शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
2
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
3
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं करण कळताच पती हादरला!
4
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
5
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
6
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
7
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
8
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
9
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
10
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
11
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
12
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
13
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
14
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
15
Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
16
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
17
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
18
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
19
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
20
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

मराठी मायबोली असणारेच झाले नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 01:42 IST

नवीन रिक्षाचालकांना परवाने देताना मराठी बोलता, लिहिता व वाचता येणे अनिवार्य केले असले तरी कल्याणमधील अनेक मराठी मुलांना मराठीचा गंध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

मुरलीधर भवार,  कल्याणपरिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नवीन रिक्षाचालकांना परवाने देताना मराठी बोलता, लिहिता व वाचता येणे अनिवार्य केले असले तरी कल्याणमधील अनेक मराठी मुलांना मराठीचा गंध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.केवळ मराठी बाण्याची गीते गाऊन, मराठीच्या अभिमानापोटी खळ्ळ खट्याक करण्याच्या वल्गना करून मराठी भाषेचा विकास व वापर होत नाही. त्याकरिता, महापालिका शाळांपासून खासगी शाळांपर्यंत उत्तम मराठी शिकवले जाईल, याची काळजी घेणे गरजेचे असते. हे अंजन शिवसेना, मनसे या पक्षांच्या डोळ्यांत या अनुभवाने घातले गेले असेल, असे मत व्यक्त होत आहे.कल्याण उपप्रादेशिक कार्यालयात गेल्या तीन दिवसांपासून रिक्षाचालकांच्या मुलाखती सुरू आहेत. आणखीन दोन दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. आतापर्यंत ३ हजार ७२५ पैकी १ हजार ८७३ जणांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. त्यामध्ये बहुतांशी मराठी भाषिक असूनही त्यांना मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे उघड झाले. रिक्षाचालकांची १२ कर्तव्ये मराठीत सांगताना अनेकांची त...त...प...प.. झाली. शहरातील ठळक ठिकाणे व खाणाखुणा, व्यक्ती यांच्याबाबत अनेक मुलांना माहिती नव्हती. अनेक मराठी मुलांना मराठी बोलता आले नाही. काहींनी उत्तरे दिली नाहीत. मराठी न येणाऱ्यांना परवाने द्यायचे किंवा कसे, याचा निर्णय राज्य सरकारच्या हाती असेल. 10,000परवाने झाले होते रद्द कल्याण आरटीओ क्षेत्रात 27,000रिक्षाचालक असून त्यापैकी 10,000परवाने रद्द करण्यात आले होते. त्यानंतर, तीन टप्प्यांत पुन्हा परवाने देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून 3,725परवाने लॉटरी पद्धतीने रिक्षाचालकांना मिळाले. परवान्याची लॉटरी लागल्यावर तीन दिवसांपासून केणी गार्डन हॉलमध्ये मुलाखतीचा कार्यक्रम सुरू आहे. > यावेळी महिलांची नावे लॉटरी लागणाऱ्यांत आल्याने त्याही मुलाखतीला आल्या होत्या. 22 महिलांना रिक्षाचालकाचे परवाने मंजूर झाले. मात्र, त्या स्वत: रिक्षा चालवणार किंवा कसे, याविषयी ठाम नसल्याचे जाणवले. त्या त्यांच्या नवऱ्याला किंवा नातेवाइकांना रिक्षा चालवण्यास देणार आहेत. मात्र, महिलांचा रिक्षा परवाना महिलांनीच वापरायचा, अशी सरकारची सक्ती आहे.१ कोटी ७८ लाख झाले जमागेल्या तीन दिवसांत ३ हजार ७२५ जणांपैकी १ हजार ८७३ जणांची तोंडी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी १ हजार ३६७ जण उत्तीर्ण झाले. एक हजार ११४ जणांनी परवान्याचे शुल्क भरले. त्यातून सरकारच्या तिजोरीत एक कोटी ७८ लाख २४ हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यापैकी १०१ जणांना परमिटचे वाटप करण्यात आले आहे.