शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

मराठवाड्यातल्या धरणांमध्ये राहिला अवघा 1 टक्के पाणीसाठा

By admin | Updated: May 23, 2016 16:06 IST

मराठवाड्यामध्ये दुष्काळानं तीव्र रूप धारण केलं असून संपूर्ण मराठवाड्यातल्या धरणांमध्ये अवघा एक टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 23 - मराठवाड्यामध्ये दुष्काळानं तीव्र रूप धारण केलं असून संपूर्ण मराठवाड्यातल्या धरणांमध्ये अवघा एक टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी मराठवाड्यातली जनता पावसाकडे डोळे लावून बसली आहे. औरंगाबादचे डिव्हिजनल कमिशनर उमाकांत दांगट यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रांतातली सगळी धरणं तळाला गेली असून फक्त एक टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
भूगर्भातल्या पाण्याचा वापर सध्या करण्यात येत असल्याचे दांगट म्हणाले. हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला असून पाऊस येईपर्यंत आम्ही तग धरू शकू अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही विहीरी व बोअर वेल्स ताब्यात घेतल्या असून त्यामधून पाण्याचा उपसा करण्यात येत आहे, असं दांगट म्हणाले. त्याचप्रमाणे जवळपास 3,600 टँकर सध्या रस्तावर असून त्यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांना पाणी पुरवण्यात येत आहे. जायकवाडी धरणातून औरंगाबादला जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाणी पुरवता येईल असं सांगताना तोपर्यंत पाऊस पडेल अशी आशा असल्याचे दांगट म्हणाले.
गेल्या पाच वर्षात चार वर्षे मराठवाड्याने दुष्काळाची बघितली आहेत. परिणामी या प्रदेशातल्या तब्बल 8,522 गांवांना सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. लातूरसारख्या शहराला तर ट्रेनने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. बीड, लातूर, उस्मानाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये 400 चारा छावण्या उभारण्यात आल्या असून त्यांच्या माध्यमातून जनावारांना दाणा-पाण्याची सोय करण्यात येत आहे.