शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या दशकभरात २ लाख शेतक-यांनी सोडली शेती

By admin | Updated: August 29, 2015 13:16 IST

गेल्या दशकभरात महाराष्ट्राकील २ लाख शेतक-यांनी त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेला शेती व्यवसाय सोडून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २९ - गेल्या दशकभरात महाराष्ट्रातील २ लाख शेतक-यांनी त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेला शेती व्यवसाय सोडून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या कृषी जनगणनेच्या आकड्यांनुसार ही माहिती समोर आली आहे. उदरनिर्वाहासाठी उपलब्ध असलेले इतर पर्याय व दरवर्षी शेतीत होणा-या नुकसानामुळे शेतक-यांच्या सहनशक्तीचा अंत होऊन, हा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे. 
२००५-०६ सालच्या जनगणनेनुसार राज्यात कृषीक्षेत्रावर अवलंबून असलेल्या शेतक-यांची संख्या १ कोटी ३७ लाख इतकी होती, मात्र ताज्या जनगणनेनुसार आता हा आकडा १ कोटी ३५ लाख इतका झाला आहे, असे राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. नवनवीन उद्योग, रस्ता रुंदीकरणा व रस्तेबांधणी आदी बाबी जमीनींचा घास गिळत असल्याने हा आकडा कमी होत चालला आहे, असे खडसे यांनी सांगितले.
सध्या महाराष्ट्रातील १ कोटी ३५ लाख शेतकरी कृषीक्षेत्रावर अवलंबून असून ९० लाख शेतक-यांकडे एक हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे. ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे खडसे म्हणाले.  कुटुंबात होणा-या वाटण्यांमुळे शेताचा आकार आणखीनच कमी होत असून त्यामुळे उत्पन्नावरही विपरीत प्रभाव पडतो. त्या शेतक-यांव्यतिरिक्त ४५ लाख शेतकरी असे आहेत जे लहान, मध्यम व मोठ्या स्तरावर शेती करतात, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात धान्य पिकवण्याची क्षमता असून ते बाजारात विकता येऊ शकते, असेही खडसे म्हणाले.
वाढत्या लोकसंख्येमुळे गेल्या ५-६ दशकांमध्ये शेतक-यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र २०१०-११ पासून राज्यातील शेतक-यांची संख्या घटू लागली. २०१०-११पर्यंत राज्यात १.३७ कोटी शेतकरी होते, मात्र २०१३-१४ पर्यंत त्यांची संख्या घटली. 
पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समधील सहाय्यक प्राध्यापक संगीता श्रॉफ यांच्या सांगण्यानुसार सध्या राज्यातील स्थिती अतिशय गंभीर आहे. ' राज्यातील एकूण श्रमिक वर्गापैकी ५२.७ टक्के हे शेती व्यवसायातील असून २५.४ टक्के लोकांची स्वत:ची शेती आहे तर २७.३ टक्के नागरिक दुस-यांची शेती कसतात. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबादमधील श्रमिकांचा आकडा हटवल्यास कृषी क्षेत्रातील रोजगाराची टक्केवारी ८१.३६ टक्क्यांच्या आसपास आहे, याचाच अर्थ ग्रामीण भागातील लोकांसमोर उदरनिर्वाहासाठी शेतीशिवाय इतर कोणतेही पर्याय उपलब्ध नाहीत, असे त्या म्हणाल्या.