शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

राज्यात २५ लाखांहून जास्त खटले प्रलंबित

By admin | Updated: August 23, 2015 01:59 IST

पोलीस आणि सरकारी वकिलांच्या एकत्रित, प्रामाणिक प्रयत्नांमधूनच दोषसिद्धी दर वाढतो. म्हणजेच जास्तीतजास्त खटल्यांमध्ये सबळ पुराव्यांआधारे न्यायालय आरोपींना शिक्षा ठोठावते

मुंबई : पोलीस आणि सरकारी वकिलांच्या एकत्रित, प्रामाणिक प्रयत्नांमधूनच दोषसिद्धी दर वाढतो. म्हणजेच जास्तीतजास्त खटल्यांमध्ये सबळ पुराव्यांआधारे न्यायालय आरोपींना शिक्षा ठोठावते. ही शिक्षा समाजात कठोर संदेश पसरवते आणि आरोपी गुन्हे करण्यास धजावत नाहीत. महाराष्ट्रात मात्र दोषसिद्धीदर अन्य राज्यांच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे निरीक्षण नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने नोंदवले आहे. धक्कादायक म्हणजे प्रलंबित खटल्यांच्या बाबतीत महाराष्ट्राने उत्तर प्रदेश व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातवर मात करत प्रथम स्थान पटकावले आहे. २०१४मध्ये जुने, नवे असे मिळून एकूण २५ लाख ७९ हजार खटले विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. उत्तर प्रदेशात २३ लाख २१ हजार तर गुजरातेत २१ लाख २४ हजार खटले प्रलंबित आहेत. भारतीय दंड विधान व स्थानिक कायद्यांनुसार देशभरात १ कोटी ९४ लाख २६ हजार खटल्यांची सुनावणी २०१४मध्ये न्यायालयांनी घेतली. ४९ लाख ९० हजार खटल्यांचा निकाल २०१४मध्ये लागला. त्यात ३९ लाख खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली तर १० लाख खटल्यांमधील आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. या आकडेवारीनुसार, संपूर्ण देशाचा दोषसिद्धी दर ४५.१ (भादंवि) आणि ९२.७ (स्थानिक कायदे) असा आहे. मात्र महाराष्ट्रात हाच दर १९.३ (भादंवि) आणि २६.५ (स्थानिक कायदे) इतका कमी आहे. भारतीय दंड विधानानुसार दाखल खटल्यांच्या दोषसिद्धी दरात ईशान्येकडील मिझोराम, नागालॅण्ड ही राज्ये सर्वांत अव्वल आहेत. केरळ, तामिळनाडू ही राज्ये तिसऱ्या, चौथ्या स्थानी आहेत. आसाम, बिहार, ओडीशा, पश्चिम बंगाल, दिव-दमण, दादरानगर हवेली ही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांपुढे महाराष्ट्र आहे. उर्वरित देश महाराष्ट्रापुढे आहे. दोषसिद्धीदर वाढविण्याची जबाबदारी ही जितकी पोलिसांची आहे तितकीच सरकारी वकिलांचीही आहे. गुन्ह्याचा अचूक तपास, भक्कम पुरावे गोळा करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. तर पोलिसांनी गोळा केलेले पुरावे न्यायालयात अचूकपणे मांडणे हे वकिलांचे. यापैकी एकही बाजू कमी पडल्यास त्याचा थेट परिणाम दोषसिद्धीवर होतो, असे निरीक्षण राज्याचे महासंचालकसंजीव दयाळ वेळोवेळी मांडतात. तर प्रलंबित खटले वेगाने निकाली काढण्यासाठी न्यायालये व न्यायाधीशांची संख्या वाढवायला हवी. (प्रतिनिधी)विशेष न्यायालये स्थापन करावीतमहिला, अल्पवयीन मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्याविरोधातील गुन्ह्यांचे खटले चालविण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करायला हवीत. प्रलंबित खटल्यांचा अभ्यास करून ते ठरावीक कालमर्यादेत निकाली निघावेत यासाठी कार्यक्रम आखावा. किरकोळ गुन्ह्यांच्या खटल्यात तत्थ्य नसल्यास अथवा साक्षीदार, पंच उपलब्ध नसल्यास ते तत्काळ निकाली काढण्यासाठी सरकारी पक्षाने पुढाकार घ्यावा, असे मत अभिनंदन वग्याणी यांनी व्यक्त केले.