शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

वडिलांना फोनवर ‘बाय बाय’ म्हणत त्याने घेतली आयुष्यातून ‘एक्झिट’

By admin | Updated: July 27, 2016 00:53 IST

औरंगाबाद : मुलगा बऱ्याच वेळाने घरी आला नाही म्हणून चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी फोन केला अन् अरे जेवायला ये ना, असे म्हटले.

औरंगाबाद : मुलगा बऱ्याच वेळाने घरी आला नाही म्हणून चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी फोन केला अन् अरे जेवायला ये ना, असे म्हटले. त्यावर मुलाने आता मी येणार नाही... बाय बाय... असे म्हणत स्वत:ला धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी संग्रामनगर परिसरातील रेल्वे रुळावर घडली.फिरोज अमीर मुल्ला (३०, रा. नेहरूनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. फिरोज हा आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन मुलींसोबत नेहरूनगरात राहत होता. तो इलेक्ट्रिशियन होता. घरातच छोटे इलेक्ट्रिक सामान विक्री व दुरुस्तीचे त्याचे दुकान होते. काही तरी कारणावरून रागाच्या भरात मंगळवारी त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. आत्महत्येसाठी दुपारी तो घरातून बाहेर पडला. फिरत फिरत तो अखेर संग्रामनगरातील रेल्वेरुळावर पोहोचला. त्याचवेळी त्याच्या वडिलांचा फोन आला. वडिलांना आत्महत्या करत असल्याचे सांगतच त्याने रेल्वेसमोर उडी मारली. हादरलेल्या वडिलांनी जवाहरनगर ठाण्यातील आपल्या पोलीस मित्राला फिरोजच्या आलेल्या फोनविषयी सांगितले असता त्याला शोधण्यासाठी पोलीस मित्र निघणार तोच एका तरुणाने संग्रामनगरजवळ रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची खबर ठाण्यात येऊन धडकली. लगेच पोलिसांनी तिकडे धाव घेतली. तेथे फिरोजचे प्रेत आढळून आले. फिरोजच्या आत्महत्येप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.