शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आता हवेत गतिशील विचार

By admin | Updated: August 7, 2016 01:54 IST

जीएसटीचा मुंबई मनपावर होणारा परिणाम कसा असेल? याचा विचार करण्यासाठी वस्तुस्थितीचा सारासार विचार करावा लागेल. मुंबई मनपाच्या २०१५-१६ या आर्थिक वर्षात

- अजित अभ्यंकर

जीएसटीचा मुंबई मनपावर होणारा परिणाम कसा असेल? याचा विचार करण्यासाठी वस्तुस्थितीचा सारासार विचार करावा लागेल. मुंबई मनपाच्या २०१५-१६ या आर्थिक वर्षात ३३ हजार ७०० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकातील सुमारे ८ हजार कोटी म्हणजेच २५ टक्के उत्पन्न जकातीतून जमा झाले आहे. त्यासाठी कोणत्याही अनुदानाची गरज नव्हती. अशा परिस्थितीत जीएसटी प्रणाली आली, तर उत्पन्नामध्ये पडणाऱ्या या तुटीसाठी, त्यांना पहिली ५ वर्षे केंद्र सरकार अनुदान देणार आहे, पण त्यानंतरच्या काळाचे काय असा प्रश्न आहे?मुंबई मनपावर सव्वा कोटी लोकसंख्येच्या नागरी व्यवस्थेची जबाबदारी आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईतून देशाचा निम्मा आयकर भरला जातो. जर आर्थिक तूट भरून निघाली नाही, तर मुंबईच्या दुरवस्थेत आणखी भर पडेल. त्याचा थेट विपरित आर्थिक परिणाम देशावर आणि राज्यावर होऊ शकतो, तसेच येथील जनतेच्या हालअपेष्टांमध्ये अधिक भर घालणाराही ठरू शकतो. मात्र, यातून दोन प्रतिक्रिया समोर येतील. एक म्हणजे, जीएसटीच्या व्यापक आर्थिक फायद्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष करून स्थितीवादी भूमिका घेऊन केवळ आमचे अनुदान कायम ठेवा, अशा प्रकारची मागणी करणे. दुसरी म्हणजे मुंबईचे विशेष स्थान आणि तेथील नागरी जीवनावर असणारा राष्ट्रीय स्थलांतरितांचा ताण याकडे पूर्णत: डोळेझाक करून जीएसटीचे अंधत्वाने स्वागत करणे. मात्र, या दोन्ही भूमिका चुकीच्या असून, त्यांचा पाया स्थितीशील विचाराचा आहे. त्याला योग्य पर्याय म्हणजे जीएसटी प्रणालीचा वास्तववादी गतिशील विचार करून भूमिका घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, जीएसटीमुळे जकात कर गेला, तरी एकूण सर्वच अप्रत्यक्ष करप्रणालीत पारदर्शकता आल्याने करपाया मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. अशी पारदर्शी आणि कमी करबुडेगिरीची करप्रणाली खरोखर येईल, असे (गृहित) मान्य केल्यास राज्यांनादेखील सेवांवर कर आकारता येणार असल्याने, त्यांचे त्या मार्गाने उत्पन्न वाढू शकते. या पार्श्वभूमीवर मुंबईचा विशेष विचार केला जावा, पण त्याचा अर्थ फक्त अनुदान देत राहा, असा नाही. तपशिलाची चर्चा येथे शक्य नाही. एक उदाहरण द्यायचे, तर येत्या काळात मुंबईमधून मिळणाऱ्या वाढत्या सेवा कराच्या उत्पन्नाचा विशेष अधिक असा भरीव वाटा या शहरासाठीच मिळाला पाहिजे, ही मागणी करावी लागेल.मुंबईमध्ये मालमत्ता कराचे उत्पन्न केवळ ४ हजार ४०० कोटी रुपयांचे आहे. अतिश्रीमंत उद्योगपती आणि उच्च मध्यमवर्गीय यांच्या मोठ्या मालमत्ता या शहरात आहेत. त्यांचे बाजारमूल्य आंतरराष्ट्रीय तुलनेतदेखील प्रचंड वेगाने वाढतच आहे. याचा अर्थ, येथे मालमत्ता विकत घेण्यामध्ये या वर्गाला जर आकर्षक वाटत असेल, तर त्यांना त्यांच्या मालमत्तांवरील करांमध्ये मोठ-मोठी वाढ देणे अगदी सहज परवडण्यासारखे आहे. सर्वसामान्य जनतेवर पडणाऱ्या सध्याच्या कररचनेला हा अधिक सक्षम आणि सामाजिक न्यायाचा पर्याय आहे.(लेखक अर्थविषयासह काळ््या पैशाचे अभ्यासक आहेत.)