शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वाचविण्यासाठी महाराष्ट्र सरसावला

By admin | Updated: May 22, 2016 03:27 IST

‘लोकमत’च्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन राज्यात वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर पाणी वाचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून

मुंबई : ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन राज्यात वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर पाणी वाचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, अभियानाच्या तिसऱ्या आठवड्याच्या उंबरठ्यावर असतानाच संपूर्ण महाराष्ट्र पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविण्यासाठी सरसावला असल्याचे चित्र दिसत आहे.पावसाळ्यात जमिनीत मुरलेले तसेच खडकांतून पाझरणारे पाणी तळघरात एकत्र करून ते आंघोळीपासून कपडे धुण्यापर्यंत व स्वच्छतागृहापासून ते कुंड्यांतील झाडांना घालून टेरेसवर बगिचा फुलविण्याचा अनोखा प्रयोग राजारामपुरीतील बकरे कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे, या पाणीबचतीचा संदेश परिसरातील सुमारे पाच-सहा कुटुंबीयांनीही घेऊन त्यांनीही पाणीबचतीचा मार्ग अवलंबला आहे. व्यवसायाने आर्किटेक्चर असलेले मोहन गोविंद बकरे त्यांचे भाऊ आर्टिस्ट विलास बकरे व नंदकुमार बकरे यांनी पाणीबचतीचा संदेश परिसरातही पोहोचविण्याचे काम कृतीतून केले आहे. पावसाच्या पूर्ण हंगामात कसाबसा एक ते सव्वा इंच पाऊस होणाऱ्या हातकणंगले तालुक्यात कोल्हापुरातील शेतकरी बाळासाहेब कारदगे यांनी ५० एकरातील आंब्याची दोन हजार झाडे जगविली आहेत. यासाठी त्यांनी पर्जन्य जलसंचयाद्वारे (रेन वॉटर हार्वेस्टिंग) स्वयंपूर्णता साधली आहे. मौजे तासगाव-हेर्ले सीमेवर ५० एकर कोरडवाहू जमिनीवर पाच वर्षांपूर्वी आंब्याची दोन हजार झाडे लावली. त्यांना पाणी देण्यासाठी त्यांनी या परिसरात ३ कूपनलिका आणि विहीर खोदली. पाणीटंचाईच्या स्थितीत झाडे जगविण्यासाठी त्यांच्या मुळावर ज्यूटच्या पोत्यांचे आवरण घालणे, असे प्रयत्न त्यांनी केले. पण, पाण्यासाठी ठोस पर्याय असावा, या उद्देशाने त्यांनी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करण्याचे ठरविले. यानुसार त्यांनी त्यांच्या जमिनीच्या परिसरात असलेल्या कूपनलिका आणि कृषी विभागाने बांधलेला बंधारा या ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग केले. (प्रतिनिधी)घरातील सिंक अथवा बेसिनमध्ये मुख्यत्वे कप-बशा विसळणे, भाजी धुणे अशी कामे केली जातात. बेसिनचा पाइप थेट ड्रेनेजच्या मुख्य पायपाला जोडलेला असतो. तो ड्रेनेजला न जोडता हे पाणी बादलीत साठवून त्याचा वापर बागांसाठी करू शकता.कपडे धुणे झाल्यावर राहिलेल्या साबणाच्या पाण्याचा वापर टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी होऊ शकतो.पाणीबचत : घरासमोर सडा टाकणे पूर्णपणे थांबवावे.पाणी वाचविणे ही काळाची गरज आहे, हे जगजाहीर आहे. भविष्यात पाण्यावरून तिसरे महायुद्ध होण्याची भीती आहे. त्यामुळे आपण जितकी पाणीबचत करू, तितका पाण्याचा सन्मान होईल. आपण इतर देवांची मंदिरे उभारतो, आता जलदेवतेचे मंदिर उभे करण्याची गरज आहे. मी स्वत: घरी जलबचतीचा प्रयोग राबवीत असून, दिवसभरातील सर्व कामे एक बादली पाण्यातच करण्याचा निर्धार केला आहे. आठ दिवसांपासून मी हा शिरस्ता पाळतो आहे. - चिन्मय उदगीरकर, अभिनेते