शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

पन्हाळगड किल्ला झालाय ८२५ वर्षांचा

By admin | Updated: October 7, 2014 23:50 IST

किल्ल्याची बांधणी राजा भोजच्या काळात. सुमारे ८२५ वर्षे पूर्ण होऊन ८२६ वे वर्ष सुरू झाले

किरण मस्कर - कोतोली -छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक तेजस्वी कामगिरींचा साक्षीदार व मराठ्यांच्या इतिहासात आपले स्वतंत्र स्थान असलेला बुलंद किल्ला म्हणजेच पन्हाळगड होय. पन्हाळगडाच्या बांधणीस सुमारे ८२५ वर्षे पूर्ण झाली असून, ८२६व्या वर्षात या किल्ल्याने पदार्पण केले आहे. किल्ल्यावरील पुरातन वास्तुसुद्धा व्यवस्थितरीत्या आजही पाहावयास मिळताहेत. एवढ्या वर्षांनंतर किल्ल्याची किरकोळ पडझड वगळली, तर इतिहास अभ्यासकांनाही किल्ल्याची भक्कम बांधणी आजही आश्चर्याचा धक्का देणारी आहे. पन्हाळगडाची बांधणी कोणी केली? हे सांगणे फारच कठीण; पण कधी बांधला याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत व पाहावयासही मिळतात. ज्येष्ठ इतिहास संशोधक रावबहादूर, डी. बी. पारसनीस यांनी १९२३ साली लिहिलेले ‘पन्हाळा’ हे इंग्रजीमधील पुस्तक हा त्याचा सबळ पुरावा होय. याच पुस्तकांच्या आधारावरून अनेकांनी पन्हाळ्याची वर्णने वेगवेळ्या स्वरूपात मांडली आहेत. पन्हाळा किल्ल्याचे बांधकाम इसवी सन ११५० ते १२०९ या कालावधीत झाल्याच्या व तत्कालीन राज्य शिलाहारवंशीय राजांचे होते, अशा अनेक नोंदी ताम्रपत्रावर कोल्हापूर, सातारा, मिरज येथे सापडल्या आहेत, असे अनेक पुस्तकांत नमूद आहे. शिलाहारवंशीय राजाच्या अखत्यारित सातारा जिल्हा, बेळगावचा काही भाग व कोल्हापूर प्रांत होता. त्यांच्या वंशाचा पहिला राजा हा भोज होता. पन्हाळा किल्ल्याची बांधणी राजा भोजच्या काळात झाली आहे. या बांधणीला सुमारे ८२५ वर्षे पूर्ण होऊन ८२६ वे वर्ष सुरू झाले आहे. राजा भोजपूर्वी राष्ट्रकूट कदंब चालक्य या राजघराण्यांनी इ.स.५०० ते १०५० या कालावधीत कोल्हापूर प्रदेशावर कब्जा केला; पण पन्हाळ्याच्या टेकडीवर मात्र फक्त शिलाहारवंशी यांनीच राज्य केल्याचेही ठिकठिकाणी सापडलेल्या शिलालेखांमध्ये, ताम्रपत्रांमध्ये नमूद आहे. आजमितीस पन्हाळगडाला ८२५ वर्षे पूर्ण झाली आहेत.