शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

माळीणची दुर्घटना पाहून सुन्न झालो

By admin | Updated: July 30, 2016 00:04 IST

सकाळी साडे नऊ वाजता माळीणमध्ये पोहोचलो. समोरचे दृश्य पाहून सुन्न झालो.

निलेश काण्णव/ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 29 - सकाळी साडे नऊ वाजता माळीणमध्ये पोहोचलो. समोरचे दृश्य पाहून सुन्न झालो. पूर्वी या गावामध्ये आलो होतो त्यामुळे समजले की डोंगर कोसळून गावच गडप झाले आहे. किमान दीडशे लोक मृत्यूमुखी पडलेले असणार. काही वाचले असतील तर त्यांना मदत मिळाली पाहिजे. गावात रेंज नव्हती. हे सगळ्यांना समजले पाहिजे म्हणून पळत सुटलो... पण एका वायरमनची गाडी मिळाली. चार किलोमीटरवर एका कड्यावर रेंज आहे माहित होते. त्यानंतर मदत सुरू झाली. माळीण दुर्घटनेला शनिवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. घटनास्थळी सर्वात पहिल्यांदा पोहोचलेले निलेश काण्णव यांना अजूनही ते दृश्य आठवले की अंगावर शहारे येतात. निलेश यांनी लोकमतला पाठविलेल्या फोटोने माळीण दुर्घटनेची माहिती जगापुढे आली. देशातील सर्व माध्यमांनी हा फोटो वापरला होता. निलेश सांगतात, त्या दिवशी धो धो पाउस पडत होता. एका पोलिसाचा फोन आला की माळीणमध्ये काही घडल्याचं समजलंय का? चौकशी करण्यासाठी चौकात गेलो. तर माळीणमध्ये काही तरी घडल्याचं समजलं. त्याचवेळी घोडेगावमधून तहसीलदार बी. जी. गोरे, गटविकास अधिकारी विवेक इलमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर हे माळीणकडे निघाले. लोकमतची चाकणला बैठक होती. त्यामुळे आॅफिसला विचारले की माळीणला दरड कोसळलीय, तिकडे जाऊ की बैठकीस येऊ. आॅफिसमधून सांगण्यात आले की तातडीने माळीणला जा. सुमारे एक तासात माळीणला पोहोचलो. बरोबरच्या कोणीच गाव कधी पाहिले नव्हते. मला मात्र माहीत होते की शाळेच्या शेजारीच गाव वसले आहे. शाळेची इमारत दिसत होाती. मात्र गाव डोंगराखाली गडप झाले होते. काय करावे सुचेनाच. शेकडो लोक गेली असल्याची कल्पना आली. मोबाईलमध्ये फोटो काढत होतो, पण हात थरथरत होता. गाव कुठे गेले, आता पुढे काय आणि कसे करायचे हा मोठा प्रश्न अधिका-यांसमोर होता. मोबाईलला रेंज नव्हती. मला माहीत होते की कोंढरे घाटातील एका कड्यावर मोबाईलवर रेंज येते. पळत सुटावेसे वाटले पण त्याच वेळी लाईट बंद करण्यासाठी आलेला वायरमन दिसला. त्याला विनंती करून गाडी घेतली. विनोद पवार हे पोलीस कर्मचारी माझ्याबरोबर आले. पाऊस कोसळतच होता. तरीही फोन करून तहसील कार्यालय, पोलिसांना कळविले. पण घटनेची भीषणता फोटोशिवाय कळणार नाही. मोबाईलला इंटरनेट कनेक्ट होईल, असे वाटत नव्हते. व्हॉट्सअ‍ॅप सुरू केले. स्पीड नसल्यामुळे अतिशय धिम्या गतीने चालत होते. त्याच वेळी अचानक पूर्वीचे प्रांत अधिकारी गजानन पाटील यांचा फोन आला. तू कुठे आहेस असे विचारले, माळीणमध्ये आहे असे सांगताच त्यांनी अजित पवार यांच्याकडे फोन दिला. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात त्यांच्या समोर बसलेल्या सर्वांना पुढे मोबाईलचा स्पिकर सुरू करून माझ्याकडून दुर्घटना समजून घेतली. त्यावेळी मी दुर्घटनेत जखमी कमी आहेत, मात्र मृतांची संख्या मोठी असून ढिगारा उपसण्यासाठी मशिनरी आणि माणसांची आवश्यकता असल्याचे त्यांना सांगितले होते. त्यांनीही रुग्णवाहिका पाठविल्या आहेत, डॉक्टरांची टीम येत आहे, मशिनरी पाठवित आहोत. मुख्यमंत्री व मी स्वत: दुपारी माळीणला येणार असल्याचे सांगितले. बातमीदार म्हणून माझे कर्तव्य मी बजावले होते. नंतर तातडीने पुन्हा घटनास्थळी पोहोचून मदतकार्यात झोकून दिले. ढिगा-याखाली गाडले गेलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात अनेक स्थानिक तरुण झटले होते. यामध्ये अडिवरे, डिंभा, शिनोली, घोडेगाव येथून आलेल्या तरुणांचा सहभाग होता. काही मृतदेह ढिगा-यात अर्ध्याअवस्थेत गाडलेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते. वाचलेल्या घरांमधून टिकाव, खोरी, पहारी अशी मिळेल ती हत्यारे घेऊन हे मृतदेह बाहेर काढण्यासाठी तरुण मदत करत होते. चिखलामुळे ढिगा-यात पाय गुडगाभर रूतत होते, सर्वत्र दलदल पसरली होती. त्यामुळे पायातील चप्पल खाली चिखलातच अडकुन पडायच्या म्हणून माझ्या सह अनेकांनी चपला फेकून दिल्या व अनवानी मदत कार्यात झोकून दिले. यामुळे अनेकांच्या पायांना मोठमोठ्या जखमा झाल्या.