शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

माळीणची दुर्घटना पाहून सुन्न झालो

By admin | Updated: July 30, 2016 00:04 IST

सकाळी साडे नऊ वाजता माळीणमध्ये पोहोचलो. समोरचे दृश्य पाहून सुन्न झालो.

निलेश काण्णव/ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 29 - सकाळी साडे नऊ वाजता माळीणमध्ये पोहोचलो. समोरचे दृश्य पाहून सुन्न झालो. पूर्वी या गावामध्ये आलो होतो त्यामुळे समजले की डोंगर कोसळून गावच गडप झाले आहे. किमान दीडशे लोक मृत्यूमुखी पडलेले असणार. काही वाचले असतील तर त्यांना मदत मिळाली पाहिजे. गावात रेंज नव्हती. हे सगळ्यांना समजले पाहिजे म्हणून पळत सुटलो... पण एका वायरमनची गाडी मिळाली. चार किलोमीटरवर एका कड्यावर रेंज आहे माहित होते. त्यानंतर मदत सुरू झाली. माळीण दुर्घटनेला शनिवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. घटनास्थळी सर्वात पहिल्यांदा पोहोचलेले निलेश काण्णव यांना अजूनही ते दृश्य आठवले की अंगावर शहारे येतात. निलेश यांनी लोकमतला पाठविलेल्या फोटोने माळीण दुर्घटनेची माहिती जगापुढे आली. देशातील सर्व माध्यमांनी हा फोटो वापरला होता. निलेश सांगतात, त्या दिवशी धो धो पाउस पडत होता. एका पोलिसाचा फोन आला की माळीणमध्ये काही घडल्याचं समजलंय का? चौकशी करण्यासाठी चौकात गेलो. तर माळीणमध्ये काही तरी घडल्याचं समजलं. त्याचवेळी घोडेगावमधून तहसीलदार बी. जी. गोरे, गटविकास अधिकारी विवेक इलमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर हे माळीणकडे निघाले. लोकमतची चाकणला बैठक होती. त्यामुळे आॅफिसला विचारले की माळीणला दरड कोसळलीय, तिकडे जाऊ की बैठकीस येऊ. आॅफिसमधून सांगण्यात आले की तातडीने माळीणला जा. सुमारे एक तासात माळीणला पोहोचलो. बरोबरच्या कोणीच गाव कधी पाहिले नव्हते. मला मात्र माहीत होते की शाळेच्या शेजारीच गाव वसले आहे. शाळेची इमारत दिसत होाती. मात्र गाव डोंगराखाली गडप झाले होते. काय करावे सुचेनाच. शेकडो लोक गेली असल्याची कल्पना आली. मोबाईलमध्ये फोटो काढत होतो, पण हात थरथरत होता. गाव कुठे गेले, आता पुढे काय आणि कसे करायचे हा मोठा प्रश्न अधिका-यांसमोर होता. मोबाईलला रेंज नव्हती. मला माहीत होते की कोंढरे घाटातील एका कड्यावर मोबाईलवर रेंज येते. पळत सुटावेसे वाटले पण त्याच वेळी लाईट बंद करण्यासाठी आलेला वायरमन दिसला. त्याला विनंती करून गाडी घेतली. विनोद पवार हे पोलीस कर्मचारी माझ्याबरोबर आले. पाऊस कोसळतच होता. तरीही फोन करून तहसील कार्यालय, पोलिसांना कळविले. पण घटनेची भीषणता फोटोशिवाय कळणार नाही. मोबाईलला इंटरनेट कनेक्ट होईल, असे वाटत नव्हते. व्हॉट्सअ‍ॅप सुरू केले. स्पीड नसल्यामुळे अतिशय धिम्या गतीने चालत होते. त्याच वेळी अचानक पूर्वीचे प्रांत अधिकारी गजानन पाटील यांचा फोन आला. तू कुठे आहेस असे विचारले, माळीणमध्ये आहे असे सांगताच त्यांनी अजित पवार यांच्याकडे फोन दिला. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात त्यांच्या समोर बसलेल्या सर्वांना पुढे मोबाईलचा स्पिकर सुरू करून माझ्याकडून दुर्घटना समजून घेतली. त्यावेळी मी दुर्घटनेत जखमी कमी आहेत, मात्र मृतांची संख्या मोठी असून ढिगारा उपसण्यासाठी मशिनरी आणि माणसांची आवश्यकता असल्याचे त्यांना सांगितले होते. त्यांनीही रुग्णवाहिका पाठविल्या आहेत, डॉक्टरांची टीम येत आहे, मशिनरी पाठवित आहोत. मुख्यमंत्री व मी स्वत: दुपारी माळीणला येणार असल्याचे सांगितले. बातमीदार म्हणून माझे कर्तव्य मी बजावले होते. नंतर तातडीने पुन्हा घटनास्थळी पोहोचून मदतकार्यात झोकून दिले. ढिगा-याखाली गाडले गेलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात अनेक स्थानिक तरुण झटले होते. यामध्ये अडिवरे, डिंभा, शिनोली, घोडेगाव येथून आलेल्या तरुणांचा सहभाग होता. काही मृतदेह ढिगा-यात अर्ध्याअवस्थेत गाडलेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते. वाचलेल्या घरांमधून टिकाव, खोरी, पहारी अशी मिळेल ती हत्यारे घेऊन हे मृतदेह बाहेर काढण्यासाठी तरुण मदत करत होते. चिखलामुळे ढिगा-यात पाय गुडगाभर रूतत होते, सर्वत्र दलदल पसरली होती. त्यामुळे पायातील चप्पल खाली चिखलातच अडकुन पडायच्या म्हणून माझ्या सह अनेकांनी चपला फेकून दिल्या व अनवानी मदत कार्यात झोकून दिले. यामुळे अनेकांच्या पायांना मोठमोठ्या जखमा झाल्या.