शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

नीरा बाजारतळाच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्षच !

By admin | Updated: May 21, 2016 01:18 IST

नीरा शहरातील बाजारतळ परिसरात प्रामुख्याने शेतकरीवर्गासाठी मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत.

नीरा : सर्वाधिक उत्पन्नाची ग्रामपंचायत असलेल्या नीरा शहरातील बाजारतळ परिसरात प्रामुख्याने शेतकरीवर्गासाठी मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. आठवडेबाजारच्या दिवशी बाजारतळाच्या असलेल्या क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्राचा स्थानिक धनदांडगे आणि परगावातील व्यापाऱ्यांना बेसुमार वापर करू दिला जात आहे. शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी बाजारतळ परिसरातील लोकवस्तीमधील अंतर्गत रस्त्यांचा आधार घ्यावा लागतो. बाजारतळ परिसरात कोणत्याही प्रकारची स्वच्छतागृहाची आणि कचराकुंडीची ठोस मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी, व्यापारी नाराजी व्यक्त करत आहेत. नीरा शहरात दर बुधवारी भरणाऱ्या आठवडेबाजारसाठी ग्रामपंचायतीच्या मालकीचे सुमारे २३ गुंठ्यांपेक्षा अधिक क्षेत्र असल्याचे सांगितले जाते. आठवडेबाजारच्या करवसुलीपोटी नीरा ग्रामपंचायतीला ठेकेदाराच्या माध्यमातून वार्षिक २५ लाख रुपयांपेक्षा अधिक निव्वळ उत्पन्न मिळत आहे. वास्तविक, गुरुवार वगळता अन्य दिवशी या परिसरात प्रामुख्याने दररोज पहाटेपासून शेतमालाची ठोक विक्री सकाळपर्यंत होत असते. नीरा परिसरातील शिवतक्रार, पिंपरे खुर्द, थोपटेवाडी, पिसुर्टी, वाल्हे, पाडेगाव, निंबूत, गुळुंचे, कर्नलवाडी अशा विविध गावांतील शेतकरी नीरा शहरातील बाजारतळ परिसरातल्या मंडईमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणतात. या शेतमालाच्या खरेदीसाठी प्रामुख्याने निंबूत, जेजुरी, सासवड, लोणंद, सातारा, महाड अशा विविध भागांतील दलाल-व्यापारी रात्रीपासूनच गर्दी करतात.बाजारतळाकडे जाण्यासाठी काही अंतर्गत रस्ते असून त्यापैकी जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच मच्छी मार्केट वसलेले आहे. या मच्छी मार्केटपासून ग्रामपंचायतीला एका दमडादेखील उत्पन्न मिळत नाही. शेतमालाची भाजी मंडई आणि आठवडेबाजार भरत असलेल्या बाजारतळाच्या अपुऱ्या जागेतच ८ लाखांपेक्षा अधिक निधी खर्च करून अद्ययावत मटण-मच्छी मार्केट बांधण्याचा ग्रामपंचायतीने घाट घातला असल्याची माहिती समजते. सध्या मुख्य रस्त्यावरच मच्छी बाजार भरत असल्याने विक्रेते आणि ग्राहकांच्या गर्दी व उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर वाहतुकीची दररोज कोंडी होत असून, या भागातील नागरिकांना रहदारीची मोठी अडचण निर्माण होत आहे. (वार्ताहर)बाजारतळ परिसरात आठवडेबाजाराच्या दिवशी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कठड्यांवर बसून शेतमालाची विक्री करता यावी, यासाठी पणन मंडळाच्या सहकायार्ने २५ लाख रुपये खर्चून गेल्या वर्षी कठड्यांचा जीर्णोद्धार करण्यात आला. अंतर्गत रस्त्यांवर नव्याने फेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले, तर मध्यभागी भव्य मोठा पथदिवा बसवून प्रकाशाची चांगली सोय करण्यात आली. स्वच्छतागृह बांधण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराने अर्धवट स्थितीत सोडले आहे. संबंधित ठेकेदाराने स्वच्छतागृहाचे काम अपूर्ण अवस्थेत का ठेवले, याचा उलगडा मात्र होईना आणि ग्रामपंचायत प्रशासनदेखील त्याकडे लक्ष देईना. परिणामी, शेतकरी-व्यापारी या परिसरातील मुस्लिम समाजाच्या उर्दू शाळेच्या भिंतीलगतच्या जागेचा लघवीसाठी राजरोस वापर करीत आहेत.