शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

नवाब मलिक पुन्हा ठरले खोटे; वनविभागाच्या खुलाशाने खोटेपणा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2016 00:49 IST

रामदेवबाबा यांच्या पतंजली समूहाला औषधी वनस्पतींसाठी वनजमीन देण्याचा प्रयत्न होत असल्याचे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे आरोप धादांत खोटे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

मुंबई : रामदेवबाबा यांच्या पतंजली समूहाला औषधी वनस्पतींसाठी वनजमीन देण्याचा प्रयत्न होत असल्याचे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे आरोप धादांत खोटे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या आधीही विविध खात्यांवर केलेले आरोप मलिक सिद्ध करू शकले नव्हते.केवळ सनसनाटी निर्माण करून प्रसिद्धी लाटण्याचा त्यांचा स्वभाव बनल्याचा आरोप वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. राज्यामध्ये वनक्षेत्राच्या जवळपास १५,५०० गावे असून, त्यात आदिवासींची संख्या अधिक आहे. लोकसहभागातून वन व वन्यजीव यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत. या समित्यांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या कलाकुसर असलेल्या वस्तू, औषधी वनस्पती आणि गौण वनउत्पादनांना बाजारपेठ नसल्याने, त्यांना योग्य भाव मिळत नाही. आदिवासींचे जीवनमान उंचावणे आणि त्यांची सामाजिक, तसेच आर्थिक उन्नती साधने हा शासनाचा हेतू होता. अशा वनव्यवस्थापन समित्यांनी आपली उत्पादने कोणाला द्यायची, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. त्यांना प्रशिक्षण व अन्य बाबींसंदर्भात सहाय्यभूत भूमिका बजाविण्याचे वनविभागाने ठरविले. त्यातून रामदेवबाबांची भेट घेतली गेली, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून रामदेव यांची भेट होती. मात्र, पतंजली समूहाबरोबर वनौषधी व इतर वनउत्पादनांची विक्री करण्याबाबत कोणताही करार झालेला नाही. रामदेव यांच्या कंपनीला औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी जमीन देण्याची बातमीही पूर्णत: निराधार आहे. वनजमीन कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तींना देण्यासंदर्भात केंद्रीय वनसंवर्धन कायदा अत्यंत कडक आहे. गरीब, कष्टकरी आदिवासींना उपजीविकेचे साधन निर्माण करून देण्याचा आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न हे सरकार असे प्रयत्न करत असताना, मलिक यांनी आरोप करून गोरगरिबांच्या हक्कांच्या आड येऊ नये, असा सल्लाही मुनगंटीवार यांनी दिला आहे.