शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

हो य हो य वा र क री । पा हे पा हे रे पं ढ री ।।

By admin | Updated: July 26, 2015 02:59 IST

ज्यापदार्थाची सत्ता कोणत्याही काळामध्ये बाधित होत नाही त्या सत्तेला पारमार्थिक सत्ता असे म्हणतात. असे पारमार्थिक सत्तावान जे ब्रह्मतत्त्व ते स्वगत, सजातीय, विजातीय भेदरहित

- ह.भ.प. अ‍ॅड. जयवंत महाराज बोधलेज्यापदार्थाची सत्ता कोणत्याही काळामध्ये बाधित होत नाही त्या सत्तेला पारमार्थिक सत्ता असे म्हणतात. असे पारमार्थिक सत्तावान जे ब्रह्मतत्त्व ते स्वगत, सजातीय, विजातीय भेदरहित असून सत्, चित्, आनंद, नित्य, पूर्ण असे आहे. हेच ब्रह्मतत्त्व संपूर्ण चराचरामध्ये भरलेले आहे. श्रुतीमाता आपणास स्पष्ट सांगते की, ‘सर्व खल्विदं ब्रह्म।’ असे हे व्यापक ब्रह्मतत्त्व तेच ‘मी’ आहे, असा अनुभव येणे म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त होणे होय. असा ब्रह्मज्ञानाचा अनुभव अंतरी आला असता त्याची चिन्हे देहावर उमटतात. तुकाराम महाराज सांगतात.. उमटती ठसे। ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे।।ब्रह्मप्राप्तीची ही चिन्हे (ठसे) पाच आहेत. अभिन्नता, अभयरूपता, आनंदरूपता, अनन्यता, अजन्मस्थिती ही पाच चिन्हे आहेत. ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला महात्मा सर्वसामान्यांप्रमाणे जरी दिसत असला तरी देहसंबंध पसाऱ्याचा व त्याचा काहीही संबंध उरलेला नसतो. काही कर्तव्य नाही, काही प्राप्तव्य नाही अशीच अवस्था झालेली असते. पंचदशीकार विद्यारण्यस्वामी सांगतात, धन्योऽहं धन्योऽहं कर्तव्य मे न विद्यते किंचित्। धन्योऽहं धन्योऽहं प्राप्तव्यं सर्वमद्य संपन्नम्।।पंचदशीकारांनी या अवस्थेलाच खऱ्या अर्थाची धन्यता सांगितलेली आहे. प्रापंचिक जीवनामध्ये सत्ता, संपत्ती, संतती प्राप्तीमध्ये धन्यता सांगितली जाते. परंतु पारमार्थिक जीवनामध्ये संतभेट व भगवद् प्राप्ती हीच खरी धन्यता आहे. या धन्यतेमध्ये काहीही प्रापंचिक कर्तव्य किंवा प्राप्तव्य राहिलेले नसते. ज्या ज्या इच्छा केल्या त्या त्या पूर्ण झालेल्या असतात. तुकाराम महाराज सांगतात, कृतकृत्य झालो। इच्छा केली ती पावलो।।अशी ही परिपूर्णतेची अवस्था प्राप्त होणे व पुन्हा भगवंताच्या सगुण रूपांविषयी प्रेम निर्माण होऊन त्याच्या भजनात तल्लीन राहणे हे वारकरी संप्रदायाचे मूळ सूत्र आहे. याकरिता ‘ज्ञान गिळोनि गावा गोविंदु गा।’ हे वचन प्रसिद्ध आहे. याकरिता आवश्यकता आहे ती भक्तीची। ज्ञानीयांचे राजे संत ज्ञानेश्वर महाराजसुद्धा म्हणतात,माझे मनीची आवडी।पंढरपुरा नेईन गुडी।।याकरिता लागणारी जी भक्ती आहे ती कोणती? काय तिची व्याख्या? देवऋर्षी नारदमुनी भक्तिसूत्रात सांगतात,।।सा त्वस्मिन्परमप्रेमरूपा।।भगवंतावर परमप्रेम असणे म्हणजेच भक्ती होय. प्रेमामध्ये वात्सल्यप्रेम, सख्य प्रेम, कामरूपी प्रेम आणि परमप्रेम असे प्रकार आहेत. यामध्ये परमप्रेम म्हणजे निष्काम प्रेम होय. या प्रेमालाच भक्ती म्हणतात.वारकरी संप्रदायामध्ये याच तत्त्वज्ञानाचा सर्व साधू-संतांनी विचार सांगितलेला आहे. संत तुकाराम महाराज सांगतात,‘‘मी भक्त तू देव ऐसे करी।’’या अवस्थेमध्ये भक्तीचा आनंद घेता येतो. घेतलेला आनंद इतरांना देता येतो. पंढरीच्या वारीमध्ये हेच चित्र आपणास सर्वत्र दिसून येते. इथे सर्व जण आपले मोठेपण विसरलेले असतात. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान व भक्ती या दोन तत्त्वांचा समन्वय पाहावयास मिळतो. शास्त्रीय दृष्टीने ‘ज्ञान’ हीच सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. परंतु वारकरी संप्रदायामध्ये या ज्ञान अवस्थेनंतरही भक्तीची अवस्था सांगितली आहे. यालाच वारकरी संप्रदायामध्ये ‘ज्ञानोत्तर भक्ती’ असे म्हणतात. हेच वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आहे. याच तत्त्वज्ञानात जगणारा हा पंढरीचा वारकरी आहे.