शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

राष्ट्रवादीचा मुक्काम पोस्ट विधानसभा!

By admin | Updated: December 16, 2014 02:31 IST

एरव्ही कधीही स्वत:च्या विषयाव्यतीरिक्त सभागृहात फारसे न दिसणाऱ्या राष्ट्रवादीच्या सगळ्या ज्येष्ठ आमदारांनी सध्या विधानसभेत मुक्काम ठोकल्याचेच चित्र पहावयास मिळत आहे

अतुल कुलकर्णी, नागपूरएरव्ही कधीही स्वत:च्या विषयाव्यतीरिक्त सभागृहात फारसे न दिसणाऱ्या राष्ट्रवादीच्या सगळ्या ज्येष्ठ आमदारांनी सध्या विधानसभेत मुक्काम ठोकल्याचेच चित्र पहावयास मिळत आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सभागृहातल्या कामकाजात भाग घेत, संधी मिळेल तेथे सत्ताधाऱ्यांची अडचण करत सगळे नेते बसून आहेत.विधीमंडळाचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री छगन भूजबळ आणि जयदत्त क्षीरसागर हे पहिल्या रांगेतल्या बाकांवर सभागृह सुरु झाल्यापासून बसलेले असतात. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील हेच चित्र पहावयास मिळाले. सकाळी १० वाजताच सभागृहाचे कामकाज सुरु झाले तेव्हा हे सगळे सभागृहात हजर होते. जितेंद्र आव्हाड यांना निलंबीत केल्यामुळे सभागृहाच्या कामकाजावर अधिवेशन संपेपर्यंत बहिष्कार टाकण्याची भूमिका राष्ट्रवादीने जाहीर केली होती. मात्र सोमवारी कामकाज सुरु होताच ‘राज्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे त्यामुळे बहिष्कार न टाकता आम्ही कामकाजात सहभागी होत आहोत’ असे अजित पवारांनी जाहीर केले. त्यावेळी सभागृहात काँग्रेसचा एकही ज्येष्ठ सभासद हजर नव्हता. काँग्रेसचे गट नेते राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण आणि नागपुरातच रहाणारे विजय वडेट्टीवार हे अकरा, साडे अकराच्या सुमारास सभागृहात आले.एकीकडे भाजपाला न मागता पाठींबा जाहीर करणाऱ्या राष्ट्रवादीने सभागृहात मात्र छोट्या छोट्या मुद्यावर सरकारला अडचणीत आणणे सुरु केले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्यावेळी मुख्यमंत्री सभागृहात नव्हते. तेव्हा वळसे पाटील यांनी हरकत घेतली. शेवटी मुख्यमंत्री सभागृहात आले. विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे उभे राहून बोलत असताना उद्योगमंत्री सुभाष देसाई सभागृहाबाहेर गेले तेव्हा भूजबळांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. अशा अनेक गोष्टीत राष्ट्रवादीने सरकारला अडचणीत आणणे सुरु केले आहे. त्यामुळेच सभागृहात ज्येष्ठ मंत्र्यांना सतत बसून रहावे लागत आहे.काँग्रेसला मात्र अजूनही सभागृहात सूर सापडलेला नाही. किंबहुना आपण विरोधी बाकावर आलो आहोत हे पचनी पडलेले नाही. राष्ट्रवादीचे मंत्री ज्या पध्दतीने अडचणीचे मुद्दे उपस्थित करतात, सभागृहात काय चालले आहे यावर बारीक लक्ष ठेवून असतात तसे काँग्रेसकडून होताना दिसत नाही. आव्हाड यांच्या निलंबनावरुन बहिष्कार टाकणाऱ्या राष्ट्रवादीने सोमवारी कामकाजात भागही घेतला आणि आव्हाडांचे निलंबनही रद्द करुन घेतले. ही फ्लोअर मॅनेजमेंट काँग्रेसला अजूनही जमलेली नाही. नाही म्हणता विधानपरिषदेत राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेची निवड जाहीर करावी म्हणून राष्ट्रवादीने सभागृह डोक्यावर घेतले पण जोपर्यंत विधानसभेचा विरोधीपक्षनेता जाहीर होत नाही तोपर्यंत परिषदेचा जाहीर करायचा नाही यासाठी काँग्रेसने सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावर दबाव आणला. त्यातूनच राष्ट्रवादीने सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. परिषदेत काँग्रेस जेवढी आक्रमक झालेली दिसते तेवढी विधानसभेत मात्र दिसत नाही.