शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

महागाईने रोखली व्याजदर कपात!

By admin | Updated: June 8, 2016 03:57 IST

उद्योग वर्तुळाने वर्तविलेल्या भाकिताप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करता ते स्थिर ठेवले आहे

मुंबई : उद्योग वर्तुळाने वर्तविलेल्या भाकिताप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करता ते स्थिर ठेवले आहे. महागाई पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत असून वाढत्या महागाईनेच व्याजदर कपातीला ‘खो’ घातल्याचे रिझर्व्ह बँकेने मंगळवारी सादर केलेल्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणातून दिसून आले आहे. चालू आर्थिक वर्षाचे दुसरे द्वैमासिक पतधोरण मांडताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी कोणत्याही दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे रेपो, सीआरआर, एसएलआर या सारखे सर्व दर कायम राहिले आहेत. मात्र, एप्रिलपासून भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा महागाईच्या झळांनी ग्रासायला सुरुवात केली असल्याचे सांगत, आगामी काळात अन्नधान्य आणि किरकोळ बाजारातील महागाई डोके वर काढेल, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी भाववाढीचा इशाराच दिला आहे. तूर्तास शेतकऱ्यांइतकेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे लक्षही मान्सूच्या आगमनाकडे लागले असून पावसाच्या कामगिरीवर भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. एवढेच नव्हे, तर मान्सून उत्तम झाला तर त्याचा निश्चित फरक हा महागाई आटोक्यात आणण्यासाठी पडेल, असेही ते म्हणाले. आगामी काळातील दर कपातीसाठी मान्सून हा मुद्दा कळीचा ठरणार आहेच पण याचसोबत १४ आणि १५ जून रोजी अमेरिकी फेडरल बँकेच्या बैठकीकडेही इतर जगासोबत भारताचेही लक्ष लागलेले आहे. या बैठकीत अमेरिकेत व्याजदरात वाढ होते का, याचाही अनेक देशांच्या अर्थकारणावर प्रभाव पडणार आहे. (प्रतिनिधी)>आॅगस्ट महिन्यामध्ये दरकपातीची शक्यताचालू आर्थिक वर्षातील तिसरे द्वैमासिक धोरण ९ आॅगस्ट २०१६ रोजी मांडले जाईल. आॅगस्ट महिन्यापर्यंत साधारण मान्सूनच्या स्थितीचा अंदाज आलेला असेल. परिणामी, सध्या व्याजदर कपातीसाठी असलेला वाव आणि आॅगस्टपर्यंत बरसणारा मान्सून यामुळे ९ आॅगस्ट रोजी मांडण्यात येणाऱ्या पतधोरणाद्वारे दरकपात होईल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. >अर्थव्यवस्थेचा विकास ७.६% दरानेआंतरराष्ट्रीय अर्थकारणात जरी अस्थिरता असली तरी देशांतर्गत पातळीवर सुधार दिसत येत असून भारतीय कंपन्यांची कामगिरीही सुधारत आहे. किंबहुना, मंदीच्या प्रदीर्घ फेऱ्यानंतर गेल्या आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांना पुन्हा एकदा नफ्याची झुळूक अनुभवायला मिळाली आहे. मान्सूनवर देशाची आगामी दिशा निश्चितच अवलंबून आहे. पण अर्थव्यवस्थेतील घडामोडींचा सर्वंकष विचार करचा चालू आर्थिक वर्षात विकास दर 7.6%असेल, असे मत रिझर्व्ह बँकेने व्यक्त केले आहे. विकासदराचे लक्ष्य गाठणे आणि महागाई आटोक्यात ठेवण्याच्या प्रयत्नांना प्राधान्य देणे, या सरकारी भूमिकेशी सुसंगत असेच पतधोरण रिझर्व्ह बँकेने मांडले आहे.- शक्तीकांता दास, वित्तीय व्यवहार सचिवदुसऱ्या टर्मबद्दल राजन म्हणतात...भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या गव्हर्नरपदाची मुदत सप्टेंबर २०१६ मध्ये संपत आहे. त्यांना मुदतवाढ देण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वादंग निर्माण झाला आहे. याबाबत राजन यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, या मुद्यावर मला भाष्य करून मीडियाच्या सध्या सुरू असलेल्या रंजनात खोडा घालायचा नाही. असे निर्णय हे केंद्र सरकार आणि संबंधित व्यक्ती यांच्यातील चर्चेअंती होतात.>कच्च्या तेलाच्या किमतीत घट गेल्या १४ महिन्यांत प्रथमच एक महिन्याच्या फरकात महागाईच्या निर्देशांकात इतकी वाढ नोंदली गेली आहे. याचा थेट संबंध हा आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीशी निगडीत आहे. याचे कारण म्हणजे गेल्या पावणेदोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने घट झाली होती. परंतु फेब्रुवारी २०१६ पासून पुन्हा तेलाच्या किमती वाढताना दिसत आहेत. याचा परिणाम देशात महागाईने पुन्हा डोके वर काढण्याच्या रूपाने दिसून येत आहे. त्यामुळे तूर्तास महागाई आटोक्यास रिझर्व्ह बँकेने प्राधान्य दिले आहे. >आतापर्यंत पावणे दोन टक्के व्याजदर कपाततारीख दर कपात १५ जाने.२०१५पाव टक्का३ फेब्रु. २०१५बदल नाही७ एप्रिल २०१५पाव टक्का२ जून २०१५पाव टक्का४ आॅगस्ट २०१५बदल नाहीतारीख दर कपात २९ सप्टेंबर २०१५अर्धा टक्का१ डिसेंबर २०१५ बदल नाही२ फेब्रु. २०१६बदल नाही५ एप्रिल २०१६अर्धा टक्का६ जून २०१६बदल नाही