शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

नरसिंह राव व मनमोहन सिंग यांनी आर्थिक विकासाचा पाया रचला - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 29, 2015 09:52 IST

नरेंद्र मोदी लोकप्रियतेत पुढेच असले देशाच्या विकासाचा पाया नरसिंह राव व मनमोहन सिंग यांनी रचला होता अशी आठवण करुन देत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पुन्हा एकदा चिमटा काढला आहे.

ऑनलान लोकमत 

मुंबई, दि. २९ - पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियतेत पुढेच असले तरी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी हेदेखील परदेशात तितकेच लोकप्रिय होते. तर देशाला विकासाच्या दिशेकडे नेण्यात नरसिंह राव व मनमोहन सिंग यांनी मोलाची भूमिका बजावली होती अशी आठवण करुन देत उद्धव ठाकरे यांनी  केंद्र सरकारला पुन्हा एकदा चिमटा काढला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौ-यावर मंगळवारी सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. मोदी हे परदेशात लोकप्रिय असून ते अधिक वेगाने देशाला पुढे नेत असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी मोदींचे अभिनंदनही केले आहे. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरेंनी थेट काँग्रेस नेत्यांचे कौतुक केले आहे. सोशल मिडीया, प्रसारमाध्यम हा प्रकार अस्तित्वात नव्हता त्या काळातही पं. नेहरु, इंदिरा गांधी व राजीव गांधी हे परदेशात लोकप्रिय होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. देश बिकट अवस्थेत होता त्यावेळी देशाच्या आर्थिक विकासाचा पाया नरसिंह राव व मनमोहन सिंग यांनीच रचला होता अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या नेत्यांचे कौतुक केले. विदेशी कंपन्यांच्या आर्थिक फायद्यासाठी आमच्या माणसांचे फळबाग व शेती संपवू देणार नाही, परदेशातील कचरा आमच्या तोंडावर मारण्याचा धंदा घातक असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा जैतापूर प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.