शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

अतिवृष्टीचा महावितरणला २ कोटींचा फटका !

By admin | Updated: October 17, 2016 21:20 IST

गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करावा लागलेल्या लातूर जिल्ह्यात यावर्षी तीनवेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे महावितरणच्या उच्चदाब वाहिनीचे ४०४ तर लघुदाब वाहिनीचे

बाळासाहेब जाधव ,

लातूर, दि. १७ - गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करावा लागलेल्या लातूर जिल्ह्यात यावर्षी तीनवेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे महावितरणच्या उच्चदाब वाहिनीचे ४०४ तर लघुदाब वाहिनीचे १५४६ विद्युत खांब कोसळले आहेत. शिवाय, ४० रोहित्र नादुरुस्त झाल्याने १ कोटी ९० लाखांचे नुकसान झाल्यामुळे महावितरणला मोठा फटका सहन करावा लागला आहे.

लातूर परिमंडळात लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागलेल्या लातूर जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर तीनवेळा अतिवृष्टी झाली. यामुळे ५ लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, गावोगावी विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणलाही या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यात उच्चदाब वाहिनीचे ४०४ विद्युत खांब कोसळले आहेत. तर लघुदाब वाहिनीचे १५४६ खांब कोसळले आहेत. शिवाय, विविध गावांतील ४० रोहित्र नादुरुस्त झाल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय झाली. तीन टप्प्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ६५.५५ किलोमीटर लांबीच्या विद्युत वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत.

यात लातूर जिल्ह्यात महावितरणचे १ कोटी ९० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. लातूरबरोबरच बीड जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. उच्च व लघुदाब वाहिनीचे १४१६ पोल नादुरुस्त झाले आहेत. तर ४५ रोहित्र नादुरुस्त झाले आहेत. ८४.५२ किलोमीटरच्या विद्युत वाहिन्या नादुरुस्त झाल्या असून, बीड जिल्ह्यात महावितरणचे ३० लाखांचे नुकसान झाले आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून, १५ रोहित्र खराब झाले आहेत. तसेच अनेक ठिकाणचे विद्युत पोलही उखडून पडल्याने किमान ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. 

लातूरबरोबर बीड व उस्मानाबादमध्येही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. येथील उच्च व लघुदाबाचे पोल उखडून पडले आहेत. तर ६० रोहित्र नादुरुस्त झाले आहेत. तसेच वीज वाहिन्याही तुटल्याने दोन्ही जिल्ह्यांतून ६५ लाखांचा फटका महावितरण कार्यालयास बसला आहे. 

गेल्या चार-पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील लातूर, बीड व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये किमान २ कोटी ५५ लाखांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी रोहित्र नादुरुस्त झाल्याने अनेक गावे अंधारात होती. दरम्यान, महावितरणची यंत्रणा लावून या गावांतील वीज वाहिन्या व रोहित्र दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर सुरू केले आहे. यामुळे काही गावांतील विद्युत प्रवाह सुरळीत झाला आहे. तर उर्वरित ठिकाणचेही काम प्रगतीपथावर सुरू असल्याने नागरिकांची सोय झाली असल्याचे महावितरण लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी  लोकमतशी बोलताना सांगितले