शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

नीरा बाजारतळाच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्षच !

By admin | Updated: May 21, 2016 01:18 IST

नीरा शहरातील बाजारतळ परिसरात प्रामुख्याने शेतकरीवर्गासाठी मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत.

नीरा : सर्वाधिक उत्पन्नाची ग्रामपंचायत असलेल्या नीरा शहरातील बाजारतळ परिसरात प्रामुख्याने शेतकरीवर्गासाठी मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. आठवडेबाजारच्या दिवशी बाजारतळाच्या असलेल्या क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्राचा स्थानिक धनदांडगे आणि परगावातील व्यापाऱ्यांना बेसुमार वापर करू दिला जात आहे. शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी बाजारतळ परिसरातील लोकवस्तीमधील अंतर्गत रस्त्यांचा आधार घ्यावा लागतो. बाजारतळ परिसरात कोणत्याही प्रकारची स्वच्छतागृहाची आणि कचराकुंडीची ठोस मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी, व्यापारी नाराजी व्यक्त करत आहेत. नीरा शहरात दर बुधवारी भरणाऱ्या आठवडेबाजारसाठी ग्रामपंचायतीच्या मालकीचे सुमारे २३ गुंठ्यांपेक्षा अधिक क्षेत्र असल्याचे सांगितले जाते. आठवडेबाजारच्या करवसुलीपोटी नीरा ग्रामपंचायतीला ठेकेदाराच्या माध्यमातून वार्षिक २५ लाख रुपयांपेक्षा अधिक निव्वळ उत्पन्न मिळत आहे. वास्तविक, गुरुवार वगळता अन्य दिवशी या परिसरात प्रामुख्याने दररोज पहाटेपासून शेतमालाची ठोक विक्री सकाळपर्यंत होत असते. नीरा परिसरातील शिवतक्रार, पिंपरे खुर्द, थोपटेवाडी, पिसुर्टी, वाल्हे, पाडेगाव, निंबूत, गुळुंचे, कर्नलवाडी अशा विविध गावांतील शेतकरी नीरा शहरातील बाजारतळ परिसरातल्या मंडईमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणतात. या शेतमालाच्या खरेदीसाठी प्रामुख्याने निंबूत, जेजुरी, सासवड, लोणंद, सातारा, महाड अशा विविध भागांतील दलाल-व्यापारी रात्रीपासूनच गर्दी करतात.बाजारतळाकडे जाण्यासाठी काही अंतर्गत रस्ते असून त्यापैकी जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच मच्छी मार्केट वसलेले आहे. या मच्छी मार्केटपासून ग्रामपंचायतीला एका दमडादेखील उत्पन्न मिळत नाही. शेतमालाची भाजी मंडई आणि आठवडेबाजार भरत असलेल्या बाजारतळाच्या अपुऱ्या जागेतच ८ लाखांपेक्षा अधिक निधी खर्च करून अद्ययावत मटण-मच्छी मार्केट बांधण्याचा ग्रामपंचायतीने घाट घातला असल्याची माहिती समजते. सध्या मुख्य रस्त्यावरच मच्छी बाजार भरत असल्याने विक्रेते आणि ग्राहकांच्या गर्दी व उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर वाहतुकीची दररोज कोंडी होत असून, या भागातील नागरिकांना रहदारीची मोठी अडचण निर्माण होत आहे. (वार्ताहर)बाजारतळ परिसरात आठवडेबाजाराच्या दिवशी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कठड्यांवर बसून शेतमालाची विक्री करता यावी, यासाठी पणन मंडळाच्या सहकायार्ने २५ लाख रुपये खर्चून गेल्या वर्षी कठड्यांचा जीर्णोद्धार करण्यात आला. अंतर्गत रस्त्यांवर नव्याने फेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले, तर मध्यभागी भव्य मोठा पथदिवा बसवून प्रकाशाची चांगली सोय करण्यात आली. स्वच्छतागृह बांधण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराने अर्धवट स्थितीत सोडले आहे. संबंधित ठेकेदाराने स्वच्छतागृहाचे काम अपूर्ण अवस्थेत का ठेवले, याचा उलगडा मात्र होईना आणि ग्रामपंचायत प्रशासनदेखील त्याकडे लक्ष देईना. परिणामी, शेतकरी-व्यापारी या परिसरातील मुस्लिम समाजाच्या उर्दू शाळेच्या भिंतीलगतच्या जागेचा लघवीसाठी राजरोस वापर करीत आहेत.