शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

गेल्या दशकभरात २ लाख शेतक-यांनी सोडली शेती

By admin | Updated: August 29, 2015 13:16 IST

गेल्या दशकभरात महाराष्ट्राकील २ लाख शेतक-यांनी त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेला शेती व्यवसाय सोडून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २९ - गेल्या दशकभरात महाराष्ट्रातील २ लाख शेतक-यांनी त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेला शेती व्यवसाय सोडून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या कृषी जनगणनेच्या आकड्यांनुसार ही माहिती समोर आली आहे. उदरनिर्वाहासाठी उपलब्ध असलेले इतर पर्याय व दरवर्षी शेतीत होणा-या नुकसानामुळे शेतक-यांच्या सहनशक्तीचा अंत होऊन, हा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे. 
२००५-०६ सालच्या जनगणनेनुसार राज्यात कृषीक्षेत्रावर अवलंबून असलेल्या शेतक-यांची संख्या १ कोटी ३७ लाख इतकी होती, मात्र ताज्या जनगणनेनुसार आता हा आकडा १ कोटी ३५ लाख इतका झाला आहे, असे राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. नवनवीन उद्योग, रस्ता रुंदीकरणा व रस्तेबांधणी आदी बाबी जमीनींचा घास गिळत असल्याने हा आकडा कमी होत चालला आहे, असे खडसे यांनी सांगितले.
सध्या महाराष्ट्रातील १ कोटी ३५ लाख शेतकरी कृषीक्षेत्रावर अवलंबून असून ९० लाख शेतक-यांकडे एक हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे. ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे खडसे म्हणाले.  कुटुंबात होणा-या वाटण्यांमुळे शेताचा आकार आणखीनच कमी होत असून त्यामुळे उत्पन्नावरही विपरीत प्रभाव पडतो. त्या शेतक-यांव्यतिरिक्त ४५ लाख शेतकरी असे आहेत जे लहान, मध्यम व मोठ्या स्तरावर शेती करतात, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात धान्य पिकवण्याची क्षमता असून ते बाजारात विकता येऊ शकते, असेही खडसे म्हणाले.
वाढत्या लोकसंख्येमुळे गेल्या ५-६ दशकांमध्ये शेतक-यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र २०१०-११ पासून राज्यातील शेतक-यांची संख्या घटू लागली. २०१०-११पर्यंत राज्यात १.३७ कोटी शेतकरी होते, मात्र २०१३-१४ पर्यंत त्यांची संख्या घटली. 
पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समधील सहाय्यक प्राध्यापक संगीता श्रॉफ यांच्या सांगण्यानुसार सध्या राज्यातील स्थिती अतिशय गंभीर आहे. ' राज्यातील एकूण श्रमिक वर्गापैकी ५२.७ टक्के हे शेती व्यवसायातील असून २५.४ टक्के लोकांची स्वत:ची शेती आहे तर २७.३ टक्के नागरिक दुस-यांची शेती कसतात. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबादमधील श्रमिकांचा आकडा हटवल्यास कृषी क्षेत्रातील रोजगाराची टक्केवारी ८१.३६ टक्क्यांच्या आसपास आहे, याचाच अर्थ ग्रामीण भागातील लोकांसमोर उदरनिर्वाहासाठी शेतीशिवाय इतर कोणतेही पर्याय उपलब्ध नाहीत, असे त्या म्हणाल्या.