शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

मराठी मायबोली असणारेच झाले नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 01:42 IST

नवीन रिक्षाचालकांना परवाने देताना मराठी बोलता, लिहिता व वाचता येणे अनिवार्य केले असले तरी कल्याणमधील अनेक मराठी मुलांना मराठीचा गंध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

मुरलीधर भवार,  कल्याणपरिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नवीन रिक्षाचालकांना परवाने देताना मराठी बोलता, लिहिता व वाचता येणे अनिवार्य केले असले तरी कल्याणमधील अनेक मराठी मुलांना मराठीचा गंध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.केवळ मराठी बाण्याची गीते गाऊन, मराठीच्या अभिमानापोटी खळ्ळ खट्याक करण्याच्या वल्गना करून मराठी भाषेचा विकास व वापर होत नाही. त्याकरिता, महापालिका शाळांपासून खासगी शाळांपर्यंत उत्तम मराठी शिकवले जाईल, याची काळजी घेणे गरजेचे असते. हे अंजन शिवसेना, मनसे या पक्षांच्या डोळ्यांत या अनुभवाने घातले गेले असेल, असे मत व्यक्त होत आहे.कल्याण उपप्रादेशिक कार्यालयात गेल्या तीन दिवसांपासून रिक्षाचालकांच्या मुलाखती सुरू आहेत. आणखीन दोन दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. आतापर्यंत ३ हजार ७२५ पैकी १ हजार ८७३ जणांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. त्यामध्ये बहुतांशी मराठी भाषिक असूनही त्यांना मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे उघड झाले. रिक्षाचालकांची १२ कर्तव्ये मराठीत सांगताना अनेकांची त...त...प...प.. झाली. शहरातील ठळक ठिकाणे व खाणाखुणा, व्यक्ती यांच्याबाबत अनेक मुलांना माहिती नव्हती. अनेक मराठी मुलांना मराठी बोलता आले नाही. काहींनी उत्तरे दिली नाहीत. मराठी न येणाऱ्यांना परवाने द्यायचे किंवा कसे, याचा निर्णय राज्य सरकारच्या हाती असेल. 10,000परवाने झाले होते रद्द कल्याण आरटीओ क्षेत्रात 27,000रिक्षाचालक असून त्यापैकी 10,000परवाने रद्द करण्यात आले होते. त्यानंतर, तीन टप्प्यांत पुन्हा परवाने देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून 3,725परवाने लॉटरी पद्धतीने रिक्षाचालकांना मिळाले. परवान्याची लॉटरी लागल्यावर तीन दिवसांपासून केणी गार्डन हॉलमध्ये मुलाखतीचा कार्यक्रम सुरू आहे. > यावेळी महिलांची नावे लॉटरी लागणाऱ्यांत आल्याने त्याही मुलाखतीला आल्या होत्या. 22 महिलांना रिक्षाचालकाचे परवाने मंजूर झाले. मात्र, त्या स्वत: रिक्षा चालवणार किंवा कसे, याविषयी ठाम नसल्याचे जाणवले. त्या त्यांच्या नवऱ्याला किंवा नातेवाइकांना रिक्षा चालवण्यास देणार आहेत. मात्र, महिलांचा रिक्षा परवाना महिलांनीच वापरायचा, अशी सरकारची सक्ती आहे.१ कोटी ७८ लाख झाले जमागेल्या तीन दिवसांत ३ हजार ७२५ जणांपैकी १ हजार ८७३ जणांची तोंडी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी १ हजार ३६७ जण उत्तीर्ण झाले. एक हजार ११४ जणांनी परवान्याचे शुल्क भरले. त्यातून सरकारच्या तिजोरीत एक कोटी ७८ लाख २४ हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यापैकी १०१ जणांना परमिटचे वाटप करण्यात आले आहे.