शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जल, जमीन, जंगल संवर्धन काळाची गरज

By admin | Updated: June 9, 2016 02:31 IST

जागतिक स्तरावर तापमानवाढीचे संकट वाढत आहे. मानवाचा निसर्गात हस्तक्षेप वाढल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

मुंबई : जागतिक स्तरावर तापमानवाढीचे संकट वाढत आहे. मानवाचा निसर्गात हस्तक्षेप वाढल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मानवनिर्मित्त नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असल्याने प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जल-जमीन आणि जंगल या तिन्ही घटकांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित जागतिक पर्यावरण दिन सोहळ्याच्या समारोपाप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. या वेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगल आदी उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जलस्रोतांच्या प्रदूषणाचे एकत्रित नियोजन करून जल प्रदूषणमुक्त करणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर वाढलेल्या कार्बन फुट प्रिंटचे प्रमाण कमी करणेसुद्धा गरजेचे आहे. आपण ज्या प्रमाणात कार्बन फुट प्रिंट तयार करतो त्याचे प्रमाण प्रत्येकाने कमी केले तरी पर्यावरणाचे संवर्धन केल्याचा मोठा आनंद आपल्याला मिळेल. शासनाकडून १ जुलै रोजी राज्यात एक कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.रामदास कदम म्हणाले, महानगरातील सांडपाणी थेट नद्यांमध्ये, समुद्रात सोडण्यावर पर्यावरण विभागाने निर्बंध आणले असून, महानगरपालिका व नगरपालिका यांनी अर्थसंकल्पात २५ टक्के निधी हा सांडपाणी आणि कचऱ्याच्या व्यवस्थापनावर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवीण पोटे-पाटील म्हणाले, पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कार्य केले पाहिजे.स्वाधीन क्षत्रिय म्हणाले, महाराष्ट्राचा विकासदर ८ टक्के आहे. परंतु हा विकास दर फक्त औद्योगिक, सेवा याच क्षेत्रांत असून कृषी क्षेत्रात हा विकासदर कमी आहे. कृषी क्षेत्राचा विकास केला तर महाराष्ट्राचा विकासदर १० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून ‘जलयुक्त शिवार’ या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात काम केल्यामुळे पाण्याचे स्रोत निर्माण झाले आहेत. वनक्षेत्राचे प्रमाण २१ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपेक्षा अधिक वाढविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने १ जुलै रोजी एक कोटी वृक्ष लागवड करून राज्यात ‘हरित महाराष्ट्र’ मोहीम सुरू करण्यात येणार आहे.