शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

नवाब मलिक पुन्हा ठरले खोटे; वनविभागाच्या खुलाशाने खोटेपणा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2016 00:49 IST

रामदेवबाबा यांच्या पतंजली समूहाला औषधी वनस्पतींसाठी वनजमीन देण्याचा प्रयत्न होत असल्याचे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे आरोप धादांत खोटे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

मुंबई : रामदेवबाबा यांच्या पतंजली समूहाला औषधी वनस्पतींसाठी वनजमीन देण्याचा प्रयत्न होत असल्याचे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे आरोप धादांत खोटे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या आधीही विविध खात्यांवर केलेले आरोप मलिक सिद्ध करू शकले नव्हते.केवळ सनसनाटी निर्माण करून प्रसिद्धी लाटण्याचा त्यांचा स्वभाव बनल्याचा आरोप वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. राज्यामध्ये वनक्षेत्राच्या जवळपास १५,५०० गावे असून, त्यात आदिवासींची संख्या अधिक आहे. लोकसहभागातून वन व वन्यजीव यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत. या समित्यांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या कलाकुसर असलेल्या वस्तू, औषधी वनस्पती आणि गौण वनउत्पादनांना बाजारपेठ नसल्याने, त्यांना योग्य भाव मिळत नाही. आदिवासींचे जीवनमान उंचावणे आणि त्यांची सामाजिक, तसेच आर्थिक उन्नती साधने हा शासनाचा हेतू होता. अशा वनव्यवस्थापन समित्यांनी आपली उत्पादने कोणाला द्यायची, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. त्यांना प्रशिक्षण व अन्य बाबींसंदर्भात सहाय्यभूत भूमिका बजाविण्याचे वनविभागाने ठरविले. त्यातून रामदेवबाबांची भेट घेतली गेली, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून रामदेव यांची भेट होती. मात्र, पतंजली समूहाबरोबर वनौषधी व इतर वनउत्पादनांची विक्री करण्याबाबत कोणताही करार झालेला नाही. रामदेव यांच्या कंपनीला औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी जमीन देण्याची बातमीही पूर्णत: निराधार आहे. वनजमीन कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तींना देण्यासंदर्भात केंद्रीय वनसंवर्धन कायदा अत्यंत कडक आहे. गरीब, कष्टकरी आदिवासींना उपजीविकेचे साधन निर्माण करून देण्याचा आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न हे सरकार असे प्रयत्न करत असताना, मलिक यांनी आरोप करून गोरगरिबांच्या हक्कांच्या आड येऊ नये, असा सल्लाही मुनगंटीवार यांनी दिला आहे.