शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
13
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
14
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
15
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
16
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
17
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
18
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
19
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
20
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बँकांना हवा सव्वा लाख कोटींचा आधार!

By admin | Updated: June 11, 2016 04:47 IST

सरकारी बँकांना पुन्हा सुदृढ करायचे असेल तर त्याकरिता किमान एक लाख २० हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे मत आंतराष्ट्रीय विश्लेषण संस्थांनी व्यक्त केले

मुंबई : साडेतीन लाख कोटी रुपयांच्या थकीत कर्जाच्या बोज्याखाली झुकलेल्या सरकारी बँकांना पुन्हा सुदृढ करायचे असेल तर त्याकरिता किमान एक लाख २० हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे मत आंतराष्ट्रीय विश्लेषण संस्थांनी व्यक्त केले आहे. हा निधी बँकांना मिळाला तर त्यांच्यावरी कर्जाचा ताण दूर होतानाच नव्या व्यवसायासाठी त्या सज्ज होऊ शकतील, असे या संस्थांनी म्हटले आहे.भारतातील सरकारी बँका आणि त्यांचे थकीत कर्ज या अनुषंगाने एक अभ्यास अहवाल तयार करण्यात आला असून या थकीत कर्जामुळे बँकांवर आलेला ताण आणि त्यांच्या व्यवसायावर झालेला परिणाम यावर विस्तृत भाष्य करण्यात आले आहे. तसेच, याकरिता नेमक्या कोणत्या उपायोजना कराव्या लागतील याचाही वेध यामध्ये घेण्यात आलेला आहे. देशात सरकारी बँकांची संख्या एकूण २६ आहे. यापैकी गेल्या महिन्याभरापासून ११ सरकारी बँकांचे वित्तीय निकाल प्रसिद्ध झाले असून हे निकाल पाहता चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सरकारी बँकांच्या एकत्रित तोट्याने १८ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. प्रथमच बँकांच्या ताळेबंदात यामुळे हजारो कोटी रुपयांच्या तोट्याची नोंद झाली आहे. बँकांच्या या ताळेबंदात प्रामुख्याने जाणविणारी गोष्ट म्हणजे, थकीत कर्जाच्या प्रमाणात सातत्यपूर्ण वाढ दिसत असून, या कर्जाच्या वसुलीसाठी आणि एकूणच या कर्ज प्रकरणासाठी जी तरतूद करण्यात आली आहे, याचा थेट परिणाम हा बँकेच्या नफ्यावर आणि त्याहीपेक्षा अधिक बँकांच्या आर्थिक कामगिरीवर झाला आहे. या तोट्यामागचे मुख्य कारण अर्थातच बँकांचे थकीत कर्ज हे आहे. त्यामुळे थकीत कर्ज कमी करण्यासोबत बँकांना आहे त्या स्थितीत पुढे जाण्यासाठी एका मोठ्या बूस्टर डोसची गरज असून हा डोस किमान एक लाख २० हजार कोटी रुपयांचा असावा, असे या अहवालात सुचित करण्यात आले आहे.दरम्यान, थकीत कर्जाची वसुली हा बँकांच्या दृष्टीने डोकेदुखीचा मुद्दा आहे. थकीत कर्जाचे गणित तपासल्यास बँकांनी प्रामुख्याने कर्ज ही पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी दिले आहे. यामध्ये रस्तेबांधणी, बंदर विकास, विमानतळ, उड्डाणपूल, महाकाय ऊर्जा प्रकल्प आदींना लाखो कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण केले आहे. परंतु, २००८पासून जागतिक मंदीमुळे पायाभूत सुविधा क्षेत्रातील अनेक प्रकल्प रखडले आहेत. परिणामी, कर्ज घेतलेल्या उद्योगांना कर्ज चुकविणे शक्य झाले नाही. कर्जाच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर बँकांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामध्ये कर्जदारास मुदत देणे, वन टाईम सेटलमेंटची योजना राबविणे, तेही ज्यांना शक्य नाही अशा कर्जदारांच्या मालमत्तांचा ताबा घेत त्यांचा लीलाव करणे, स्वेच्छेन कर्ज बुडविणाऱ्या कंपन्यांची यादी करून तशी घोषणा करतानाच आगामी काळातील आर्थिक व्यवहारासाठी त्या कंपन्यांची नाकाबंदी करणे, असे अनेक उपाय केले आहेत. मात्र तरीही बँकांना अपेक्षित यश आलेले नाही. (प्रतिनिधी)>सरकारचे पाठबळ अवघे ७० हजार कोटी रुपयांचेसरकारी बँकांवरील ताण लक्षात घेत आॅगस्ट २०१५ मध्ये केंद्रीय वित्त मंत्रालयाने आगामी चार वर्षांच्या कालावधीत सरकारी बँकांत ७० हजार कोटी रुपयांचे भांडवल ओतण्याची घोषणा केली. त्यानुसार, मार्च २०१६ पर्यंत सरकारी बँकांत २५ हजार कोटी रुपयांचे भांडवल ओतले असून, २०१७-१८ आणि २०१८-१९ या आर्थिक वर्षात प्रत्येकी दहा हजार कोटी रुपयांचे भांडवल ओतण्यात येणार आहे.परंतु, थकीत कर्जाचे प्रमाण आणि त्यामुळे बँकांवर आलेल्या ताणाचा विचार करता सरकारचे हे आर्थिक पाठबळ खूपच तोकडे ठरताना दिसत आहे.