शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

सिंचन क्षमता कशी वाढणार?

By admin | Updated: December 8, 2014 00:57 IST

जिल्ह्यातील सिंचन क्षमता व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, या हेतूने गतकाळात दोन हजारांवर तलाव व साठवणूक बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. परंतु या तलावात साचलेला गाळ आजवर काढलेला नाही.

तलावात गाळ साचला : जिल्ह्याला १५० कोटींची गरज गणेश हूड - नागपूरजिल्ह्यातील सिंचन क्षमता व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, या हेतूने गतकाळात दोन हजारांवर तलाव व साठवणूक बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. परंतु या तलावात साचलेला गाळ आजवर काढलेला नाही. गाळ काढण्याबाबतचे जाचक शासन निकष व निधीचा अभाव अशा परिस्थितीत सिंचन क्षमता कशी वाढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात १२३ लघु सिंचन तलाव, ५६ पाझर तलाव, ३९ गावतलाव, २१४ मालगुजारी तलाव, ८८७ साठवण बंधारे, ७२८ कोल्हापुरी बंधारे आहेत. तलाव व बंधाऱ्यांची संख्या विचारात घेता जिल्ह्यातील सिंचन वाढण्याची अपेक्षा होती. परंतु तलाव व बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. साठवण क्षमता कमी झाल्याने त्यांचा सिंचनासाठी उपयोग होत नाही. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी आहे. परंतु तलावातील गाळ काढण्यासाठी लागणारा निधी नाही. मनरेगाच्या माध्यमातून गाळ काढावा, असे राज्य सरकारचे निर्देश आहे. परंतु नागपूर जिल्ह्यात या योजनेवर मजूर मिळत नसल्याने सिंचन विभाग हतबल आहे. तलावातील गाळाचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशीच परिस्थिती विदर्भातील इतर जिल्ह्यातीलं असल्याने यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय होण्याची गरज आहे.प्रस्ताव प्रलंबित...तलाव व बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी १५० कोटींचा निधी द्यावा, असा प्रस्ताव जि.प.च्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीने वर्षभरापूर्वी राज्य सरकारकडे पाठविला होता. परंतु तो प्रलंबित आहे. जिल्हा नियोजन समितीकडूनही मागणीनुसार निधी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. मजूर मिळत नाहीमनरेगा योजनेवरील मजुरांच्या माध्यमातून तलावातील गाळ काढावा, असे सरकारचे धोरण आहे. परंतु नागपूर जिल्ह्यात या योजनेवर मजूर मिळत नाही; तसेच यासाठी वेगळा निधी नसल्याने गाळ काढताना अडचणी आहेत. यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय झाला तरच ते शक्य होईल, असे मत सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश गिरी यांनी व्यक्त केले.