शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गदुर्गेश्वर रायगडचा पायरी मार्ग खडतर

By admin | Updated: April 4, 2017 03:41 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३७ व्या पुण्यतिथीनिमित्त शेकडो शिवभक्त रायगडावर जाऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आहेत

नामदेव मोरे,नवी मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३७ व्या पुण्यतिथीनिमित्त शेकडो शिवभक्त रायगडावर जाऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेचा सोपा मार्ग असला तरी इतिहासप्रेमी नागरिक पायी जाण्यास अधिक पसंती देत आहेत, परंतु किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांची झालेली दुरवस्था, मार्गामध्ये बैठक व्यवस्थेचा अभाव असल्याने गड चढणाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. विशेषत: महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना खूपच त्रास होत असून, या मार्गाची डागडुजी करण्याची मागणी केली जात आहे. रायगड हा शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार. मराठा साम्राज्याची राजधानी. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार, वास्तुकलेचे उत्तम उदाहरण. महाराजांची समाधी व समुद्रसपाटीपासून जवळपास २९०० फूट उंची यामुळे शिवप्रेमींना रायगड नेहमीच खुणावत असतो. तब्बल १४३५ पायऱ्या व त्याव्यतिरिक्त तेवढ्याच अंतराच्या पायवाटेने पायपीट करून गडावर जाणे अनेकांना शक्य होत नसल्याने रोपवे सुरू केला आहे. दहा मिनिटांत गडावर जाणे शक्य झाले असले तरी गडाचे महत्त्व समजून घेण्यासाठी पायीच जाणे आवश्यक आहे. रविवार व इतर सुटीच्या दिवशी ५०० ते १ हजार नागरिक पायवाटेचा अवलंब करत आहेत. पण गडावर जाणाऱ्या या शिवप्रेमींची वाट व्यवस्थित नसल्याने प्रचंड गैरसोय होत आहे. पायथ्याला पायऱ्या सुरू झाल्यानंतर सरळ चढण चढावे लागत आहे. पायऱ्यांची उंचीही खूप आहे. प्रत्येक पायरीची उंची व आकार समान नसल्याने चालण्यास अडचणी निर्माण होत आहेत. अनेक जण २०० ते ४०० पायऱ्या चढून गेल्यानंतर भीतीनेच खाली उतरू लागले आहेत. एका दमात गड चढणे जवळपास अशक्य आहे. यामुळे वाटेने ठिकठिकाणी क्षणभर विश्रांती घेवून पर्यटक पुढील वाट चालू लागतात. वास्तविक मार्गावर प्रत्येक ५० ते १०० मीटर अंतरावर बसण्यासाठी आसनव्यवस्था किंवा कट्टा बांधण्याची आवश्यकता आहे. उन्हाळ्यात उन्हाच्या त्रासापासून वाचण्यासाठी व पावसाळ्यात पावसापासून बचाव व्हावा यासाठी निवारा शेड उभारणे आवश्यक आहे. पण सद्यस्थितीमध्ये अत्यंत कमी ठिकाणी एखादा बसण्यासाठी सिमेंटचा कट्टा तयार केला असून, त्यामधील अर्धे तुटले आहेत. गडाच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावरील पायऱ्या पूर्णपणे तुटलेल्या आहेत. सर्व दगड निखळून गेले आहेत. यामुळे चालण्यास त्रास होत आहे. पायवाट काही ठिकाणी अत्यंत चिंचोळी आहे. गडावरील राज्याभिषेक सोहळा, महाराजांची जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी गडावर हजारो शिवभक्त हजेरी लावतात. अशावेळी चिंचोळ्या वाटेतून मार्ग काढताना त्रास होत आहे.पायऱ्यांची उंची जास्त व दोन पायऱ्यांमध्ये अंतर कमी असल्याने वरची पायरी चढताना उतरताना त्रास होत आहे. गडावर पायी जाणाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी या मार्गाची डागडुजी करणे आवश्यक असल्याचे मत शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे. पायऱ्यांचे दगड निखळलेरायगडावर जाणाऱ्या पायऱ्यांचे दगड अनेक ठिकाणी निखळले आहेत. पायऱ्या फक्त नावालाच शिल्लक आहेत. यामुळे पायी जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होत आहे. पायऱ्यांची डागडुजी करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ँरायगडावर जाण्यासाठी १४३५ पाऱ्या असून या दुरवस्थेमुळे पर्यटकांना त्रास होत असून प्रचंड गैरसोय होत आहे.पायऱ्यांचा आकार गडावर जाणाऱ्या मार्गावरील पायऱ्यांची उंची व आकार यामध्ये खूप फरक आहे. काही ठिकाणी पायऱ्या खूपच उंच आहेत. चढताना प्रचंड दम लागत आहे. उतरतानाही शरीराचा तोल सांभाळावा लागत आहे. यामुळे पूर्ण पायरी मार्गाची एकाचवेळी दुरुस्ती करून पायऱ्यांची उंची, लांबी व आकार यामधील फरक दूर करून चालण्यायोग्य पायऱ्या बनविण्याची मागणी केली जात आहे. रोपवेने दहा मिनिटांत गडावर जाणे शक्य झाले असले तरी गडाचे महत्त्व समजून घेण्यासाठी पायीच जाणे आवश्यक आहे.पायऱ्यांची उंचीही खूप आहे. प्रत्येक पायरीची उंची व आकार समान नसल्याने चालण्यास अडचणी निर्माण होत आहेत. अनेक जण २०० ते ४०० पायऱ्या चढून गेल्यानंतर भीतीनेच खाली उतरू लागले आहेत.