शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

मराठी मायबोली असणारेच झाले नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 01:42 IST

नवीन रिक्षाचालकांना परवाने देताना मराठी बोलता, लिहिता व वाचता येणे अनिवार्य केले असले तरी कल्याणमधील अनेक मराठी मुलांना मराठीचा गंध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

मुरलीधर भवार,  कल्याणपरिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नवीन रिक्षाचालकांना परवाने देताना मराठी बोलता, लिहिता व वाचता येणे अनिवार्य केले असले तरी कल्याणमधील अनेक मराठी मुलांना मराठीचा गंध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.केवळ मराठी बाण्याची गीते गाऊन, मराठीच्या अभिमानापोटी खळ्ळ खट्याक करण्याच्या वल्गना करून मराठी भाषेचा विकास व वापर होत नाही. त्याकरिता, महापालिका शाळांपासून खासगी शाळांपर्यंत उत्तम मराठी शिकवले जाईल, याची काळजी घेणे गरजेचे असते. हे अंजन शिवसेना, मनसे या पक्षांच्या डोळ्यांत या अनुभवाने घातले गेले असेल, असे मत व्यक्त होत आहे.कल्याण उपप्रादेशिक कार्यालयात गेल्या तीन दिवसांपासून रिक्षाचालकांच्या मुलाखती सुरू आहेत. आणखीन दोन दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. आतापर्यंत ३ हजार ७२५ पैकी १ हजार ८७३ जणांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. त्यामध्ये बहुतांशी मराठी भाषिक असूनही त्यांना मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे उघड झाले. रिक्षाचालकांची १२ कर्तव्ये मराठीत सांगताना अनेकांची त...त...प...प.. झाली. शहरातील ठळक ठिकाणे व खाणाखुणा, व्यक्ती यांच्याबाबत अनेक मुलांना माहिती नव्हती. अनेक मराठी मुलांना मराठी बोलता आले नाही. काहींनी उत्तरे दिली नाहीत. मराठी न येणाऱ्यांना परवाने द्यायचे किंवा कसे, याचा निर्णय राज्य सरकारच्या हाती असेल. 10,000परवाने झाले होते रद्द कल्याण आरटीओ क्षेत्रात 27,000रिक्षाचालक असून त्यापैकी 10,000परवाने रद्द करण्यात आले होते. त्यानंतर, तीन टप्प्यांत पुन्हा परवाने देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून 3,725परवाने लॉटरी पद्धतीने रिक्षाचालकांना मिळाले. परवान्याची लॉटरी लागल्यावर तीन दिवसांपासून केणी गार्डन हॉलमध्ये मुलाखतीचा कार्यक्रम सुरू आहे. > यावेळी महिलांची नावे लॉटरी लागणाऱ्यांत आल्याने त्याही मुलाखतीला आल्या होत्या. 22 महिलांना रिक्षाचालकाचे परवाने मंजूर झाले. मात्र, त्या स्वत: रिक्षा चालवणार किंवा कसे, याविषयी ठाम नसल्याचे जाणवले. त्या त्यांच्या नवऱ्याला किंवा नातेवाइकांना रिक्षा चालवण्यास देणार आहेत. मात्र, महिलांचा रिक्षा परवाना महिलांनीच वापरायचा, अशी सरकारची सक्ती आहे.१ कोटी ७८ लाख झाले जमागेल्या तीन दिवसांत ३ हजार ७२५ जणांपैकी १ हजार ८७३ जणांची तोंडी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी १ हजार ३६७ जण उत्तीर्ण झाले. एक हजार ११४ जणांनी परवान्याचे शुल्क भरले. त्यातून सरकारच्या तिजोरीत एक कोटी ७८ लाख २४ हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यापैकी १०१ जणांना परमिटचे वाटप करण्यात आले आहे.