शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचा महावितरणला २ कोटींचा फटका !

By admin | Updated: October 17, 2016 21:20 IST

गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करावा लागलेल्या लातूर जिल्ह्यात यावर्षी तीनवेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे महावितरणच्या उच्चदाब वाहिनीचे ४०४ तर लघुदाब वाहिनीचे

बाळासाहेब जाधव ,

लातूर, दि. १७ - गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करावा लागलेल्या लातूर जिल्ह्यात यावर्षी तीनवेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे महावितरणच्या उच्चदाब वाहिनीचे ४०४ तर लघुदाब वाहिनीचे १५४६ विद्युत खांब कोसळले आहेत. शिवाय, ४० रोहित्र नादुरुस्त झाल्याने १ कोटी ९० लाखांचे नुकसान झाल्यामुळे महावितरणला मोठा फटका सहन करावा लागला आहे.

लातूर परिमंडळात लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागलेल्या लातूर जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर तीनवेळा अतिवृष्टी झाली. यामुळे ५ लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, गावोगावी विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणलाही या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यात उच्चदाब वाहिनीचे ४०४ विद्युत खांब कोसळले आहेत. तर लघुदाब वाहिनीचे १५४६ खांब कोसळले आहेत. शिवाय, विविध गावांतील ४० रोहित्र नादुरुस्त झाल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय झाली. तीन टप्प्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ६५.५५ किलोमीटर लांबीच्या विद्युत वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत.

यात लातूर जिल्ह्यात महावितरणचे १ कोटी ९० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. लातूरबरोबरच बीड जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. उच्च व लघुदाब वाहिनीचे १४१६ पोल नादुरुस्त झाले आहेत. तर ४५ रोहित्र नादुरुस्त झाले आहेत. ८४.५२ किलोमीटरच्या विद्युत वाहिन्या नादुरुस्त झाल्या असून, बीड जिल्ह्यात महावितरणचे ३० लाखांचे नुकसान झाले आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून, १५ रोहित्र खराब झाले आहेत. तसेच अनेक ठिकाणचे विद्युत पोलही उखडून पडल्याने किमान ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. 

लातूरबरोबर बीड व उस्मानाबादमध्येही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. येथील उच्च व लघुदाबाचे पोल उखडून पडले आहेत. तर ६० रोहित्र नादुरुस्त झाले आहेत. तसेच वीज वाहिन्याही तुटल्याने दोन्ही जिल्ह्यांतून ६५ लाखांचा फटका महावितरण कार्यालयास बसला आहे. 

गेल्या चार-पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील लातूर, बीड व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये किमान २ कोटी ५५ लाखांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी रोहित्र नादुरुस्त झाल्याने अनेक गावे अंधारात होती. दरम्यान, महावितरणची यंत्रणा लावून या गावांतील वीज वाहिन्या व रोहित्र दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर सुरू केले आहे. यामुळे काही गावांतील विद्युत प्रवाह सुरळीत झाला आहे. तर उर्वरित ठिकाणचेही काम प्रगतीपथावर सुरू असल्याने नागरिकांची सोय झाली असल्याचे महावितरण लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी  लोकमतशी बोलताना सांगितले