शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

नीरा बाजारतळाच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्षच !

By admin | Updated: May 21, 2016 01:18 IST

नीरा शहरातील बाजारतळ परिसरात प्रामुख्याने शेतकरीवर्गासाठी मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत.

नीरा : सर्वाधिक उत्पन्नाची ग्रामपंचायत असलेल्या नीरा शहरातील बाजारतळ परिसरात प्रामुख्याने शेतकरीवर्गासाठी मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. आठवडेबाजारच्या दिवशी बाजारतळाच्या असलेल्या क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्राचा स्थानिक धनदांडगे आणि परगावातील व्यापाऱ्यांना बेसुमार वापर करू दिला जात आहे. शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी बाजारतळ परिसरातील लोकवस्तीमधील अंतर्गत रस्त्यांचा आधार घ्यावा लागतो. बाजारतळ परिसरात कोणत्याही प्रकारची स्वच्छतागृहाची आणि कचराकुंडीची ठोस मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी, व्यापारी नाराजी व्यक्त करत आहेत. नीरा शहरात दर बुधवारी भरणाऱ्या आठवडेबाजारसाठी ग्रामपंचायतीच्या मालकीचे सुमारे २३ गुंठ्यांपेक्षा अधिक क्षेत्र असल्याचे सांगितले जाते. आठवडेबाजारच्या करवसुलीपोटी नीरा ग्रामपंचायतीला ठेकेदाराच्या माध्यमातून वार्षिक २५ लाख रुपयांपेक्षा अधिक निव्वळ उत्पन्न मिळत आहे. वास्तविक, गुरुवार वगळता अन्य दिवशी या परिसरात प्रामुख्याने दररोज पहाटेपासून शेतमालाची ठोक विक्री सकाळपर्यंत होत असते. नीरा परिसरातील शिवतक्रार, पिंपरे खुर्द, थोपटेवाडी, पिसुर्टी, वाल्हे, पाडेगाव, निंबूत, गुळुंचे, कर्नलवाडी अशा विविध गावांतील शेतकरी नीरा शहरातील बाजारतळ परिसरातल्या मंडईमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणतात. या शेतमालाच्या खरेदीसाठी प्रामुख्याने निंबूत, जेजुरी, सासवड, लोणंद, सातारा, महाड अशा विविध भागांतील दलाल-व्यापारी रात्रीपासूनच गर्दी करतात.बाजारतळाकडे जाण्यासाठी काही अंतर्गत रस्ते असून त्यापैकी जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच मच्छी मार्केट वसलेले आहे. या मच्छी मार्केटपासून ग्रामपंचायतीला एका दमडादेखील उत्पन्न मिळत नाही. शेतमालाची भाजी मंडई आणि आठवडेबाजार भरत असलेल्या बाजारतळाच्या अपुऱ्या जागेतच ८ लाखांपेक्षा अधिक निधी खर्च करून अद्ययावत मटण-मच्छी मार्केट बांधण्याचा ग्रामपंचायतीने घाट घातला असल्याची माहिती समजते. सध्या मुख्य रस्त्यावरच मच्छी बाजार भरत असल्याने विक्रेते आणि ग्राहकांच्या गर्दी व उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर वाहतुकीची दररोज कोंडी होत असून, या भागातील नागरिकांना रहदारीची मोठी अडचण निर्माण होत आहे. (वार्ताहर)बाजारतळ परिसरात आठवडेबाजाराच्या दिवशी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कठड्यांवर बसून शेतमालाची विक्री करता यावी, यासाठी पणन मंडळाच्या सहकायार्ने २५ लाख रुपये खर्चून गेल्या वर्षी कठड्यांचा जीर्णोद्धार करण्यात आला. अंतर्गत रस्त्यांवर नव्याने फेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले, तर मध्यभागी भव्य मोठा पथदिवा बसवून प्रकाशाची चांगली सोय करण्यात आली. स्वच्छतागृह बांधण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराने अर्धवट स्थितीत सोडले आहे. संबंधित ठेकेदाराने स्वच्छतागृहाचे काम अपूर्ण अवस्थेत का ठेवले, याचा उलगडा मात्र होईना आणि ग्रामपंचायत प्रशासनदेखील त्याकडे लक्ष देईना. परिणामी, शेतकरी-व्यापारी या परिसरातील मुस्लिम समाजाच्या उर्दू शाळेच्या भिंतीलगतच्या जागेचा लघवीसाठी राजरोस वापर करीत आहेत.