शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
4
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
5
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
6
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
7
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
8
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
9
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
10
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
11
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
12
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
13
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
14
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
15
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
16
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
17
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
18
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
19
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
20
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."

जल, जमीन, जंगल संवर्धन काळाची गरज

By admin | Updated: June 9, 2016 02:31 IST

जागतिक स्तरावर तापमानवाढीचे संकट वाढत आहे. मानवाचा निसर्गात हस्तक्षेप वाढल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

मुंबई : जागतिक स्तरावर तापमानवाढीचे संकट वाढत आहे. मानवाचा निसर्गात हस्तक्षेप वाढल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मानवनिर्मित्त नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असल्याने प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जल-जमीन आणि जंगल या तिन्ही घटकांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित जागतिक पर्यावरण दिन सोहळ्याच्या समारोपाप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. या वेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगल आदी उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जलस्रोतांच्या प्रदूषणाचे एकत्रित नियोजन करून जल प्रदूषणमुक्त करणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर वाढलेल्या कार्बन फुट प्रिंटचे प्रमाण कमी करणेसुद्धा गरजेचे आहे. आपण ज्या प्रमाणात कार्बन फुट प्रिंट तयार करतो त्याचे प्रमाण प्रत्येकाने कमी केले तरी पर्यावरणाचे संवर्धन केल्याचा मोठा आनंद आपल्याला मिळेल. शासनाकडून १ जुलै रोजी राज्यात एक कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.रामदास कदम म्हणाले, महानगरातील सांडपाणी थेट नद्यांमध्ये, समुद्रात सोडण्यावर पर्यावरण विभागाने निर्बंध आणले असून, महानगरपालिका व नगरपालिका यांनी अर्थसंकल्पात २५ टक्के निधी हा सांडपाणी आणि कचऱ्याच्या व्यवस्थापनावर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवीण पोटे-पाटील म्हणाले, पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कार्य केले पाहिजे.स्वाधीन क्षत्रिय म्हणाले, महाराष्ट्राचा विकासदर ८ टक्के आहे. परंतु हा विकास दर फक्त औद्योगिक, सेवा याच क्षेत्रांत असून कृषी क्षेत्रात हा विकासदर कमी आहे. कृषी क्षेत्राचा विकास केला तर महाराष्ट्राचा विकासदर १० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून ‘जलयुक्त शिवार’ या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात काम केल्यामुळे पाण्याचे स्रोत निर्माण झाले आहेत. वनक्षेत्राचे प्रमाण २१ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपेक्षा अधिक वाढविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने १ जुलै रोजी एक कोटी वृक्ष लागवड करून राज्यात ‘हरित महाराष्ट्र’ मोहीम सुरू करण्यात येणार आहे.