शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

सिंचन क्षमता कशी वाढणार?

By admin | Updated: December 8, 2014 00:57 IST

जिल्ह्यातील सिंचन क्षमता व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, या हेतूने गतकाळात दोन हजारांवर तलाव व साठवणूक बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. परंतु या तलावात साचलेला गाळ आजवर काढलेला नाही.

तलावात गाळ साचला : जिल्ह्याला १५० कोटींची गरज गणेश हूड - नागपूरजिल्ह्यातील सिंचन क्षमता व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, या हेतूने गतकाळात दोन हजारांवर तलाव व साठवणूक बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. परंतु या तलावात साचलेला गाळ आजवर काढलेला नाही. गाळ काढण्याबाबतचे जाचक शासन निकष व निधीचा अभाव अशा परिस्थितीत सिंचन क्षमता कशी वाढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात १२३ लघु सिंचन तलाव, ५६ पाझर तलाव, ३९ गावतलाव, २१४ मालगुजारी तलाव, ८८७ साठवण बंधारे, ७२८ कोल्हापुरी बंधारे आहेत. तलाव व बंधाऱ्यांची संख्या विचारात घेता जिल्ह्यातील सिंचन वाढण्याची अपेक्षा होती. परंतु तलाव व बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. साठवण क्षमता कमी झाल्याने त्यांचा सिंचनासाठी उपयोग होत नाही. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी आहे. परंतु तलावातील गाळ काढण्यासाठी लागणारा निधी नाही. मनरेगाच्या माध्यमातून गाळ काढावा, असे राज्य सरकारचे निर्देश आहे. परंतु नागपूर जिल्ह्यात या योजनेवर मजूर मिळत नसल्याने सिंचन विभाग हतबल आहे. तलावातील गाळाचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशीच परिस्थिती विदर्भातील इतर जिल्ह्यातीलं असल्याने यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय होण्याची गरज आहे.प्रस्ताव प्रलंबित...तलाव व बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी १५० कोटींचा निधी द्यावा, असा प्रस्ताव जि.प.च्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीने वर्षभरापूर्वी राज्य सरकारकडे पाठविला होता. परंतु तो प्रलंबित आहे. जिल्हा नियोजन समितीकडूनही मागणीनुसार निधी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. मजूर मिळत नाहीमनरेगा योजनेवरील मजुरांच्या माध्यमातून तलावातील गाळ काढावा, असे सरकारचे धोरण आहे. परंतु नागपूर जिल्ह्यात या योजनेवर मजूर मिळत नाही; तसेच यासाठी वेगळा निधी नसल्याने गाळ काढताना अडचणी आहेत. यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय झाला तरच ते शक्य होईल, असे मत सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश गिरी यांनी व्यक्त केले.