शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

पराभवाचे मुंबईत मंथन

By admin | Updated: May 23, 2014 00:11 IST

बुथ कमिट्यांच्या नियोजनाचा अभाव; योजना लोकांपर्यंत न पोहोचणे भोवले

अकोला: लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर गुरुवारी मुंबई येथे पार पडलेल्या समीक्षा बैठकीत प्राथमिक स्तरावर चिंतन करण्यात आले. बुथ कमिट्यांच्या नियोजनाचा अभाव आणि सरकारच्या योजना लोकांपर्यंत न पोहोचल्याने पराभव झाल्याचा निष्कर्ष बैठकीत काढण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र बैठकीत पराभवाचे सखोल विश्लेषण करण्यात आले नसून, लवकरच प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्‘ात बैठक घेण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. जिल्‘ातील कॉँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी, पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून स्वत:चे दामटलेले घोडे, नियोजनाचा अभाव आदींमुळे लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा पराभव झाला. कॉँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल हे दुसर्‍या क्रमांकावर राहिले. भाजपचे उमेदवार खा. संजय धोत्रे हे २ लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले. या पराभवाचे विश्लेषण करून वर्षअखेर होणार्‍या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी मुंबईत गुरुवारी पक्ष कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाला जनतेने का नाकारले, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्र आणि राज्य शासनाने सर्वच स्तरातील आणि प्रत्येक समाज घटकासाठी योजना तयार केल्या. नागरिकांचे जीवनमान उंचवावे, यासाठी कायदेही केले. मात्र हे निर्णय आणि योजना जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत. तसेच या योजना लोकाभिमुख आहेत, हेही नागरिकांना पटवून देण्यात नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अपयश आले. जिल्‘ात बुथ कमिट्यांचे नियोजन करण्यास विलंब झाला. सर्वच पदाधिकारी आणि नेत्यांनी विजयासाठी सांघिक प्रयत्न केले नाहीत. या सर्व कारणांमुळे पक्षाचा पराभव झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. समीक्षा बैठकीत जिल्‘ातील पदाधिकार्‍यांनी सूचनाही केल्या. बैठक प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. बैेठकीला अकोल्यातून जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, माजी आ. लक्ष्मणराव तायडे, सुधाकरराव गणगणे, नातिकोद्दिन खतीब, महानगराध्यक्ष मदन भरगड, बबनराव चौधरी, वाशिमचे दिलीप सरनाईक, डॉ. झिशान हुसेन, बद्रुजमा, आ. अमित झनक, नगरसेवक साजिद खान पठाण, प्रकाश तायडे, डॉ. सुभाषचंद्र कोरपे आदी उपस्थित होते. ** विधानसभेसाठी तयारीला लागण्याच्या सूचना....यंदा होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना प्रदेश पातळीवरून देण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टीने जिल्‘ातील रखडलेले प्रकल्प, योजना व प्रश्नांचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. यामध्ये विमानतळ विस्तारीकरण, एलबीटीचा समावेश राहणार आहे. हे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.