शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

माहिती आयुक्त वाढले, पण काम घटले!

By admin | Updated: July 16, 2014 03:18 IST

केंद्रीय माहिती आयोगावर तीन वर्षांपूर्वीपर्यंत सहा माहिती आयुक्त होते तेव्हा जेवढी प्रकरणे निकाली निघत होती त्या तुलनेत आता आठ आयुक्त असूनही कमी प्रकरणांचा निपटारा होत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : केंद्रीय माहिती आयोगावर तीन वर्षांपूर्वीपर्यंत सहा माहिती आयुक्त होते तेव्हा जेवढी प्रकरणे निकाली निघत होती त्या तुलनेत आता आठ आयुक्त असूनही कमी प्रकरणांचा निपटारा होत असल्याची माहिती समोर आली आहे.केंद्रीय माहिती आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर दिलेली आकडेवारी पाहिल्यावर, माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांच्या, ही बाब लक्षात आली. त्यांनी मुख्य केंद्रीय माहिती आयुक्तांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधले. महिना उलटल्यावरही त्यांच्याकडूनकाहीच प्रतिसाद न मिळाल्याने गांधी यांनी ही माहिती आता जनतेला कळावी म्हणून जाहीर केली आहे.गांधी यांच्या म्हणण्यानुसार ते स्वत: केंद्रीय माहिती आयुक्त होते तेव्हा ते वर्षाला सरासरी ५,०० प्रकरणे निकाली काढत होते. महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या कामाचा उरकही जवळपास तेवढाच आहे.शैलेश गांधी म्हणतात की, ते पदावर होते तेव्हा प्रत्येक माहिती आयुक्त वर्षाला सरासरी ३,२०० प्रकरणे निकाली काढेल, असा ठराव केंद्रीय माहिती आयोेगाने केला होता व माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४(१)(बी) नुसार तो स्वत:हून वेबसाईटवर प्रसिद्धही केला होता. कालांतराने कामाचे हे प्रमाण वाढेल अशी अपेक्षा होती. पण आयोगाने आता प्रसिद्ध केलेली ताजी आकडेवारी पाहता असे दिसते की, आता आयोगावर सहाऐवजी आयुक्त असून त्यांनी गेल्या सहा महिन्यांत प्रत्येकी ७३० ते १,४४१ प्रकरणे निकाली काढली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यापैकी एकानेही सहा महिन्यात १६०० प्रकरणांचा पल्ला गाठलेला नसल्याने वर्षाला ३,२०० प्रकरणे निकाली काढण्याचे उद्दिष्ट यावर्षी गाठले जाणार नाही, हे उघड आहे.आयोगाच्या आकडेवारीनुसार गेल्या सहा महिन्यांत आठ माहिती आयुक्तांनी मिळून ८,४८५ प्रकरणे हातावेगळी केली आहेत. हाच वेग कायम राहिला तर वर्षभरात सर्वांकडून मिळून १६,९७० प्करणे निकाली निघू शकतील. म्हणजेच प्रत्येक माहिती आयुक्ताचा सरासरी निपटारा २,१२१ प्रकरणांचा असेल. आयोगापुढे सध्या २४,८३४ प्रकरणे प्रलंबित आहेत. या वेगाने ती निकाली निघायला १८ महिने लागतील.वर्ष २०११ मध्ये केंद्रीय माहिती आयोगावर सहा आयुक्त होते तेव्हा सर्वांनी मिळून वर्षाला २२,५१३ म्हणजे प्रत्येक आयुक्तामागे सरासरी ३,७५२ प्रकरणांचा निपटारा केला होता. म्हणजेच आताचे आठ आयुक्त पूर्वीच्या सहा आयुक्तांहून कमी काम उरकत आहेत! (विशेष प्रतिनिधी)०