शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’मुळे मेडिकलच्या जागा रिक्त राहणार

By admin | Updated: May 16, 2016 01:55 IST

(नीट) परीक्षेत ७२० गुणांपैकी ३६० गुणांपेक्षा अधिक मिळविणारे उमेदवारच मेडिकल प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.

पुणे : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रान्स टेस्ट (नीट) परीक्षेत ७२० गुणांपैकी ३६० गुणांपेक्षा अधिक मिळविणारे उमेदवारच मेडिकल प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. दोन महिन्यांत नीट परीक्षेचा अभ्यास करून राज्यातील विद्यार्थ्यांना ३६० गुण मिळणे अवघड जाईल. परिणामी, राज्यातील मेडिकल प्रवेशाच्या जागा रिक्त राहतील, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यातील विद्यार्थी हुशार असल्याने प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.केंद्रीय मध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार मेडिकल अभ्यासक्रमास प्रवेश मिळणार आहे. गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून नीट परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी ७२० गुणांपैकी ३६० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवतील. मात्र, राज्य मंडळाच्या केवळ बारावीच्या अभ्यासक्रमाच्या आधारे सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांत अभ्यास करून ३६० गुण मिळवण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घ्यावे लागतील. तेव्हाच राज्यात मेडिकल प्रवेशाच्या एकूण ६ हजार ५०० जागा भरल्या जातील. सीबीएसईतर्फे २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या नीट परीक्षेला राज्यातून १ लाख ३४ हजार ४४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ९६ हजार ५४६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. या परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर करण्यात आला होता. तसेच विद्यार्थ्यांना या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. त्यामुळे २०१३ च्या नीट परीक्षेत ७२० गुणांपैकी ९८ गुण मिळवून मेडिकल प्रवेशासाठी ३३ हजार ९६४ विद्यार्थी पात्र ठरले होते. मात्र, यंदा मेडिकल सीईटी परीक्षेसाठी राज्यातील सुमारे २ लाख ८० हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून त्यांनी राज्य मंडळाचा केवळ बारावीचा अभ्यास केला आहे. आता त्यांना सीबीएससी बोर्डाचा अकरावी आणि बारावी या दोनही वर्षाचा अभ्यासक्रम दोन महिन्यात पूर्ण करायचा आहे. त्यातच ७२० पैकी ३६० गुण मिळवायचे आहेत. राज्यातील विद्यार्थी एवढे गुण मिळवू शकतील का? याबाबत शंका व्यक्त होत आहे. >२०१३ च्या ‘नीट’साठी जून २०१२ मध्येच कोणता अभ्यास करावा, हे स्पष्ट केले होते. आता २ महिन्यांतच अभ्यास करावा लागेल. यंदा उत्तीर्ण होण्यासाठी ५० % गुण लागतील. २०१३ मध्ये १३ % गुण मिळवावे लागले होते. त्यामुळे राज्यातील जागा रिक्त राहू शकतात.- दुर्गेश मंगेशकर, संचालक, आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र>विद्यार्थी ७२० पैकी ३६० गुण मिळवतील, याबाबत शंका नाही. कमी गुण मिळाल्यास गरज भासल्यास ५ ते १० गुणांनी कट आॅफ खाली घेता येऊ शकतो. मात्र, २०१३ च्या नीट परीक्षेचा अनुभव विचारात घेता कट आॅफ खाली घेण्याची वेळ येणार नाही. -प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय