शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

पालकांनी आत्मचिंतन करण्याची गरज

By admin | Updated: August 22, 2015 23:45 IST

महाराष्ट्रातल्या पालकांसाठी, पोलिसांसाठी याहून गंभीर बाब ही की इथल्या देशभरातील गुन्हेगारीचे विश्लेषण करणाऱ्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने नुकतीच 2014 या वर्षाची आकडेवारी जाहीर केली.

- जयेश शिरसाट

पंखाखालच्या बालकांकडून सर्वाधिक गुन्हे !महाराष्ट्रातल्या पालकांसाठी, पोलिसांसाठी याहून गंभीर बाब ही की इथल्या देशभरातील गुन्हेगारीचे विश्लेषण करणाऱ्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने नुकतीच  2014 या वर्षाची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार धक्कादायक निरीक्षण समोर आले. त्यातले सर्वात महत्त्वाचे निरीक्षण हे की देशभरात कारवाई झालेल्या विधिसंघर्ष बालकांपैकी सुमारे 80% पालकांसोबत राहतात.

दोनेक वर्षांपूर्वी भांडुपमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना. नववीची परीक्षा संपली. सुट्या लागल्या. दहावीचा अभ्यास करण्याऐवजी तुषार (बदललेले नाव) मात्र मित्रांमध्ये गुंतला. मित्रांच्या संगतीत त्याला गांजा ओढण्याचे व्यसन जडले. म्हाताऱ्या आजीसोबत राहणारा तुषार दिवसेंदिवस गांजात रुतू लागला. दिवसभर त्याला एकच चिंता सतावे. आजचा स्टॉक घेण्यासाठी पैसे कुठून आणायचे? एकदा त्याने आजीकडे पैशांची मागणी केली. तिने कशासाठी विचारले. तुषारने आढेवेढे घेतले. आजीला संशय आला. तिने पैसे नाकारले. मात्र गांजाची तल्लफ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. याच नशेपोटी तुषारने गाढ झोपलेल्या आजीचे दोन्ही कान कापले आणि सोन्याचे कानातले दागिने पळवले. हे कानातले विकून त्याने गांजाची नशा केली. शेजाऱ्यांनी वेळीच आजीला रुग्णालयात दाखल केले, म्हणून तिचा जीव वाचला. मात्र तिच्या मनावर झालेली जखम आजही भळभळते आहे. आई-वडील नसल्याने तुषारला आजीनेच वाढवले. पण त्यानेच असा घात केल्याची तिला टोचणी लागली होती. या घटनेने पोलीसही शहारले. दोन वर्षांपूर्वी मुंबईतल्या शक्ती मिलमध्ये दोन तरुणींवर सामूहिक बलात्कार घडले. यामधले दोन आरोपी अल्पवयीन होते. दिल्लीतल्या निर्भया बलात्कारातही अल्पवयीन आरोपींचा सहभाग होता. चार वर्षांपूर्वी स्पोटर््स बाईक घेण्यास विरोध करणाऱ्या आजीची अल्पवयीन नातवाने मित्राच्या मदतीने हत्या केली होती. गंभीर बाब ही की देशभरात कमीअधिक प्रमाणात लहान मुलांकडून सातत्याने गुन्हे घडत आहेत. असे करणाऱ्या अल्पवयीन मुलांना विधिसंघर्ष बालक म्हणतात. २०१३मध्ये एकूण गुन्हेगारीत विधिसंघर्ष बालकांकडून घडलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण १.२ टक्के इतके होते. २०१४मध्ये हे प्रमाण कमी होणे अपेक्षित होते. मात्र लोकसंख्यावाढीनुसार गुन्हे घडण्याचे प्रमाणही वाढते आहे. लहान मुलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रथम या संस्थेचे प्रकल्प संचालक किशोर भामरे मात्र पालकांना यासाठी जबाबदार धरतात. ते म्हणतात की टीव्ही, इंटरनेट, सोशल मीडिया ही माध्यमे सहजपणे लहान मुलांच्या हाती लागतात. त्यातून होणारा अनावश्यक गोष्टींचा मारा मुलांवर होतो. हल्ली विभक्त कुटुंब पद्धती वाढल्याने मुलांशी पालकांचा संवाद खुंटला आहे. मुले काय करतात, कुठे जातात, त्यांचे मित्र कोण यावर लक्ष व नियंत्रण नाही. यामुळे मुले पालकांपासून आपोआपच लांब जातात. त्यामुळे पालकांनीच आत्मकेंद्रित होऊन विचार करण्याची गरज आहे. व्यवस्था, शासन, पोलीस, न्यायालयांनीही बालगुन्हेगारी हा विषय गांभीर्याने हाताळायलाच हवा. पण सतर्क नागरिक म्हणून सर्वांनीच पुढाकार घेऊन नजरेला पडणारे लहान मुलांचे गुन्हे त्या त्या वेळी रोखणे आवश्यक बनले आहे.सर्वाधिक हिंसक गुन्हे : विधिसंघर्ष बालकांकडून सर्वाधिक हिंसक व गंभीर गुन्हे घडले आहेत. पोलीस कारवाई झालेल्यांमध्येही महाराष्ट्र पुढे आहे. हत्या, हत्येचे प्रयत्न, दंगली, गंभीर मारहाण, दरोडे, दरोड्यांसह हत्या, दरोड्याची तयारी, लूटमार, चोरी, विनयभंग अशाप्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या बालकांचा सर्वाधिक सहभाग समोर आला आहे. बलात्कार, छेडछाड, शारीरिक छळ यातही महाराष्ट्रातील बालके पुढे आहेत.पोलिसांनुसार बालगुन्हेगारीला विभक्त कुटुंब, आईवडिलांमधील तंटे, त्यांच्या संगोपन, संस्कारातील त्रुटी, निरक्षरता, घरातले वातावरण, आर्थिक परिस्थिती अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.48,230 देशात बालकांवर कारवाई झाली. 38,693 बालक पालकांच्या पंखाखालचे आहेत.7,905  बालक अन्य नातेवाईक किंवा सांभाळ करणाऱ्यांसोबत वास्तव्यास आहेत. 1632  इतके बेघर आहेत. आजवरचे निरीक्षण हे की पालकांच्या छत्रछायेखाली नसलेली, अनाथ मुले वाईट वळणाला लागतात. त्यांच्यात गुन्हेगारी वृत्ती बळावते. प्रत्यक्षात या आकडेवारीवरून सर्वाधिक गुन्हे आईवडिलांच्या सोबत राहणाऱ्यांकडून घडल्याचे स्पष्ट होते. 38,565 गुन्हे विधिसंघर्ष बालकांकडून संपूर्ण देशात घडले आहेत. यात भारतीय दंडविधानासह स्थानिक कायद्यांनुसार दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा सहभाग आहे. देशात सर्वप्रकारच्या गुन्हेगारीत बालकांकडून घडलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण १.२ टक्के आहे. तर देशात बालगुन्हेगारीचा दर २.७ टक्के इतका आहे.