शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
3
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
4
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
5
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
6
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
7
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
8
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
9
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
10
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
11
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
12
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
13
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
14
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
15
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
16
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
17
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
18
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
19
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
20
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

महागाईने रोखली व्याजदर कपात!

By admin | Updated: June 8, 2016 03:57 IST

उद्योग वर्तुळाने वर्तविलेल्या भाकिताप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करता ते स्थिर ठेवले आहे

मुंबई : उद्योग वर्तुळाने वर्तविलेल्या भाकिताप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करता ते स्थिर ठेवले आहे. महागाई पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत असून वाढत्या महागाईनेच व्याजदर कपातीला ‘खो’ घातल्याचे रिझर्व्ह बँकेने मंगळवारी सादर केलेल्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणातून दिसून आले आहे. चालू आर्थिक वर्षाचे दुसरे द्वैमासिक पतधोरण मांडताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी कोणत्याही दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे रेपो, सीआरआर, एसएलआर या सारखे सर्व दर कायम राहिले आहेत. मात्र, एप्रिलपासून भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा महागाईच्या झळांनी ग्रासायला सुरुवात केली असल्याचे सांगत, आगामी काळात अन्नधान्य आणि किरकोळ बाजारातील महागाई डोके वर काढेल, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी भाववाढीचा इशाराच दिला आहे. तूर्तास शेतकऱ्यांइतकेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे लक्षही मान्सूच्या आगमनाकडे लागले असून पावसाच्या कामगिरीवर भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. एवढेच नव्हे, तर मान्सून उत्तम झाला तर त्याचा निश्चित फरक हा महागाई आटोक्यात आणण्यासाठी पडेल, असेही ते म्हणाले. आगामी काळातील दर कपातीसाठी मान्सून हा मुद्दा कळीचा ठरणार आहेच पण याचसोबत १४ आणि १५ जून रोजी अमेरिकी फेडरल बँकेच्या बैठकीकडेही इतर जगासोबत भारताचेही लक्ष लागलेले आहे. या बैठकीत अमेरिकेत व्याजदरात वाढ होते का, याचाही अनेक देशांच्या अर्थकारणावर प्रभाव पडणार आहे. (प्रतिनिधी)>आॅगस्ट महिन्यामध्ये दरकपातीची शक्यताचालू आर्थिक वर्षातील तिसरे द्वैमासिक धोरण ९ आॅगस्ट २०१६ रोजी मांडले जाईल. आॅगस्ट महिन्यापर्यंत साधारण मान्सूनच्या स्थितीचा अंदाज आलेला असेल. परिणामी, सध्या व्याजदर कपातीसाठी असलेला वाव आणि आॅगस्टपर्यंत बरसणारा मान्सून यामुळे ९ आॅगस्ट रोजी मांडण्यात येणाऱ्या पतधोरणाद्वारे दरकपात होईल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. >अर्थव्यवस्थेचा विकास ७.६% दरानेआंतरराष्ट्रीय अर्थकारणात जरी अस्थिरता असली तरी देशांतर्गत पातळीवर सुधार दिसत येत असून भारतीय कंपन्यांची कामगिरीही सुधारत आहे. किंबहुना, मंदीच्या प्रदीर्घ फेऱ्यानंतर गेल्या आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांना पुन्हा एकदा नफ्याची झुळूक अनुभवायला मिळाली आहे. मान्सूनवर देशाची आगामी दिशा निश्चितच अवलंबून आहे. पण अर्थव्यवस्थेतील घडामोडींचा सर्वंकष विचार करचा चालू आर्थिक वर्षात विकास दर 7.6%असेल, असे मत रिझर्व्ह बँकेने व्यक्त केले आहे. विकासदराचे लक्ष्य गाठणे आणि महागाई आटोक्यात ठेवण्याच्या प्रयत्नांना प्राधान्य देणे, या सरकारी भूमिकेशी सुसंगत असेच पतधोरण रिझर्व्ह बँकेने मांडले आहे.- शक्तीकांता दास, वित्तीय व्यवहार सचिवदुसऱ्या टर्मबद्दल राजन म्हणतात...भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या गव्हर्नरपदाची मुदत सप्टेंबर २०१६ मध्ये संपत आहे. त्यांना मुदतवाढ देण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वादंग निर्माण झाला आहे. याबाबत राजन यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, या मुद्यावर मला भाष्य करून मीडियाच्या सध्या सुरू असलेल्या रंजनात खोडा घालायचा नाही. असे निर्णय हे केंद्र सरकार आणि संबंधित व्यक्ती यांच्यातील चर्चेअंती होतात.>कच्च्या तेलाच्या किमतीत घट गेल्या १४ महिन्यांत प्रथमच एक महिन्याच्या फरकात महागाईच्या निर्देशांकात इतकी वाढ नोंदली गेली आहे. याचा थेट संबंध हा आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीशी निगडीत आहे. याचे कारण म्हणजे गेल्या पावणेदोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने घट झाली होती. परंतु फेब्रुवारी २०१६ पासून पुन्हा तेलाच्या किमती वाढताना दिसत आहेत. याचा परिणाम देशात महागाईने पुन्हा डोके वर काढण्याच्या रूपाने दिसून येत आहे. त्यामुळे तूर्तास महागाई आटोक्यास रिझर्व्ह बँकेने प्राधान्य दिले आहे. >आतापर्यंत पावणे दोन टक्के व्याजदर कपाततारीख दर कपात १५ जाने.२०१५पाव टक्का३ फेब्रु. २०१५बदल नाही७ एप्रिल २०१५पाव टक्का२ जून २०१५पाव टक्का४ आॅगस्ट २०१५बदल नाहीतारीख दर कपात २९ सप्टेंबर २०१५अर्धा टक्का१ डिसेंबर २०१५ बदल नाही२ फेब्रु. २०१६बदल नाही५ एप्रिल २०१६अर्धा टक्का६ जून २०१६बदल नाही