शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

गेल्या दशकभरात २ लाख शेतक-यांनी सोडली शेती

By admin | Updated: August 29, 2015 13:16 IST

गेल्या दशकभरात महाराष्ट्राकील २ लाख शेतक-यांनी त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेला शेती व्यवसाय सोडून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २९ - गेल्या दशकभरात महाराष्ट्रातील २ लाख शेतक-यांनी त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेला शेती व्यवसाय सोडून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या कृषी जनगणनेच्या आकड्यांनुसार ही माहिती समोर आली आहे. उदरनिर्वाहासाठी उपलब्ध असलेले इतर पर्याय व दरवर्षी शेतीत होणा-या नुकसानामुळे शेतक-यांच्या सहनशक्तीचा अंत होऊन, हा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे. 
२००५-०६ सालच्या जनगणनेनुसार राज्यात कृषीक्षेत्रावर अवलंबून असलेल्या शेतक-यांची संख्या १ कोटी ३७ लाख इतकी होती, मात्र ताज्या जनगणनेनुसार आता हा आकडा १ कोटी ३५ लाख इतका झाला आहे, असे राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. नवनवीन उद्योग, रस्ता रुंदीकरणा व रस्तेबांधणी आदी बाबी जमीनींचा घास गिळत असल्याने हा आकडा कमी होत चालला आहे, असे खडसे यांनी सांगितले.
सध्या महाराष्ट्रातील १ कोटी ३५ लाख शेतकरी कृषीक्षेत्रावर अवलंबून असून ९० लाख शेतक-यांकडे एक हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे. ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे खडसे म्हणाले.  कुटुंबात होणा-या वाटण्यांमुळे शेताचा आकार आणखीनच कमी होत असून त्यामुळे उत्पन्नावरही विपरीत प्रभाव पडतो. त्या शेतक-यांव्यतिरिक्त ४५ लाख शेतकरी असे आहेत जे लहान, मध्यम व मोठ्या स्तरावर शेती करतात, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात धान्य पिकवण्याची क्षमता असून ते बाजारात विकता येऊ शकते, असेही खडसे म्हणाले.
वाढत्या लोकसंख्येमुळे गेल्या ५-६ दशकांमध्ये शेतक-यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र २०१०-११ पासून राज्यातील शेतक-यांची संख्या घटू लागली. २०१०-११पर्यंत राज्यात १.३७ कोटी शेतकरी होते, मात्र २०१३-१४ पर्यंत त्यांची संख्या घटली. 
पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समधील सहाय्यक प्राध्यापक संगीता श्रॉफ यांच्या सांगण्यानुसार सध्या राज्यातील स्थिती अतिशय गंभीर आहे. ' राज्यातील एकूण श्रमिक वर्गापैकी ५२.७ टक्के हे शेती व्यवसायातील असून २५.४ टक्के लोकांची स्वत:ची शेती आहे तर २७.३ टक्के नागरिक दुस-यांची शेती कसतात. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबादमधील श्रमिकांचा आकडा हटवल्यास कृषी क्षेत्रातील रोजगाराची टक्केवारी ८१.३६ टक्क्यांच्या आसपास आहे, याचाच अर्थ ग्रामीण भागातील लोकांसमोर उदरनिर्वाहासाठी शेतीशिवाय इतर कोणतेही पर्याय उपलब्ध नाहीत, असे त्या म्हणाल्या.