शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अनेकांचा रोजगार बुडाला, विकासकामे झाली ठप्प!

By admin | Updated: January 19, 2017 03:42 IST

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच पुन्हा शासनाच्या जाचक अटीमुळे गौण खनिजा अभावी विकासकामे ठप्प होणार आहे.

राहुल वाडेकर,

विक्रमगड- नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच पुन्हा शासनाच्या जाचक अटीमुळे गौण खनिजा अभावी विकासकामे ठप्प होणार आहे. त्यामुळे शासनाच्या गौण खनिज परवान्याकरीता असलेल्या जाचक अटी व निकष बदलणार केव्हा? याकडे सा-यांचे लक्ष लागून राहीलेले आहे.एकंदरीत गौण खनिजाअभावी अनेकांना अर्थिक नुकसान सोसावे लागले आहे, तर अनेकांची रोजीरोटी बुडाली आहे़ मात्र शासनाच्या तिजोरीत अधिकृतरित्या गौण खनिज उत्खननातून नाममात्र भर पडते आहे़ शासनाकडून दरवर्षी नवीन नियम व निकष दिलेले जात आहेत़ दरवर्षी प्रत्येक तालुक्यारीता गौणखनिज वसुलीकरीता इष्टांक दिला जातो़ मात्र यामध्ये व्यवसाय करणारे व त्यावर आपली उपजिविका करणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत़. त्यामुळे शासनाने गौण खनिज परवान्याकरीता लादलेल्या जाचक अटी शिथिल करण्याची मागणी होत आहे२०१७ साठी गौण खनिज उत्खन्नाबाबत केंद्रीय वन व पर्यावरण विभागाची परवानगी अनिवार्य केल्याने विक्रमगड तालुक्यातील अनेक विकास कामे ठप्प झाली आहेत़ विकासांनी विविध विभागात ६०/४० मध्ये बिल्डींगचे बांधकामे सुरु केली आहेत़ मात्र रेती, डबर, खडी वेळेवर उलब्धहोत नसल्याने कामे अर्धवट पडली आहेत़ विकासकांकडे ग्राहक बिल्डींगचे बांधकाम सुरु असतानाच बुकींग करत असतात, मात्र बिल्डींग तयार झाल्यावर तिचा दर वाढलेला असतो़ मात्र सद्यस्थितीत बांधकामे ठप्प असल्याने व विविध सामुग्रीचे भाव वाढत चाललेले असल्याने विकासकांना नाहक आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे़ नाईलाजास्तव चोरटया मार्गने चढया भावाने रेती घ्यावी तर त्यावर कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई करण्यांत येते़ त्यामुळे ना घर का ना घाट का अशी परिस्थिती विकासकांची सध्या झाली आहे़तालुक्यातील शाळा, अंगणवाडी वर्गखोली बांधकाम, आश्रमशाळा, आरोग्यकेंद्रे यांच्या दुरुस्तीची व बांधकामांची कामे पूर्णपणे थांबलेली आहेत़ याशिवाय तालुक्यातील शासकीय कार्यालयाच्या दुरुस्तीची व बांधकामांची कामे देखील ठप्प आहेत़ रस्ते दुरुस्ती, शासनाच्या योजनेतील घरकुल बांधकामे, निमसरकारी, खाजगी बांधकामे अशांवर मर्यादा आली असून तालुक्याचा विकासच जवळजवळ खुंटला आहे़रेती उत्खन्न, डबर उत्खन्न, खडी उत्खन्न या कामांवर अनेक संसार चालत आहेत़ यावर रोजीरोटी कमविणारे मजूर या कामांवर आपला प्रपंच ८ महिने चालवित असतात मात्र त्यांच्याही हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे़. एकीकडे डिजिटल इंडिया आणि कॅशलेस इंडिया, स्टार्ट अप इंडिया अशा घोषणा देणाऱ्या सरकारला गरीबांची ही कोंडी दिसत नाही काय?>तेल गेले तूप गेले अशी अवस्थारॉयल्टी मिळत नसल्याने चोरटया मार्गाने डबर, खडी, वाळू वाहतूक करावी तर कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई केली जाते़. त्यामुळे चोरटया मार्गाने गौण खनिज विकत घेणा-याला चढा भाव दयावा लागतो व कार्यालयाकडून कारवाई झाल्यावर दंडही भरावा लागतो त्यामुळे तेल गेले तुप गेले हाती राहीले धुपाटणे अशी पाळी येऊन ठेपली आहे़ दरम्यान विक्रमगड तहसिल कार्यालयाकडून चोरटया गौण खनिज वसुलीचा गेल्या वर्षी १ कोटी ५१ लाखांचा इष्टांक देण्यात आला होता, तोच आता १ कोटी २९ लाखांचा आहे़ दरम्यान विकासक, मजूर यांची परिस्थिती बिकट झाली असल्याचे ते बोलून दाखवित आहेत़ त्यामुळे शासनाने गौण खनिज रॉयल्टी (परवानगी) कामी असलेले निकष, अटी बदलणे, शिथिल करणे गरजेचे आहे़शासनाकडुन चालु वर्षामध्ये गौण खनिज उत्खन्नाबाबत केंद्रीय वन व पर्यावरण विभागाची परवानगी अनिवार्य आहे़ तसेच शासनाने परवानगीमध्ये अ ब क याप्रमाणे परवाना धारकाच्या नावासहीत बारकोड असलेली पावती दिली आहे़ यावर्षी सन-२०१७ करीता तहसिल कार्यालयास १ कोटी २९ लाखांचा रॉयल्टी वसुली इश्टांक देण्यात आला आहे़ - एस. के कामडी, निवासी तहसिलदार विक्रमगड