शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

सारेच कसे शत्रू..?

By admin | Updated: June 18, 2016 01:11 IST

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेची ५० वर्षांपूर्वी स्थापना झाली. सहदेव नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत श्रीफळ वाढवले.

- संदीप प्रधानमराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेची ५० वर्षांपूर्वी स्थापना झाली. सहदेव नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत श्रीफळ वाढवले. स्थापनेच्या दिवशीच सदस्य नोंदणी १० हजारांच्यापेक्षा जास्त झाली. यावरून त्याकाळी मराठी माणसांवर नोकऱ्यांमध्ये होणाऱ्या अन्यायाची मनामनातील धग किती तीव्र होती, ते स्पष्ट दिसते. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री प्रबोधनकार ठाकरे हे हजर होते. देशात ४३ प्रमुख प्रादेशिक पक्ष असून दक्षिणेतील काही राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांचे स्थान नगण्य आहे. त्या तुलनेत शिवसेनेचा विचार केला तर राज्याची सत्ता काबीज करण्याकरिता शिवसेनेला स्थापनेनंतर २९ वर्षे वाट पहावी लागली. साडेचार वर्षे शिवसेना सत्तेत राहिली तेव्हा भाजपासोबत सत्ता वाटून घ्यावी लागली. त्यामुळे तसे पाहिले तर मराठी माणसांच्या जिव्हाळ््याच्या मुद्द्याला हात घालूनही शिवसेना द्रमुक, अण्णाद्रमुक या पक्षांसारखी दीर्घकाळ सत्तेवर राहिली नाही. ठाणे महापालिकेत स्थापनेनंतर एक वर्षात शिवसेनेची सत्ता आली. सध्या ज्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे तेथील सत्ता काबीज करण्याकरिताही शिवसेनेला १९८५ साल उजाडले. शिवसेनेच्या स्थापनेनंतर त्यावेळी मुंबईत ताकदवान असलेल्या कम्युनिस्टांबरोबर त्यांचा रक्तरंजीत संघर्ष झाला. कृष्णा देसाई यांच्या हत्येमुळे शिवसेना आणि राडेबाजी हे समीकरण तयार झाले व आजही ते रूढ आहे. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना कम्युनिस्टांचे वर्चस्व मोडून काढायचे असल्याने त्यांनी शिवसेनेला हाताशी धरल्यामुळे ‘वसंतसेना’, अशी शिवसेनेची हेटाळणी केली गेली. मुंबईतील गिरणगाव आणि तेथील कामगार हे सत्तर व ऐंशीच्या दशकातील या शहराचे वैभव आणि ताकद होती. राज्यकर्त्यांची आणि गिरणी मालकांची वक्रदृष्टी झाल्याने गिरण्यांच्या जमिनी निवासी व व्यापारी बांधकामाकरिता मोकळ््या करण्याचे षडयंत्र रचले गेले. त्यावेळी या कामगारांनी दत्ता सामंत यांचे नेतृत्व स्वीकारले आणि ठाकरे यांच्याकडे पाठ फिरवली. गिरणी कामगारांचा संप चिघळला. हजारो कामगार देशोधडीला लागले. या संपाने गँगवॉरपासून डान्सबारपर्यंत अनेक अनिष्ट बाबी जन्माला घातल्या. ज्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा लढा देण्याकरिता शिवसेना स्थापन झाली तो मराठी माणूस झपाट्याने उपनगराकडे फेकला गेला. मुंबईत जसे झपाट्याने बदल झाले तसे ते शिवसेनेतही झाले. वडापाव खाऊन पक्षाकरिता रक्त आटवणारा शिवसैनिक हळूहळू बाजूला फेकला गेला आणि बांधकाम व्यवसायापासून केबल व्यवसायापर्यंत अनेक धंद्यात मनगटशाहीच्या जोरावर पाय रोवलेल्या शिवसैनिकांचा पक्षात दबदबा वाढला. याच बदलांच्या ओघात मनाजोगी पदे न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या विरोधात बंड केले तर मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने नारायण राणे यांनी उद्धव यांच्या विरोधात दंड थोपटले. अर्थात या दोघांनाही मर्यादीत राजकीय यश लाभले. मात्र ज्या शिवसेनेत एकेकाळी ‘बंड’करण्याला मृत्यूदंडाची शिक्षा होती त्या शिवसेनेत सध्या बंडोबांचे हारतुरे देऊन लाड सुरु झाले. महाबळेश्वरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांचा उदय झाल्याने त्यापूर्वीपासून शिवसेनेत असलेले राज ठाकरे हे नाराज झाले. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यावर तर तेथील असंतुष्टांना शिवसेनेत लाल पायघड्या अंथरल्या जाऊ लागल्या. बाळासाहेब हे काळाचा अचूक वेध घेणारे नेते होते. त्यामुळे शहाबानो प्रकरण व राम मंदिर आंदोलनाचे ढग राजकीय अवकाशात जमू लागताच त्यांनी हिंदुत्वाची गर्जना केली. ही दूरदृष्टी सध्याच्या नेतृत्वाकडे दिसत नाही.