर सरळ चढण चढावे लागत आहे. पायऱ्यांची उंचीही खूप आहे. प्रत्येक पायरीची उंची व आकार समान नसल्याने चालण्यास अडचणी निर्माण होत आहेत. अनेक जण २०० ते ४०० पायऱ्या चढून गेल्यानंतर भीतीनेच खाली उतरू लागले आहेत. एका दमात गड चढणे जवळपास अशक्य आहे. यामुळे वाटेने ठिकठिकाणी क्षणभर विश्रांती घेवून पर्यटक पुढील वाट चालू लागतात. वास्तविक मार्गावर प्रत्येक ५० ते १०० मीटर अंतरावर बसण्यासाठी आसनव्यवस्था किंवा कट्टा बांधण्याची आवश्यकता आहे. उन्हाळ्यात उन्हाच्या त्रासापासून वाचण्यासाठी व पावसाळ्यात पावसापासून बचाव व्हावा यासाठी निवारा शेड उभारणे आवश्यक आहे. पण सद्यस्थितीमध्ये अत्यंत कमी ठिकाणी एखादा बसण्यासाठी सिमेंटचा कट्टा तयार केला असून, त्यामधील अर्धे तुटले आहेत. गडाच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावरील पायऱ्या पूर्णपणे तुटलेल्या आहेत. सर्व दगड निखळून गेले आहेत. यामुळे चालण्यास त्रास होत आहे. पायवाट काही ठिकाणी अत्यंत चिंचोळी आहे. गडावरील राज्याभिषेक सोहळा, महाराजांची जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी गडावर हजारो शिवभक्त हजेरी लावतात. अशावेळी चिंचोळ्या वाटेतून मार्ग काढताना त्रास होत आहे.पायऱ्यांची उंची जास्त व दोन पायऱ्यांमध्ये अंतर कमी असल्याने वरची पायरी चढताना उतरताना त्रास होत आहे. गडावर पायी जाणाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी या मार्गाची डागडुजी करणे आवश्यक असल्याचे मत शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे. पायऱ्यांचे दगड निखळलेरायगडावर जाणाऱ्या पायऱ्यांचे दगड अनेक ठिकाणी निखळले आहेत. पायऱ्या फक्त नावालाच शिल्लक आहेत. यामुळे पायी जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होत आहे. पायऱ्यांची डागडुजी करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ँरायगडावर जाण्यासाठी १४३५ पाऱ्या असून या दुरवस्थेमुळे पर्यटकांना त्रास होत असून प्रचंड गैरसोय होत आहे.पायऱ्यांचा आकार गडावर जाणाऱ्या मार्गावरील पायऱ्यांची उंची व आकार यामध्ये खूप फरक आहे. काही ठिकाणी पायऱ्या खूपच उंच आहेत. चढताना प्रचंड दम लागत आहे. उतरतानाही शरीराचा तोल सांभाळावा लागत आहे. यामुळे पूर्ण पायरी मार्गाची एकाचवेळी दुरुस्ती करून पायऱ्यांची उंची, लांबी व आकार यामधील फरक दूर करून चालण्यायोग्य पायऱ्या बनविण्याची मागणी केली जात आहे. रोपवेने दहा मिनिटांत गडावर जाणे शक्य झाले असले तरी गडाचे महत्त्व समजून घेण्यासाठी पायीच जाणे आवश्यक आहे.पायऱ्यांची उंचीही खूप आहे. प्रत्येक पायरीची उंची व आकार समान नसल्याने चालण्यास अडचणी निर्माण होत आहेत. अनेक जण २०० ते ४०० पायऱ्या चढून गेल्यानंतर भीतीनेच खाली उतरू लागले आहेत.