शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

गरम चाय की प्याली हो!

By admin | Updated: February 5, 2017 01:13 IST

सकाळी उठल्या उठल्या आपल्याला दूध, चहा, कॉफी पिण्याची सवय असते. अनेक जण तर चहाच पितात. लोकांच्या चहाची आवड आणि आरोग्याचा विचार करून आता

- भक्ती सोमण सकाळी उठल्या उठल्या आपल्याला दूध, चहा, कॉफी पिण्याची सवय असते. अनेक जण तर चहाच पितात. लोकांच्या चहाची आवड आणि आरोग्याचा विचार करून आता वेगवेगळ्या चवीचे चहा मिळायला लागले आहेत. सकाळ कशी ताजीतवानी हवी. ब्रश करून झाल्यावर चहाचं आधण ठेवायचं. मग त्यात भरपूर किसलेलं आलं, साखर घालून उकळल्यावर चहा पावडर घालायची. छान उकळी आली की गॅस बंद करून थोड्या वेळाने तो चहा गाळायचा आणि कोऱ्या चहात आधीच तापलेलं दूध घालायचं. साखरेचा गोडवा, आल्याचा तिखटपणा आणि चहाची स्वत:ची चव याच्या मिश्रणाने तयार झालेला हा फक्कड चहा पिताना मजा येते. हा चहा पिऊन आपला दिनक्रम सुरू होतो. त्यानंतर मग दिवसभरात अनेकदा आपण वेगवेगळ्या ठिकाणी चहा पितो. प्रत्येक चहाचा रंग-ढंग वेगळाच असतो. टपरीवरच्या एक प्याली चायची मजा तर वेगळीच असते. तो चहा कसा करतात ते बघितलं की तो प्यावासाच वाटणार नाही. पण काचेच्या ग्लासातला त्या चहाचा घोट प्यायलावरच त्याची खरी मजा कळते. म्हणून तर सुटबुटवाल्यांनाही या चहाची भुरळ पडतेच पडते. असे हे चहापुराण कधीच न संपणारे आहे. असं म्हणतात की, २,७३७ वर्षांपूर्वी चीनचा सम्राट शैन नुंग यांनी उकळते पाणी गार करत ठेवले होते. तेव्हा काही पानं येऊन पडली. त्या पानांमुळे पाण्याला विशिष्ट असा रंग आला. अतिशय वेगळी असलेली ती चव सम्राटाला आवडली. तेव्हापासूनच चहाचा प्रसार सुरू झाला. सन ३५०ला चहा पिण्याचा पहिला उल्लेख तज्ज्ञांना सापडला. १६१०नंतर हळूहळू पाश्चात्त्य देशात चहाचा प्रसार व्हायला लागला. परदेशात तर चहा चांगलाच रूळला आहे. मात्र, भारताचा विचार करायचा झाल्यास, आसामच्या खास पत्तीयोसे बनलेल्या या चहाचा भारतात शोध लागला तो सन १८१५ला. आसाममधले स्थानिक कबाईली लोक चहाची पाने उकळून पितात हे इग्रजांच्या लक्षात आले. मध्ये बराच काळ गेला. त्यानंतर भारताचे गर्व्हनर जनरल लॉर्ड बॅटिक यांनी १८३४ साली भारतात चहाचे उत्पादन कसे करता येईल याबाबत एक समिती स्थापन केली. १८३५ साली आसाममध्ये चहाचे मळे सुरू झाले. त्यानंतर ब्रिटिशांनीच भारतीयांना चहा पिण्याची सवय लावली. अशा प्रकारे एवढ्या वर्षांच्या टप्प्यांत चहाने वेगवेगळ्या चवीत, ढंगात अनेकांना तृप्त केले. कित्येक लोक तर खूप आवडीने कमी दूध घालून चहा पिणे पसंत करतात. तर काही जण कोरा चहा पितात. कोऱ्या चहात पोषणतत्त्व अधिक प्रमाणात असतात. दूध घातल्याने ती तत्त्व कमी होतात. त्यामुळे कोरा चहा आवर्जून प्यावाच, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. याशिवाय सध्या ग्रीन टी प्रचंड लोकप्रिय असून, तो रोज पिणारेही कितीतरी लोक आहेत.जसजसा काळ बदलला तसतशा करण्याच्या पद्धतीही बदलत गेल्या आहेत. यात कमी जागेत विविध प्रकारचे चहा देत गल्लीवरच्या चहाच्या टपऱ्यांनी मोठ्या हॉटेल्सच्या तुलनेत आपलं अस्तित्व जपलं आहे यात शंकाच नाही. मुंबई उपनगरात तर लाखभर तरी अशा टपऱ्या असतीलच. लोकांना आवडत असलेला बदल जाणून घेत चहाचे वेगवेगळे फ्लेवर्स देणारी अनेक हॉटेल्स सुरू झाली आहेत. तेथे मसाला चायपासून हनी लेमन टी, आइस टी, हर्बल टी, ब्लॅक टी, पीच, मिंट, चॉकलेट असे गरम व गार असंख्य प्रकार आता मिळायला लागले आहेत. एकंदर काय तर, सकाळपासून संपूर्ण दिवस ताजा आणि समरसून जगायचा असेल तर चहावाचून पर्याय नाहीच! बरोबर ना!पद्घत बदलतेयचहा पिण्याच्या पद्धतीतही आता खूप बदल झाले आहेत. अगदी आत्ताआत्तापर्यंत आपण चहा पिताना बशीचा वापर करायचो. बशीतनं सुर्रर्र करीत चहा पिण्याची गंमत काही औरच असायची. पण लोकांच्या सवयी बदलल्याने बशी मिळणे आता दुरपास्तच झाले आहे. त्याऐवजी चहा पिण्यासाठी मग्ज, छोटे कप मिळतात. मातीच्या कपात, काचेच्या ग्लासात (टपरीवर मिळणारे ग्लास) चहा पिण्याचं प्रमाण वाढतं आहे. चवीबरोबरच चहा देण्याच्या पद्घती कशा वेगळ्या आहेत याकडेही आता लोकांचे चांगले लक्ष असते. या बदलाकडे आता चहा वळत आहे.